शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
4
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
5
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
6
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
7
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
8
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
9
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
10
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
11
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
12
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
13
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
14
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
15
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
16
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
17
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
18
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
19
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
20
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय

व्यापाऱ्यांत कारवाईमुळे असंतोष

By admin | Updated: October 21, 2015 01:10 IST

डाळी व खाद्यतेलावर साठा-मर्यादा लागू करण्याच्या निर्णयाबाबत कसलीही पूर्वकल्पना न देता अन्यधान्य वितरण अधिकाऱ्यांनी (एफडीओ) सोमवारी रात्री उशिरा केलेल्या

पुणे : डाळी व खाद्यतेलावर साठा-मर्यादा लागू करण्याच्या निर्णयाबाबत कसलीही पूर्वकल्पना न देता अन्यधान्य वितरण अधिकाऱ्यांनी (एफडीओ) सोमवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांंमध्ये असंतोष पसरला आहे. ही पूर्वग्रहदूषित कारवाई असल्याची नाराजी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. मंगळवारी दिवसभर या कारवाईचे पडसाद मार्केट यार्डात उमटले. दि पूना मर्चंट्स चेंबरने एफडीओच्या कारवाईचा निषेध केला.अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री साडेदहानंतर गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील घाऊक व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्याची कारवाई केली. मंगळवारी चेंबरच्या वतीने व्यापाऱ्यांनी प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तातडीने बैठक घेतली. या बैठकीस बाजार समितीचे उपसभापती दिलीप खैरे, सचिव, धनंजय डोईफोडे, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नीलिमा धायगुडे, चेंंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सहसचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, राजेंद्र बाठिया व चेंबरचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत चेंबरच्या सदस्यांनी कारवाईबाबत संताप व्यक्त केला. शासनाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याचे या बैठकीत शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी सांगितल्याचे सदस्यांनी सांगितले. सभासदांकडे निर्धारित साठ्यापेक्षा जास्त साठा नाही. परंतु कायदा राबविण्यासाठी अशा पद्धतीने कारवाई करणे योग्य नाही. तपासणीत एकाही व्यापाऱ्याकडे मर्यादेपेक्षा जास्त साठा सापडला नाही. चेंबरने यापूर्वी वारंवार वायदा बाजारातून या वस्तू वगळण्याची मागणी केलेली आहे. वायदा बाजारामुळे कृत्रिम मागणी निर्माण होऊन भाववाढ होते. खाद्यतेलाबाबत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळावेत म्हणून काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने १५ टक्के आयातशुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. पामतेलाचे भाव मागील अनेक वर्षांच्या तुलनेत कमी आहेत. असे असताना खाद्यतेलावर साठामर्यादा लावणे चुकीचे आहे, असे चोरबेले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)डाळींचा साठा करणाऱ्या मोठ्या कंपन्यांवर कारवाई व्हावीडाळींची साठवणूक केली म्हणून छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे नाटक करण्यापेक्षा डाळींचे लाखो रुपयांचे आॅनलाईन व्यवहार करणारे मोठे उद्योग आणि मल्टीनॅशनल कंपन्यांवर कारवाई करावी, त्यांच्याकडे किती डाळींचा साठा सापडला याची माहिती जाहीर करावी. तसेच हा अतिरिक्त साठा सर्वसामान्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांनी केली. ते म्हणाले, तूरडाळीसह अन्य डाळींचे भाव गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वाढत आहेत. त्यातच जून महिन्यामध्ये पाऊस कमी झाल्याने डाळींचे उत्पादन घटणार हे स्पष्ट होते. असे असतानाही डाळी आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही. तसेच आता डाळींचा साठा किती असावा याबाबत निर्बंध घातले आहेत. सरकारची ही कृती संतापजनक असून, मोठ्या कंपन्यांचे लाखो रुपयांचे व्यवहार झालेले आहेत.व्यापाऱ्यांना नाहक केले जातेय बदनामडाळी, कडधान्ये व खाद्यतेले यांची मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. आंतरराष्ट्रीय आयातदार व निर्यातदार यांच्या अखत्यारीतच भाव ठरविले जातात. हे भाव आंतरराष्ट्रीय भावांना अनुसरून असतात. मात्र, भाववाढीसाठी व्यापाऱ्याला नाहक बदनाम केले जाते. आतापर्यंत आयातदार तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या, मॉलला साठामर्यादा लागू नाही. त्यामुळे केवळ व्यापाऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे असंतोष पसरला आहे.बहुराष्ट्रीय कंपन्या, मॉलवर कारवाई का नाही?बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच मॉलचालकच सर्वाधिक साठेबाजी करतात. त्यांच्यावर मात्र शासन कोणतीही कारवाई करत नाही. घाऊक व्यापारी हे अहिंसावादी आहेत. देशाच्या व्यापारव्यवस्थेतील कणा आहेत. तेच सातत्याने नमते घेतात. त्यामुळे त्यांच्यावर अन्यायपूर्वक कारवाई केली जाते. रात्रीच्या वेळी न सांगता करण्यात आलेली कारवाई अत्यंत चुकीची होती. तपासणी करायला आमची काहीच हरकत नाही आणि विरोधही नाही. पण त्यामध्ये व्यावहारिकपणा जपला जाणे अत्यंत आवश्यक आहे.- अभय संचेती, व्यापारीआतापर्यंत अनेकदा साठामर्यादा लागू करण्यात आली. त्याबाबत व्यापाऱ्यांना रीतसर माहिती देण्यात आली. मात्र, सोमवारी पहिल्यांदाच व्यापाऱ्यांना कसलीही पूर्वकल्पना न देता कारवाईचा बडगा उचलण्यात आला. हा अत्यंत चुकीचा निर्णय होता. कोणत्या व्यापाऱ्याकडे किती साठा आहे, याची कोणतीही माहिती अधिकाऱ्यांकडे नव्हती. ही माहिती घेऊन दिवसभरात कारवाई करता आली असती.- पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष, पूना मर्चंट्स चेंबर