शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

जिल्हा तापला!

By admin | Updated: March 30, 2017 00:28 IST

यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत.

पुणे/बारामती : यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाने जिवाची काहिली होत असून सूर्याने चाळिशीच्या आसपास मजल मारल्याचे दिसून येत आहे.उन्हामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. दुपारी बाजारपेठेतदेखील तुरळक ग्राहक दिसून येत आहेत. या वाढत्या तापमानामुळे दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्यतज्ज्ञांनी दिल्या आहेत.शहर, तालुक्यात उष्णतेची लाट भडकली आहे. त्यामुळे दिवसा अघोषित संचारबंदी केल्याप्रमाणे रस्ते ओस पडत आहेत. माळेगाव येथील कृषिविज्ञान केंद्राच्या महितीनुसार शहर परिसरात बुधवारी (दि. २९) ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांनी लहान मुलांची उन्हाळ्यात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, लहान मुलांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. सकाळ, दुपारी, संध्याकाळी लहान मुलांना पाणी पाजणे महत्त्वाचे आहे. नवजात बालकांना दूध पाजणाऱ्या मातांनीदेखील पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे. थंड पदार्थ लहान मुलांना देऊ नयेत. भवानीनगर येथील डॉ. संग्राम देवकाते यांनी सांगितले, की सध्या उन्हामुळे ‘डीहायड्रेशन’चा त्रास होणारे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यातच या भागात कांजिण्यांच्या रुग्णाची संख्या मोठी आहे. या रुग्यांना वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी बाहेरील थंड पेय घेण्यापेक्षा घरगुती लिंबू सरबत, पाणी भरपूर प्यावे. बाहेरील खाद्यपदार्थ कटाक्षाने टाळावेत, असे डॉ. देवकाते यांनी सांगितले.सोशल मीडियावरही चाळिशीसध्या सोशल मीडियावर ‘चाळिशी’ची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये चाळिशीचा खूप त्रास होत आहे. काय करावे ते कळत नाहीये. तिशीत होतो तेव्हा कसं बरं होतं, उत्साह होता. पण आता नको नकोसे झालं आहे. ४५ च्या आसपास काय होणार काय माहिती, नाही नाही, माझ्या वयाबद्दल नाही बोलत. तापमानाबद्दल बोलत आहे. ही पोस्ट सर्वत्र ‘व्हायरल’ होताना दिसते.सनबर्नचा धोका त्वचारोगतज्ज्ञ डॉ. राहुल संत यांनी सांगितले, की सध्या तीव्र उन्हामुळे ‘सनबर्न’चा त्रास झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सकाळी १०.३० ते ३.३० या वेळेत सूर्याची अतितीव्र किरणे त्वचेसाठी घातक असतात. त्यामुळे शक्य असल्यास या काळात उन्हात जाणे टाळावे. सासवड-पुरंदरला कमाल तापमान ४१ अंशांवर सासवड : सासवडसह पुरंदरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज (दि. २९) दुपारी अडीच वाजता कमाल तापमान ४१.३ अंशांवर गेले. गतवर्षी २४ मार्च रोजी तापमान ४०.२ सेल्सिअस होते. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी १ अंशाने वाढ झाल्याची माहिती आचार्य अत्रे वेधशाळेचे व्यवस्थापक नीती यादव यांनी दिली.गेले दोन-तीन दिवस उन्हाचा तडाखा वाढतच आहे. नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी आहे. सासवडमध्ये बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट जाणवत होता. घराबाहेर पडताना गॉगल, टोपी, छत्री यांचा वापर केला जात आहे. उसाचा रस, कुल्फी, आईस्क्रीम, थंड पेये घेण्याकडे कल दिसत आहे. थंड पाण्यासाठी बाजारात रांजण, माठ उपलब्ध झाले आहेत. त्यांची किंमत २५० ते १००० रुपयांपर्यंत आहे. वाढत्या उन्हामुळे लोकांना बाहेर जाणे शक्य नसले तरी मुलांच्या परीक्षा, लग्नसमारंभ, गावोगावच्या यात्रा यासाठी बाहेर पडावे लागतच आहे.