शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

बालगंधर्व रंगमंदिर बंद ठेवू नका, नाट्यव्यवसाय धोक्यात येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:05 IST

सध्या नाट्यव्यवसायाची परिस्थिती गंभीर आहे. केवळ बालगंधर्व आहे म्हणून पुण्यात बाहेरगावचे (मुख्यत: मुंबईच्या निर्मितीसंस्था) प्रयोग होत असतात.

पुणे : सध्या नाट्यव्यवसायाची परिस्थिती गंभीर आहे. केवळ बालगंधर्व आहे म्हणून पुण्यात बाहेरगावचे (मुख्यत: मुंबईच्या निर्मितीसंस्था) प्रयोग होत असतात. हे हक्काचे ठिकाण नाहीसे झाले तर प्रयोग होणे बंद होईल आणि हे प्रयोग झाले नाहीत, तर पुण्यातल्या आणि बाहेरगावच्या नाट्यप्रयोगांची व्यवस्थाच धोक्यात येईल.असंख्य कलाकारांचे तंत्रज्ञ-कारागरांचे अस्तित्वच नाहीसे होईल. नाट्यव्यवसायाच्या इतिहासातील तो काळा दिवस ठरेल. बालगंधर्व रंगमंदिराबद्दल नाट्यसृष्टीसह रसिकांच्या अतिशय नाजूक भावना आहेत. तेव्हा या रंगमंदिराला ‘हेरिटेज’ वास्तूचा दर्जा द्यावा. तसेच या वास्तुचा विस्तार किंवा नवनिर्माण सुलभ व्हावा. यासाठी नाट्यपरिषदेकडे कलाकार आणि तंत्रज्ञांची उपलब्धता आहे. या सेवेचा उपयोग करून घ्यावा, अशी आर्त साद घालत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने महापौरांना निवेदन दिले आहे.बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकासाची जाहीर घोषणा होताच नाट्यसृष्टीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ही वास्तू पाडण्याला रंगकर्मींनी विरोध दर्शविला. या वास्तूच्या पुनर्विकासाचा आराखडा अद्याप तयार झालेला नाही. महापौर आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने बालगंधर्वसंबंधी आपली निवेदनाद्वारे भूमिका विषद केली आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे आम्हा रंगकर्मींचेच नव्हे तर समस्त रसिकांचे प्रेमाचे आणि अभिमानाचे स्थळ आहे. देशातल्या सर्व कलाकारांना आपली कला इथे सादर करण्यात स्वत:चा सन्मान वाटतो.कारण कै. नारायणराव राजहंस ज्यांना लोकमान्य टिळकांनी ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली. त्या महान कलाकाराचे हे स्मारक आहे. त्याच्या निर्मितीसाठी पु. ल. देशपांडे यांचे कष्ट आणि कल्पकता आहे. त्यामुळे नव्या अत्याधुनिक रंगमंदिराची निर्मिती इतर ठिकाणी करता येऊ शकते. पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे उद्यान येथे पुलंचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.व्यवस्थापनाची कार्यशाळानाट्यपरिषद विनामोबदला घेईलशहरात अनेक नवीन रंगमंदिराची उभारणी झाली आहे. रंगमंदिराच्या दुरवस्थेबद्दल अनेकदा ओरड होते. रंगमंदिराची उत्तम व्यवस्था ठेवण्यासाठी नाटकाची जाण असणारे आणि आत्मीयता असणारे कर्मचारी असणे आवश्यक आहे. शाळा-कॉलेजात नाटकांत काम केलेले, रंगमंचामागील व्यवस्था सांभाळणारे, प्रकाशयोजना, ध्वनिसंयोजन हाताळलेले अशा कर्मचाऱ्यांचा एक वेगळा गट निर्माण करून त्यांच्या नेमणूका नाट्यगृहांवर करता येणे शक्य आहे.कर्मचाºयांसाठी रंगमंदिर व्यवस्थापनाची कार्यशाळा नाट्यपरिषद विनामोबदला घेण्यास तयार आहे. तरी बालगंधर्व रंगमंदिरातील प्रयोग एक दिवस बंद राहाणार नाही, याची खबरदारी घेऊन जो विस्तारकार्यक्रम आखला जाईल, त्याला नाट्य परिषदेचा पाठिंबा असेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.