शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भुशी धरण बंदमुळे पर्यटकांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2016 04:11 IST

लोणावळा शहर व धरण परिसरात मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरूअसल्याने परिसरातील सर्व धरणे भरली असून, डोंगरमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू

लोणावळा : लोणावळा शहर व धरण परिसरात मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरूअसल्याने परिसरातील सर्व धरणे भरली असून, डोंगरमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. परिसरात झालेल्या पावसाने भुशी धरण ओव्हर फ्लो झाले. धरणाच्या भिंतीवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने धरणाकडे, तसेच लायन्स पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर गुडघाभर पाणी होते. अनेक दुकांनामध्ये पाणी घुसले होते. लायन्स पॉइंट व भुशी धरणाचा परिसर डोंगरमय असल्याने लोणावळा शहरापेक्षा त्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. तसेच मोठ्या प्रमाणात धुके असल्याने समोरचा मार्गही नीट दिसत नाही. त्यातच भुशी गावाला जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने धोकादायक म्हणून जाहीर केल्याने या भागात काही दुर्घटना घडू नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळे दोन दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पर्यटनस्थळे अजून काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.पावसाळी पर्यटनासाठी घाटमाथ्यावरील पर्यटकांची पंढरी म्हणून ओळख असणारे व मध्य रेल्वेच्या मालकीचे असलेले भुशी धरण हे ब्रिटिश काळात १९०६ साली बांधण्यात आले आहे. ते तब्बल ११० वर्षांचे झाले असल्याने महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ते बंद ठेवण्यात आले. धरणाच्या पायऱ्यांवरून अतिशय वेगाने पाणी वाहत असल्याने पर्यटकांसाठी ते धोकादायक आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर भिंतीवरून पाणी वाहून रस्त्यावर येत असल्याने, तसेच सहारा पूल ते आयएनएस शिवाजी गेटदरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत असल्याने ही पर्यटनस्थळे बंद ठेवली असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. याकरिता कुमार चौक, रायवूड उद्यान व सहारा पूल येथे पोलिसांनी बंदोबस्त तैनात करत पर्यटकांना पर्यटनस्थळांकडे जाण्यास मज्जाव करत माघारी पाठविल्याने पर्यटकांचीदेखील निराशा झाली. मात्र, हे सर्व तुमच्या सुरक्षिततेकरिताच केले असल्याचे पोलीस कर्मचारी पर्यटकांना समजावत होते. पुणे ग्रामीण पोलीस दलातील बॉम्बशोधक पथकदेखील सहारा पूल येथे तैनात करण्यात आले होते. या पथकातील राधिका हे श्वानदेखील या वेळी वाहनांची तपासणी करताना पथकाच्या सोबत होते.पर्यटनस्थळे बंद ठेवल्याने ऐन सिझनमध्ये तेथील विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवावी लागली. बंदीमुळे आणि पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने पर्यटकही फिरकले नाहीत. (वार्ताहर)