शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

असुरक्षित ऊसवाहतुकीकडे डोळेझाक

By admin | Updated: February 28, 2015 02:20 IST

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रक जात असल्यास प्रमाणाहून अधिक भरलेला ऊस कधीही ढासळणे, तोल गेल्याने संपूर्ण ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार सध्या

अंकुश जगताप, पिंपरीऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रक जात असल्यास प्रमाणाहून अधिक भरलेला ऊस कधीही ढासळणे, तोल गेल्याने संपूर्ण ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. परिणामी ट्रॅक्टर, ट्रकपासून इतरांना जीव मुठीत घेऊनच मार्ग काढण्याची वेळ येत आहे. वाहतूक नियम धाब्यावर बसवून चालकांकडून बेदरकारपणे ऊसवाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याचे उघड झाले आहे. मोठी दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का, असा प्रश्न चालकांमधून उपस्थित होत आहे. परिसरामध्ये श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यासह लगतच्या इतर साखर कारखान्यांसाठी कार्यक्षेत्रातील मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर आदी तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या उसाचा पुरवठा केला जातो. हा ऊस नेताना संबंधित वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार ट्रॅक्टर ते ट्रॉलीची लांबी १८ मीटर ठेवणे बंधनकारक असताना दोन ट्रॉली जोडण्याचा धोका पत्करला जात आहे. ट्रॉली व ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जादा ऊस लादला जात आहे. त्यामुळे अ‍ॅक्सल, पाटे तुटणे, चाक निखळण्याचे प्रकार होतात. ऊस बाहेर पडू नये यासाठी ट्रॉलीला बाजूने जोडावयाच्या लोखंडी डांबांचा अभाव दिसतो. तात्पुरते लाकडी खांब लावून ऊस रचला जात आहे. त्यामुळे हादरे बसून ढिला झालेला ऊस बहुधा रस्त्यावर ढासळतो. अनेकदा ऊस एका बाजूला कलल्यामुळे (विशेषत: चढणीच्या, खड्डेमय रस्त्यांवर) ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार वाढत आहे. त्यातच ट्रॅक्टरला एकामागे एक जोडलेल्या ट्रॉलीला मागील बाजूस इंडिकेटर नसतात. एखाद्या वळणावर, महामार्गावर ट्रॅक्टर अचानक वळविला जातो. अशा वेळी काहीच न कळल्याने मागून येणाऱ्यांना अपघाताचा धोका नित्याचा झाला आहे. याकडे वाहतूक पोलीस, तसेच परिवहन प्रशासनाने आजवर गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी ही वाहने रस्त्यावरून धोक्याची घंटा वाजवीत बिनदिक्कत धावत आहेत. अशा वाहनचालकांसाठी खास प्रशिक्षण देणे, वेळोवेळी मार्गदर्शनपर व्याख्यानांच्या आयोजनाबरोबरच प्रसंगी दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. देशभरातील रस्तेवाहतूक सुरक्षा मोहीम यशस्वी ठरण्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसानही होणार नाही असा सुवर्णमध्य साधत मार्ग काढण्याची गरज व्यक्त होत आहे.