शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

चर्चेत अडकला मेट्रो प्रकल्प

By admin | Updated: December 27, 2014 05:06 IST

तथाकथित मेट्रो प्रकल्प नव्या केंद्र व राज्य शासनाच्या चर्चे$च्या फेऱ्यांमध्येच अद्यापही असल्याचे शुक्रवारी दिसून आले.

पुणे : तथाकथित मेट्रो प्रकल्प नव्या केंद्र व राज्य शासनाच्या चर्चे$च्या फेऱ्यांमध्येच अद्यापही असल्याचे शुक्रवारी दिसून आले. खासदार अनिल शिरोळे यांनी ही रेल्वे भुयारी की जमिनीवरून होणार, जुन्या डी.पी.आर.मध्ये (सविस्तर प्रकल्प अहवाल) कोणत्या चुका आहेत, याबाबत संदिग्ध उत्तरे दिली आणि स्वस्त व चांगली मेट्रो पुणेकरांना देऊ असेही सांगितले. संसदेत पुण्यातील प्रश्नांविषयी उपस्थित केलेल्या बाबींची माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. आमदार मेधा कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. शिरोळे म्हणाले, ‘‘मेट्रो प्रकल्पाचा अहवाल सदोष असून, मध्य पुण्यात तसेच भुयारी मार्ग करण्याच्या खर्चात गेल्या काही वर्षांत झालेली लक्षणीय घट विचारात घेतलेली नाही. पुणेकरांसाठी गैरसोयीची रचना अंगीकारली गेली आहे. या बाबींचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.’’यूपीए सरकारने फेब्रुवारीमध्ये पाठविलेल्या पत्रातील महत्त्वाच्या मुद्दांचाही विचार झालेला नाही, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी बारकाईने या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याशिवाय मंजूर करणार नसल्याचे सांगितले आहे, असेही शिरोळे यांनी सांगितले.जुन्या डी.पी.आर.मध्ये काय दोष आहेत असे विचारले असता, शिरोळे यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. प्रकल्प आजवर केवळ चर्चेत आहे, तो कधी पूर्ण होणार, असे विचारले असता शिरोळे यांनी आगामी वर्षात सुरू करू, असे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री गिरीश बापट यांनी जुन्या डी.पी.आर.नुसार मेट्रो होईल, असे सांगितल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर या चर्चा केवळ वर्तमानपत्रांतून होत आहेत, असा दावा शिरोळे यांनी केला. मेट्रो भुयारी मार्गातून की रस्त्यावरून याबाबत योग्य निर्णय होईल, असे शिरोळे यांनी सांगितले.आमदार कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘दोन दिवसांपूर्वी पुण्यातील प्रश्नांविषयी बापट यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. या प्रकल्पावर चर्चा झाल्याशिवाय चुकीचे काही होऊ देणार नाही. एखादा महिना उशीर झाला तर तो पुणेकरांच्या हिताचाच असेल.’’(प्रतिनिधी)