शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

चाकण औद्योगिक वसाहतीमधे कामगारांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्याबाबत अधिवेशनात अर्धा तास चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 20:37 IST

येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हजारो हेक्टर जागा संपादित करून तेथे मोठमोठे उद्योगव्यवसाय उभे केले आहेत

हनुमंत देवकर चाकण : येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हजारो हेक्टर जागा संपादित करून तेथे मोठमोठे उद्योगव्यवसाय उभे केले आहेत. त्यामुळे अनेक नोकरदार वर्ग या परिसरात स्थलांतरित होवून नोकरीच्या निमित्ताने या परिसरात राहत आहेत. औद्योगिक वसाहतीच्या परिसरात कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले आरोग्य केंद्र, वाहतूक व्यवस्था, महिलांसाठी कम्युनिटी हॉल, करमणूक केंद्र, सुरक्षेसाठी पोलीस स्टेशन, महिलांसाठी वसतिगृह त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण इ. महत्वाच्या सोयीसुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करण्याचे आवश्यक असताना अशा सुविधा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मागणी करूनही निर्माण न करण्यात आल्याने कामगारांची सुरक्षा त्याचबरोबर त्यांचे आरोग्य व कौटुंबिक जीवन धोकादायक होत आहे. तसेच औद्योगिक परिसरात कारखान्यांना आग लागण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत असून सद्य स्थितीत असणारी अग्निशमन यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उक्त सोयीसुविधा तत्काळ निर्माण करण्याची तसेच सध्या करीत असलेली कार्यवाहीची माहिती प्राप्त करणे आवश्यक वाटल्याने आमदार सुरेश गोरे यांनी या विषयावर सभागृहात अर्धा तास चर्चा उपस्थित केली.या चर्चेला उद्योग मंत्री अनुपस्थित असल्याने संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी उत्तर दिले. उत्तरात त्यांनी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत आमदार सुरेश गोरे यांच्या मनात असलेले प्रेम या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून निदर्शनास आल्याचे सांगितले. तसेच अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा उपस्थित केल्यामुळे आमदार गोरे यांचे अभिनंदन केले. सरकार आणि पालकमंत्री या नात्याने जबाबदार म्हणून मी स्वतः कामगार आयुक्त, कामगार मंत्री तसेच एमआयडीसी यांच्या सोबत बैठक घेवून यावर सविस्तर चर्चा करून डीपीडीसी, सीएसआर तसेच एमआयडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. वाढत्या आगीच्या घटना पाहता पीएमआरडीए मार्फत अग्निशामक केंद्र ही उभे केले जाणार आहे.आमदार गोरे यांनी यावेळी म्हाळुंगे इंगळे गावासाठी शासनाकडून मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागेची आवश्यकता असून जागेअभावी आरोग्य केंद्र होवू शकत नाही. त्यासाठी जागेची मागणी करण्याच्या प्रस्ताव एमआयडीसी कडे दिला आहे त्यास मंजुरी मिळावी अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री बापट यांनी शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव तपासून किती जागेची आवश्यकता आहे आणि किती जागा देणे शक्य आहे हे तपासून याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. त्यामुळे आता म्हाळुंगे गावासाठी मंजूर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.