शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
5
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
6
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
7
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
8
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
9
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
12
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
13
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
14
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
15
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
16
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
17
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
18
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
19
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

कर्तृत्वाचा सन्मान गरजेचा

By admin | Updated: January 9, 2017 02:48 IST

विधवेचे स्त्रीत्व सन्मानित करण्याची भूमिका महात्मा जोतिबा फुले यांनी घेतली. मात्र, विधवेचे मातृत्व सन्मानित करण्याचे मोलाचे कार्य सावित्रीबाई फुले

पिंपरी : विधवेचे स्त्रीत्व सन्मानित करण्याची भूमिका महात्मा जोतिबा फुले यांनी घेतली. मात्र, विधवेचे मातृत्व सन्मानित करण्याचे मोलाचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. महात्मापणाला शोभेल असे कर्तृत्व भारत आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी रुजविले. सावित्रीबाईंना इतिहासाने महात्मा पदवी दिली नाही. तथापि, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने तरी त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करताना महात्मा म्हणून त्यांना वंदन केले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी येथे केले. महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोहळ्यात विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी आमदार दीप्ती चौधरी, कलाकार प्रज्ञा पाटील व्यासपीठावर होत्या. डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांचे माहात्म्यपण सर्वार्थाने पेलून नेणाऱ्या सावित्रीबाईंचे योगदानही समजून घेण्याची गरज आहे. बहुजनांना शिक्षणाची दारे बंद झालेल्या कालखंडात फुले यांनी शाळा काढल्या. पण, सावित्रीबाईंनी या शाळा चालविल्या. दलितांना शिक्षणाचे धडे दिले. एवढेच नव्हे, तर ब्राह्मण समाजाने शिक्षण नाकारलेल्या ब्राह्मणांच्या मुलींनाही ज्ञान देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या घरातूनही त्यांना विरोध झाला. पण, हा विरोध पत्करून त्यांनी समाजसुधारणेचे काम केले. ती आद्यशिक्षिका, लोकशिक्षिका आहे. समाजप्रबोधन करून सत्याच्या अटीमध्ये सबंध माणुसकीचा गहिवर पेरणारी ती माऊली आहे.’’‘‘आजचा महाराष्ट्र आपल्याला जातिमुक्त करायचा असेल, धार्मिक ऐक्य घडवून आर्थिकदृष्ट्याही संपन्न करायचा असेल, मानवतावादाची आपल्याला पुन्हा पेरणी करायची असेल, तर समाजात आग लावणाऱ्या जाती-धर्माचे भांडणे लावणाऱ्या सर्व प्रवृत्ती आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतील. तरच आपण महात्मा आणि सावित्रीबाईंचे वारस ठरू शकू,’’ असेही ते म्हणाले. मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा चव्हाण, दत्तात्रेय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. महादेव भुजबळ यांनी आभार मानले. विश्वास राऊत, नितीन ताजणे, अनिल साळुंखे, शंकर जाठे, जतिन क्षीरसागर, वैजनाथ माळी, राजेंद्र बरके, श्रीहरी हराळे, विजय देडगे, नरहरी शेवते यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)