शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

दिवाळीच्या तोंडावर शिमगा सुरू ?, सामान्य झाले पुरते हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 06:32 IST

पुणे जिल्ह्यात मंगळवारपासून (दि. ३) जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल पुरवठा विभाग कर्मचा-यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

बारामती : पुणे जिल्ह्यात मंगळवारपासून (दि. ३) जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल पुरवठा विभाग कर्मचा-यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या काळात जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांसह नागरिकांवर शिमगा करण्याची वेळ आली आहे.शासनाने महसूल विभागातील पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवेतून भरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अव्वल कारकून या पदावर काम करणा-या कर्मचा-यांवर अन्याय होणार असल्याचेदेखील निदर्शनास आणून दिले आहे.या निर्णयामुळे अव्वल कारकून संवर्गातील कर्मचा-यांना पदावनत व्हावे लागणार आहे. याअनुषंगाने या पदभरतीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे. यानंतर संघटनेच्या मागणीबाबत कोणतीही दखल घेण्यात आलीनाही. त्यामुळे आंदोलन सुरू केल्याचे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.बारामती तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी सांगितले, की बारामती पुरवठा विभागाच्या वतीने गेल्या महिनाअखेरीस स्वस्त धान्य दुकानदारांना आॅक्टोबर महिन्याचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, नवीन शिधापत्रिकावाटप, शिधापत्रिकेतून नाव करणे आदी कामे प्रलंबित राहतील.1 पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पुरवठा विभागाचे शहर, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातील जवळपास २४५ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. 2या संपाचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. ऐन दिवाळीत सर्वसामान्यांवर शिमगा करण्याची वेळ आली, ही आमची इच्छा नाही. काम बंद ठेवण्याची मानसिकतादेखील नाही. मात्र, आमच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर कित्येक वेळा चर्चा करूनदेखील मार्ग काढण्यात आलेला नाही. 3आमचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही. अजूनही आमचा शासनावर भरोसा आहे. संवाद होऊन मार्ग निघण्याची अपेक्षाआहे. लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास संघटनेचे जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केला.धान्य वाटपावर होणार परिणामपुणे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष केशव नगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की या आंदोलनाचा जिल्ह्यात धान्य वाटपावर परिणाम होणार आहे.काही स्वस्त धान्य दुकानदार गहू, तांदूळ, साखरवाटप करू शकणार नाही. धान्य मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेत ७० ते ८० टक्के दुकानदारांना पुरवठा विभागाकडून या संपामुळे अडथळा येणार आहे. एका दुकानदाराकडे गावातील २०० ते ६०० ग्राहक असतात. वेळेत माल न मिळाल्यास या नागरिकांच्या रोषाला दुकानदारांनाच सामोरे जावे लागणार आहे. केरोसीन वाटपावरदेखील याचा परिणाम होणार आहे.