शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्हा तापला!

By admin | Updated: March 30, 2017 00:28 IST

यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत.

पुणे/बारामती : यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाने जिवाची काहिली होत असून सूर्याने चाळिशीच्या आसपास मजल मारल्याचे दिसून येत आहे.उन्हामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. दुपारी बाजारपेठेतदेखील तुरळक ग्राहक दिसून येत आहेत. या वाढत्या तापमानामुळे दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्यतज्ज्ञांनी दिल्या आहेत.शहर, तालुक्यात उष्णतेची लाट भडकली आहे. त्यामुळे दिवसा अघोषित संचारबंदी केल्याप्रमाणे रस्ते ओस पडत आहेत. माळेगाव येथील कृषिविज्ञान केंद्राच्या महितीनुसार शहर परिसरात बुधवारी (दि. २९) ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांनी लहान मुलांची उन्हाळ्यात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, लहान मुलांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. सकाळ, दुपारी, संध्याकाळी लहान मुलांना पाणी पाजणे महत्त्वाचे आहे. नवजात बालकांना दूध पाजणाऱ्या मातांनीदेखील पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे. थंड पदार्थ लहान मुलांना देऊ नयेत. भवानीनगर येथील डॉ. संग्राम देवकाते यांनी सांगितले, की सध्या उन्हामुळे ‘डीहायड्रेशन’चा त्रास होणारे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यातच या भागात कांजिण्यांच्या रुग्णाची संख्या मोठी आहे. या रुग्यांना वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी बाहेरील थंड पेय घेण्यापेक्षा घरगुती लिंबू सरबत, पाणी भरपूर प्यावे. बाहेरील खाद्यपदार्थ कटाक्षाने टाळावेत, असे डॉ. देवकाते यांनी सांगितले.सोशल मीडियावरही चाळिशीसध्या सोशल मीडियावर ‘चाळिशी’ची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये चाळिशीचा खूप त्रास होत आहे. काय करावे ते कळत नाहीये. तिशीत होतो तेव्हा कसं बरं होतं, उत्साह होता. पण आता नको नकोसे झालं आहे. ४५ च्या आसपास काय होणार काय माहिती, नाही नाही, माझ्या वयाबद्दल नाही बोलत. तापमानाबद्दल बोलत आहे. ही पोस्ट सर्वत्र ‘व्हायरल’ होताना दिसते.सनबर्नचा धोका त्वचारोगतज्ज्ञ डॉ. राहुल संत यांनी सांगितले, की सध्या तीव्र उन्हामुळे ‘सनबर्न’चा त्रास झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सकाळी १०.३० ते ३.३० या वेळेत सूर्याची अतितीव्र किरणे त्वचेसाठी घातक असतात. त्यामुळे शक्य असल्यास या काळात उन्हात जाणे टाळावे. सासवड-पुरंदरला कमाल तापमान ४१ अंशांवर सासवड : सासवडसह पुरंदरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज (दि. २९) दुपारी अडीच वाजता कमाल तापमान ४१.३ अंशांवर गेले. गतवर्षी २४ मार्च रोजी तापमान ४०.२ सेल्सिअस होते. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी १ अंशाने वाढ झाल्याची माहिती आचार्य अत्रे वेधशाळेचे व्यवस्थापक नीती यादव यांनी दिली.गेले दोन-तीन दिवस उन्हाचा तडाखा वाढतच आहे. नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी आहे. सासवडमध्ये बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट जाणवत होता. घराबाहेर पडताना गॉगल, टोपी, छत्री यांचा वापर केला जात आहे. उसाचा रस, कुल्फी, आईस्क्रीम, थंड पेये घेण्याकडे कल दिसत आहे. थंड पाण्यासाठी बाजारात रांजण, माठ उपलब्ध झाले आहेत. त्यांची किंमत २५० ते १००० रुपयांपर्यंत आहे. वाढत्या उन्हामुळे लोकांना बाहेर जाणे शक्य नसले तरी मुलांच्या परीक्षा, लग्नसमारंभ, गावोगावच्या यात्रा यासाठी बाहेर पडावे लागतच आहे.