शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

पुणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:52 IST

घटना घडल्यानंतर पावणेअकरा वाजता त्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून समजली.

राजू इनामदार 

पुणे : आपत्तीच्या काळात कसोटी लागणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा शहराला फारसा उपयोग नाही, हेच गुरुवारी झालेल्या कालवाफुटीने सिद्ध केले. गर्दीपासून मदतीपर्यंत कशाचेही व्यवस्थापन या काळात पुरेशा प्रभावीपणे झालेले नाही, असाच या काळात तिथे काम करणाºया स्थानिक कार्यकर्त्यांचा अनुभव आहे.

घटना घडल्यानंतर पावणेअकरा वाजता त्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून समजली. त्यांनी त्याबाबत तहसील कार्यालयाला कळवले. त्यानंतरचे आपत्ती व्यवस्थापनाचे काम सर्व यंत्रणांना जागे करण्याचे, त्यांच्याशी समन्वय ठेवण्याचे, ते घटनास्थळी गेले आहेत किंवा नाही हे पाहण्याचे, त्यांचे काम सुरू झाले आहे की नाही ते तपासण्याचे आहे असे सोनुने यांचे म्हणणे आहे. त्याप्रमाणे आपण अग्निशमन विभाग, वाहतूक शाखा, पोलिस, वीज वितरण मंडळ, आरोग्य विभाग, महापालिकेची त्या विभागातील क्षेत्रीय कार्यालये, त्यांचे प्रमुख अधिकारी यांना कळवले असे त्यांनी सांगितले. त्यानंतर या सर्व यंत्रणांनी घटनास्थळी त्वरीत उपस्थित राहणे, व कामाला सुरूवात करणे गरजेचे होते.प्रत्यक्षात तसे झाले नाही असे घटनास्थळी गेलेले स्थानिक नगरसेवक धीरज घाटे यांनी ठामपणे सांगितले. काहीवेळाने तिथे शिवदर्शन मधील नगरसेवक आबा बागूल त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत आले. शंकर पवार, आनंद रिठे हे स्थानिक नगरसेवकही तिथे आले. त्यानंतर पोलिस व अग्निशमन दलाची वाहने तसेच मनुष्यबळ तिथे आले. मात्र त्यांच्या कामात नियोजन नव्हते. पोलिसांचे काम बघ्यांची गर्दी नियंत्रीत करण्याचे, मात्र त्यांच्यातील काही पोलिस पाणी घुसले त्या वसाहतींमध्ये जाऊन तिथे अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. वाहतूक शाखेने वाहतूक नियंत्रण करणे गरजेचे असताना ते गर्दी नियंत्रीत करत होते. तर अग्निशमन दलाच्या जवानांना पाण्याचा लोंढा इतका जोराचा येत होता की बराच वेळ काय करायचे तेच सुचत नव्हते. यंत्रणा उपस्थित झाल्या, मात्र सगळेच मदतकार्याला गुंतले. थोड्याच वेळात तिथे मदतीला जाणारे व मदतीची गरज असणारे एकत्रच होऊन गेले. पुराच्या काळात आवश्यक असणारी लाईफ जॅकेटस् वगैरे आणलेलीच नव्हती. त्यामुळे जवानांनी वाहनात असलेले दोरखंड वापरून मदत कार्य सुरू केले. त्याचीही गर्दी झाली. बघे त्यात घूसू लागले. त्यामुळे जे मदत करत होते त्यांना ती नीट करताही येईना. दरम्यानच्या काळात पाटबंधारे विभागाबरोबर संपर्क साधून कालव्यात पाणी सोडणे बंद करणे गरजेचे होते. पाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरूच होता असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Puneपुणे