शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दिव्यांगांचा अनुशेष अजूनही ‘शेष’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 04:10 IST

सरकारी नोकऱ्यांमध्ये घाऊक भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली आहे. मात्र, गेली अनेक वर्षे दिव्यांगांच्या रोजगारभरतीचा अनुशेष भरून काढणे अद्यापही सरकारला शक्य झालेले नाही. राज्यातील साडेसहा हजार दिव्यांगांच्या पदांचा अनुशेष शिल्लक असल्याचे अपंगकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षापासून दिव्यांग अनुशेषाची सुधारित आकडेवारीदेखील तयार करण्यात आलेली नाही.

- विशाल शिर्केपुणे : सरकारी नोकऱ्यांमध्ये घाऊक भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली आहे. मात्र, गेली अनेक वर्षे दिव्यांगांच्या रोजगारभरतीचा अनुशेष भरून काढणे अद्यापही सरकारला शक्य झालेले नाही. राज्यातील साडेसहा हजार दिव्यांगांच्या पदांचा अनुशेष शिल्लक असल्याचे अपंगकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षापासून दिव्यांग अनुशेषाची सुधारित आकडेवारीदेखील तयार करण्यात आलेली नाही.केंद्र सरकारच्या अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५च्या तरतुदीनुसार प्रत्येक सरकारी आणि निमसरकारी संस्थेमध्ये दिव्यांगांना पदभरतीच्या ३ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार अंध व क्षीण दृष्टी, कर्णबधिर, अस्थिव्यंग अशा प्रवर्गांसाठी १७ हजार ९१९ जागा होत्या. त्यांतील ११ हजार ४३३ पदे १ जानेवारी २०१७अखेरीस भरली गेली आहेत. त्यात अंध व क्षीण दृष्टीची २ हजार ७७१, कर्णबधिर २ हजार९३७ आणि अस्थिव्यंगाची ५ हजार ७२५ पदे भरली गेली आहेत.अजूनही अंध व क्षीण दृष्टीसाठी २ हजार ८७५, कर्णबधिर २ हजार ६२४ आणि अस्थिव्यंगाच्या ९८७ अशा ६ हजार ४८६ जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ७२ हजार सरकारी नोकºयांमधील पदे भरणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, गेली अनेक वर्षे दिव्यांगांच्या काही हजार पदांचा अनुशेष सरकारला भरता आलेला नाही.ग्रामविकास विभागातीलतृतीय व चतुर्थ श्रेणी पदे, वित्त, आदिवासी विभाग, सार्वजनिक आरोग्य, कृषी, नगरविकास उच्च वतंत्र शिक्षण, सार्वजनिकबांधकाम विभाग अशा २७ विविध विभागांत दिव्यांगांचा पदभरतीचा अनुशेष शिल्लक आहे. केंद्रसरकारने २०१६ रोजी दिव्यांगांसाठी केलेल्या कायद्यानुसार पदभरतीत४ टक्के जागा राखीव ठेवाव्या लागणार आहेत.दिव्यांगांच्या २१ प्रवर्गांचा करावा लागणार विचारकेंद्र सरकारने २०१६ साली दिव्यांग व्यक्तींचे अधिकार (द राईट्स आॅफ पर्ससन्स विथ डिसअ‍ॅबिलिटीज्) या कायद्यानुसार हलचालीवर मर्यादा असलेल्या व्यक्ती, कुष्ठरोग, मेंदूचा बुटकेपणा, स्नायुची अक्षमता, अ‍ॅसिड हल्ला पिडित, अंधत्व, क्षीण दृष्टी, श्रवणदोष, वाचा दोष, अध्यन क्षमता, स्वमग्न, मतिमंदत्व, पार्किन्सन, चेतापेशीवरील आवरणे नष्ट होणे, जुनाट व्याधी, हिमोफिलिया, थॅलसिमिया, सिकलसेस आणि बहुविकलांग असे प्रवर्ग केले आहेत. त्यांना देखील पदभरतीत योग्य स्थान द्यावे लागेल. प्रवर्गांची संख्या वाढल्याने ४ टक्क्यानुसार पदभरतीत दिव्यांगांचे आरक्षण ठेवावे लागेल.दिव्यांगांच्या नवीन कायद्यानुसार अजूनही पदभरतीच्या आरक्षणात वाढ केलेली नाही. दिव्यांगांना विशेषत: कर्णबधिर व्यक्तींना उच्च शिक्षणाच्या संधी आणि सुविधा उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे, रोजागाराचा अनुशेष शिल्लक आहे. किमान जुन्या कायद्यानुसार रोजगाराचा अनुशेष लवकर भरला जावा.- हरिदास शिंदे, अध्यक्ष अपंग हक्क सुरक्षा समिती

टॅग्स :newsबातम्याPuneपुणे