शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

गाळमिश्रित पाणीपुरवठा

By admin | Updated: July 6, 2017 03:47 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठा ६.७३ टीएमसीपर्यंत खाली आला आहे. यामुळे सध्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठा ६.७३ टीएमसीपर्यंत खाली आला आहे. यामुळे सध्या महापालिकेच्या वतीने शहराला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याला मातकट वास येत असून, काही भागांत गाळमिश्रित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याला मातकट वास येत असला तरी हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.जुलै महिना उजाडला तरी अद्यापही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पावसाची सुरुवात झालेली नाही. यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. या प्रकल्पातील चारही धरणे मिळून आजअखेर ६.७३ टीएमसी म्हणजे २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत मॉन्सून पाऊस दिवसेंदिवस लांबत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. परंतु पूर्वपरंपरेनुसार सिंचन विभागाच्या वतीने धरणातील पाणीसाठ्याच्या वापराचे नियोजन १५ जुलैपर्यंतच केले जाते. यामध्ये बदल करून यापुढे किमान १५ आॅगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. यामुळे पाऊस लांबल्याने काही धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. यामुळेच पुणे शहराला गाळमिश्रित पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.याबाबत पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पत्रक काढून सध्या करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याला मातकट वास येत असला तरी हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाल्यावर पुन्हा पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याला वास येतो म्हणून घाबरून जाऊ नये, असे आवाहनदेखील केले आहे.