शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

असुरक्षित ऊसवाहतुकीकडे डोळेझाक

By admin | Updated: February 28, 2015 02:20 IST

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रक जात असल्यास प्रमाणाहून अधिक भरलेला ऊस कधीही ढासळणे, तोल गेल्याने संपूर्ण ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार सध्या

अंकुश जगताप, पिंपरीऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रक जात असल्यास प्रमाणाहून अधिक भरलेला ऊस कधीही ढासळणे, तोल गेल्याने संपूर्ण ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. परिणामी ट्रॅक्टर, ट्रकपासून इतरांना जीव मुठीत घेऊनच मार्ग काढण्याची वेळ येत आहे. वाहतूक नियम धाब्यावर बसवून चालकांकडून बेदरकारपणे ऊसवाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याचे उघड झाले आहे. मोठी दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का, असा प्रश्न चालकांमधून उपस्थित होत आहे. परिसरामध्ये श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यासह लगतच्या इतर साखर कारखान्यांसाठी कार्यक्षेत्रातील मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर आदी तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या उसाचा पुरवठा केला जातो. हा ऊस नेताना संबंधित वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार ट्रॅक्टर ते ट्रॉलीची लांबी १८ मीटर ठेवणे बंधनकारक असताना दोन ट्रॉली जोडण्याचा धोका पत्करला जात आहे. ट्रॉली व ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जादा ऊस लादला जात आहे. त्यामुळे अ‍ॅक्सल, पाटे तुटणे, चाक निखळण्याचे प्रकार होतात. ऊस बाहेर पडू नये यासाठी ट्रॉलीला बाजूने जोडावयाच्या लोखंडी डांबांचा अभाव दिसतो. तात्पुरते लाकडी खांब लावून ऊस रचला जात आहे. त्यामुळे हादरे बसून ढिला झालेला ऊस बहुधा रस्त्यावर ढासळतो. अनेकदा ऊस एका बाजूला कलल्यामुळे (विशेषत: चढणीच्या, खड्डेमय रस्त्यांवर) ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार वाढत आहे. त्यातच ट्रॅक्टरला एकामागे एक जोडलेल्या ट्रॉलीला मागील बाजूस इंडिकेटर नसतात. एखाद्या वळणावर, महामार्गावर ट्रॅक्टर अचानक वळविला जातो. अशा वेळी काहीच न कळल्याने मागून येणाऱ्यांना अपघाताचा धोका नित्याचा झाला आहे. याकडे वाहतूक पोलीस, तसेच परिवहन प्रशासनाने आजवर गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी ही वाहने रस्त्यावरून धोक्याची घंटा वाजवीत बिनदिक्कत धावत आहेत. अशा वाहनचालकांसाठी खास प्रशिक्षण देणे, वेळोवेळी मार्गदर्शनपर व्याख्यानांच्या आयोजनाबरोबरच प्रसंगी दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. देशभरातील रस्तेवाहतूक सुरक्षा मोहीम यशस्वी ठरण्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसानही होणार नाही असा सुवर्णमध्य साधत मार्ग काढण्याची गरज व्यक्त होत आहे.