शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

बालगंधर्व रंगमंदिर बंद ठेवू नका, नाट्यव्यवसाय धोक्यात येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:05 IST

सध्या नाट्यव्यवसायाची परिस्थिती गंभीर आहे. केवळ बालगंधर्व आहे म्हणून पुण्यात बाहेरगावचे (मुख्यत: मुंबईच्या निर्मितीसंस्था) प्रयोग होत असतात.

पुणे : सध्या नाट्यव्यवसायाची परिस्थिती गंभीर आहे. केवळ बालगंधर्व आहे म्हणून पुण्यात बाहेरगावचे (मुख्यत: मुंबईच्या निर्मितीसंस्था) प्रयोग होत असतात. हे हक्काचे ठिकाण नाहीसे झाले तर प्रयोग होणे बंद होईल आणि हे प्रयोग झाले नाहीत, तर पुण्यातल्या आणि बाहेरगावच्या नाट्यप्रयोगांची व्यवस्थाच धोक्यात येईल.असंख्य कलाकारांचे तंत्रज्ञ-कारागरांचे अस्तित्वच नाहीसे होईल. नाट्यव्यवसायाच्या इतिहासातील तो काळा दिवस ठरेल. बालगंधर्व रंगमंदिराबद्दल नाट्यसृष्टीसह रसिकांच्या अतिशय नाजूक भावना आहेत. तेव्हा या रंगमंदिराला ‘हेरिटेज’ वास्तूचा दर्जा द्यावा. तसेच या वास्तुचा विस्तार किंवा नवनिर्माण सुलभ व्हावा. यासाठी नाट्यपरिषदेकडे कलाकार आणि तंत्रज्ञांची उपलब्धता आहे. या सेवेचा उपयोग करून घ्यावा, अशी आर्त साद घालत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने महापौरांना निवेदन दिले आहे.बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकासाची जाहीर घोषणा होताच नाट्यसृष्टीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ही वास्तू पाडण्याला रंगकर्मींनी विरोध दर्शविला. या वास्तूच्या पुनर्विकासाचा आराखडा अद्याप तयार झालेला नाही. महापौर आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने बालगंधर्वसंबंधी आपली निवेदनाद्वारे भूमिका विषद केली आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे आम्हा रंगकर्मींचेच नव्हे तर समस्त रसिकांचे प्रेमाचे आणि अभिमानाचे स्थळ आहे. देशातल्या सर्व कलाकारांना आपली कला इथे सादर करण्यात स्वत:चा सन्मान वाटतो.कारण कै. नारायणराव राजहंस ज्यांना लोकमान्य टिळकांनी ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली. त्या महान कलाकाराचे हे स्मारक आहे. त्याच्या निर्मितीसाठी पु. ल. देशपांडे यांचे कष्ट आणि कल्पकता आहे. त्यामुळे नव्या अत्याधुनिक रंगमंदिराची निर्मिती इतर ठिकाणी करता येऊ शकते. पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे उद्यान येथे पुलंचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.व्यवस्थापनाची कार्यशाळानाट्यपरिषद विनामोबदला घेईलशहरात अनेक नवीन रंगमंदिराची उभारणी झाली आहे. रंगमंदिराच्या दुरवस्थेबद्दल अनेकदा ओरड होते. रंगमंदिराची उत्तम व्यवस्था ठेवण्यासाठी नाटकाची जाण असणारे आणि आत्मीयता असणारे कर्मचारी असणे आवश्यक आहे. शाळा-कॉलेजात नाटकांत काम केलेले, रंगमंचामागील व्यवस्था सांभाळणारे, प्रकाशयोजना, ध्वनिसंयोजन हाताळलेले अशा कर्मचाऱ्यांचा एक वेगळा गट निर्माण करून त्यांच्या नेमणूका नाट्यगृहांवर करता येणे शक्य आहे.कर्मचाºयांसाठी रंगमंदिर व्यवस्थापनाची कार्यशाळा नाट्यपरिषद विनामोबदला घेण्यास तयार आहे. तरी बालगंधर्व रंगमंदिरातील प्रयोग एक दिवस बंद राहाणार नाही, याची खबरदारी घेऊन जो विस्तारकार्यक्रम आखला जाईल, त्याला नाट्य परिषदेचा पाठिंबा असेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.