शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

जिल्ह्याला तुफानी पावसाने झोडपले

By admin | Updated: June 6, 2016 00:41 IST

पुणे जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पावसाचे आगमन झाले. विशेषत: शिरूर, हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्याला शनिवारी तुफानी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडली

पुणे जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पावसाचे आगमन झाले. विशेषत: शिरूर, हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्याला शनिवारी तुफानी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडली, घराची छपरे उडून गेली. शेतकऱ्यांनी काढलेला कांदा शेतातच राहिल्याने अनेकांचा कांदा भिजला. मात्र याही परिस्थितीत कांदा भिजला तरी चालेल पण पाऊस पडू दे, अशी प्रार्थना शेतकऱ्यांनी केली. या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये विशेष आनंदाने वातावरण होते. या पावसामुळे पेरणीच्या कामांना चांगली मदत होणार आहे.दौंडला वादळी वाऱ्याचे थैमानदौंड : शहरात रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह तुफानी वादळी पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळामुळे व्यापार पेठेतील नागरिक सैरावैरा पळत होते. वाऱ्याचा वेग तुफानी असल्याने एकमेकाला माणूस दिसत नव्हता. सुमारे १० मिनिटे वादळी वाऱ्याने थैमान घातले होते. यामुळे काही ठिकाणी पत्रे उडाले, तर काही वृक्ष उन्मळून पडले. वादळी वाऱ्यानंतर विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाला होता, तर रेल्वे कुरकुंभ मोरीत पाणी साठल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. सुमारे अर्ध्या तासाच्या जवळपास पावसाचा जोर मोठा होता. त्यांनतर हळूहळू पाऊस ओसरत गेला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.बारामती शहर, तालुक्यात पावसाची जोरदार हजेरीबारामती : बारामती शहर व परिसरात शनिवारी (दि. ४) रात्री विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी साठलेल्या अवस्थेत होते. सलग दुसऱ्या दिवशी बारामती शहरात पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होते. रात्री ९नंतर पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्याचबरोबर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बारामतीकरांनी अनुभवला. पावसामुळे शहरात काही काळ कसबा येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरात इंदापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबले होते. पावसाची आकडेवारी : बारामती शहर ५५ मिमी, लाटे ५२ मिमी, सुपे ३९ मिमी, लोणी भापकर २९ मिमी, बऱ्हाणपूर ४२ मिमी, सोमेश्वर कारखाना २८ मिमी, पणदरे ५५ मिमी, जळगाव क. प. ३२ मिमी, मानाजीनगर ४५ मिमी, वडगाव निंबाळकर ५५ मिमी, मोरगाव ३१ मिमी, ८ फाटा होळ ५० मिमी, उंडवडी क. प. ८ मिमी, माळेगाव ६० मिमी, चांदगुडेवाडी ३१ मिमी, काटेवाडी ५० मिमी. (प्रतिनिधी)बारा तास वीजपुरवठा खंडित दौंड शहरात रात्री पावसाला सुरुवात झाली. जुन्या गावठाणात रात्री १० च्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला होता, तर वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी १० वाजता पूर्ववत झाला. तसेच शहराच्या रेल्वे कुरकुंभ मोरीपलीकडील भागात शनिवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास विद्युत पुरवठा पूर्ववत झाला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. आठवडेबाजाराला पहिल्याच पावसात नदीचे स्वरूपदौंड नगर परिषदेच्या वतीने गाववेशीजवळ आठवडेबाजार बांधण्यात आला आहे. परंतु काही भागातील बांधकाम ठेकेदाराने व्यवस्थित न केल्याने आठवडेबाजारातील काही भागात पाणी साचल्याने पहिल्याच पावसात बाजाराला नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे व्यापारी, शेतकरी व ग्राहकांची मोठी कुचंबणा झाली. परिणामी आठवडेबाजाराचे अद्याप उद्घाटन झालेच नाही. काही कामे अपूर्ण स्वरूपात असतील मात्र आठवडेबाजाराचे अपूर्ण स्वरुपाची कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारही पुढे येईना. आठवडेबाजारातील अंतर्गत भागात साचलेले पाणी बाहेर निघण्यासाठी व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साठून राहिले. तसेच दौंडचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रेच्या वेळेस आठवडेबाजाराच्या एका भिंतीची अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, धार्मिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भिंत पाडण्यात आली; परंतु पडलेली भिंत अद्याप बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे आठवडेबाजाराचे कामकाज निकृष्ट झाल्याने नाराजीचा सूर आहे. दोन दिवसांत ९६ मिमी पाऊस सणसर (ता. इंदापूर) येथे शनिवारी रात्री दोन तासांत ६७ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस अतिवृष्टी मानला जातो. सलग दुसऱ्या दिवशी या भागात दमदार पाऊस झाला. दोन दिवसांत येथे ९६ मिमी पाऊस झाला आहे. अतिवृष्टी होऊनही कोणत्याही प्रकारचे नुकसान येथे झाले नाही. त्यामुळे शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला. पारवडीत पहिलाच मुसळधार पाऊसपारवडी : पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेला बळीराजा अखेर पहिल्याच मुसळधार पावसाने सुखावला. पारवडीसह शिर्सुफळ, कटफळ आदी गावांसह परिसरात रात्री उशिरा पाऊस झाला.पावसाच्या पाण्याने शेतात, नाल्यात तसेच तळ्यात पाणी साठलेले आहे. कालपासून वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. या पाण्यामुळे वन विभागाचे सर्व तलावात वन्य प्राण्यांचा गरजेपुरता पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुढील दोन महिन्यांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.