शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

ई-बसमध्येही प्रवाशांकडून घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:25 IST

शहरातील रस्त्यांवर पहिल्यांदाच वातानुकूलित ईलेक्ट्रिक बस धावू लागल्याने सगळ्यांनाच अपु्रप वाटत आहे. प्रवाशांकडूनही या बसला चांगला प्रतिसाद मिळतोय.

पुणे : शहरातील रस्त्यांवर पहिल्यांदाच वातानुकूलित ईलेक्ट्रिक बस धावू लागल्याने सगळ्यांनाच अपु्रप वाटत आहे. प्रवाशांकडूनही या बसला चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेकदा गर्दी ओव्हरफ्लो होत आहे. सध्या केवळ सातच मार्गांवर बसचे संचलन सुरू आहे. पुढील काही महिन्यांत आणखी १२५ बस बस बीआरटी मार्गांवर धावू लागतील. पण, सध्या बसला होणारी गर्दी, बीआरटी मार्गांची दुरवस्था, काही बेशिस्त चालक, वाहनांची प्रचंड कोंडी या कारणांमुळे ई-बसही खिळखिळ्या होण्यास वेळ लागणार नाही, असे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील काही अधिकारीच बोलत आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सात मार्गांवर ई-बस धावत आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर या बस दाखल झाल्याने प्रवाशांकडून या एसी बसचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे संबंधित मार्गावरील अनेक प्रवासी या बसमध्ये बसण्यासाठी उत्सुक आहेत. तर नेहमी रिक्षाने जाणाऱ्यांची पावलेही ई-बस पाहून थबकत आहेत. ही ‘स्मार्ट’ सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. पुढील दोन महिन्यांत आणखी १२५ ई-बस येण्यास सुरुवात होईल. या १२ मीटर लांबीच्या बस बीआरटी मार्गांवर सोडण्याचे नियोजन आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात निम्म्यांहून अधिक बसचे वयोमान संपल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या मनात या बसबाबत नाराजी आहे. हीच स्थिती ई-बसचीही होण्याची भीती काही अधिकारी व्यक्त करीत आहेत.

अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार, नऊ मीटर लांबीच्या ई-बसमध्ये ३१ तर १२ मीटर बसमध्ये सुमारे ५१ प्रवाशांसाठी आसन व्यवस्था आहे. सध्याच्या पीएमपीच्या जुन्या बसमधून ७० ते १०० प्रवासी दररोज प्रवास करतात. बसची वारंवारिता व संख्या पाहता हीच अवस्था ई-बसचीही होऊ लागली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याने ई-बसची बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते. एसीच्या यंत्रणेवरही ताण पडेल. त्यामुळे बॅटरीच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. अर्थात नवीन बसमुळे लगेचच परिणाम दिसून येणार नाही. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बहुतेक बीआरटी मार्गांची सध्याची स्थिती खूपच दयनीय आहे.काही बेशिस्त प्रवाशांकडून या बसमध्येही थुंकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. याबाबत प्रशासनाकडे चालक व वाहकांच्या तक्रारी आल्या आहेत. थुंकल्यामुळे बस खराब होऊन इतर प्रवाशांनाही त्रास होतो. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करतात. पण प्रशासन हतबल आहे. संबंधितांना शोधणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनेक चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. भरधाव वेगात बस नेण्याचे प्रकार सातत्याने घडतात. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अशा अपघातांमुळे ई-बसचे मोठे नुकसान होऊ शकते. ही एक बस सुमारे सव्वा कोटी रुपयांची आहे. त्यामुळे देखभाल-दुरूस्तीचा खर्चही मोठा आहे. संबंधित कंपनीच हे काम करणार असल्याने पीएमपीवर भार पडणार नाही, असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन