शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ई-बसमध्येही प्रवाशांकडून घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:25 IST

शहरातील रस्त्यांवर पहिल्यांदाच वातानुकूलित ईलेक्ट्रिक बस धावू लागल्याने सगळ्यांनाच अपु्रप वाटत आहे. प्रवाशांकडूनही या बसला चांगला प्रतिसाद मिळतोय.

पुणे : शहरातील रस्त्यांवर पहिल्यांदाच वातानुकूलित ईलेक्ट्रिक बस धावू लागल्याने सगळ्यांनाच अपु्रप वाटत आहे. प्रवाशांकडूनही या बसला चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेकदा गर्दी ओव्हरफ्लो होत आहे. सध्या केवळ सातच मार्गांवर बसचे संचलन सुरू आहे. पुढील काही महिन्यांत आणखी १२५ बस बस बीआरटी मार्गांवर धावू लागतील. पण, सध्या बसला होणारी गर्दी, बीआरटी मार्गांची दुरवस्था, काही बेशिस्त चालक, वाहनांची प्रचंड कोंडी या कारणांमुळे ई-बसही खिळखिळ्या होण्यास वेळ लागणार नाही, असे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील काही अधिकारीच बोलत आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सात मार्गांवर ई-बस धावत आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर या बस दाखल झाल्याने प्रवाशांकडून या एसी बसचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे संबंधित मार्गावरील अनेक प्रवासी या बसमध्ये बसण्यासाठी उत्सुक आहेत. तर नेहमी रिक्षाने जाणाऱ्यांची पावलेही ई-बस पाहून थबकत आहेत. ही ‘स्मार्ट’ सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. पुढील दोन महिन्यांत आणखी १२५ ई-बस येण्यास सुरुवात होईल. या १२ मीटर लांबीच्या बस बीआरटी मार्गांवर सोडण्याचे नियोजन आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात निम्म्यांहून अधिक बसचे वयोमान संपल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या मनात या बसबाबत नाराजी आहे. हीच स्थिती ई-बसचीही होण्याची भीती काही अधिकारी व्यक्त करीत आहेत.

अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार, नऊ मीटर लांबीच्या ई-बसमध्ये ३१ तर १२ मीटर बसमध्ये सुमारे ५१ प्रवाशांसाठी आसन व्यवस्था आहे. सध्याच्या पीएमपीच्या जुन्या बसमधून ७० ते १०० प्रवासी दररोज प्रवास करतात. बसची वारंवारिता व संख्या पाहता हीच अवस्था ई-बसचीही होऊ लागली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याने ई-बसची बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते. एसीच्या यंत्रणेवरही ताण पडेल. त्यामुळे बॅटरीच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. अर्थात नवीन बसमुळे लगेचच परिणाम दिसून येणार नाही. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बहुतेक बीआरटी मार्गांची सध्याची स्थिती खूपच दयनीय आहे.काही बेशिस्त प्रवाशांकडून या बसमध्येही थुंकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. याबाबत प्रशासनाकडे चालक व वाहकांच्या तक्रारी आल्या आहेत. थुंकल्यामुळे बस खराब होऊन इतर प्रवाशांनाही त्रास होतो. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करतात. पण प्रशासन हतबल आहे. संबंधितांना शोधणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनेक चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. भरधाव वेगात बस नेण्याचे प्रकार सातत्याने घडतात. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अशा अपघातांमुळे ई-बसचे मोठे नुकसान होऊ शकते. ही एक बस सुमारे सव्वा कोटी रुपयांची आहे. त्यामुळे देखभाल-दुरूस्तीचा खर्चही मोठा आहे. संबंधित कंपनीच हे काम करणार असल्याने पीएमपीवर भार पडणार नाही, असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन