शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
4
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
5
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
6
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
7
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
8
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
9
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
10
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
11
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
12
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
13
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
14
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
15
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
16
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
17
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
18
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
19
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
20
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश

लसींच्या दरातील फरक म्हणजे केद्रांची नफेखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना लसीच्या दरांमधील फरक हे केंद्र सरकारमध्ये व्यापारी बसले असून त्यांच्या नफेखोरीचे उदाहरण आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना लसीच्या दरांमधील फरक हे केंद्र सरकारमध्ये व्यापारी बसले असून त्यांच्या नफेखोरीचे उदाहरण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अनिल देशमुख यांच्यावर होत असलेली कारवाई म्हणजे मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असा आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकारने देशवासीयांना कोरोना लस विनामूल्य उपलब्ध करून द्यावी, अशी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी करणारे निवेदन पटोले यांनी शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिले. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे व अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

पत्रकारांबरोबर बोलताना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. दोघेही विनामास्क फिरतात, त्यांनी कोणते इंजेक्शन घेतले माहिती नाही अशी खिल्ली उडवत पटोले म्हणाले की, मोदींनीच कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे असे जाहीर केले होते. आता ते राज्यांवर जबाबदारी ढकलत आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांंनी नियोजन करून आपल्या देशाला कोरोना मुक्त केले. आपल्या प्रमुखाकडे नियोजन नाही. लसी, ऑक्सिजन, आरोग्य सेवा यापैकी कशाचेही नियोजन त्यांनी केले नाही. राज्य त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, मात्र केंद्र सरकार काहीही करायला तयार नाही.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिल्यावर पटोले यांनी त्यांच्याकडून जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती घेतली. राव व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे काम चांगले आहे, दोघेही अनुभवी आहेत असे त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्र्यांना सांगितले. केंद्र सरकारने दुष्मन देश असलेल्या पाकिस्तानला कोरोना लस फुकटात पुरवली आहे, असा आरोप पटोले यांनी यावेळी केला. राज्य सरकारने केंद्राकडे परदेशातून लसी आयात करण्याची परवानगी मागितली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

--राहुल, मनमोहन सिंग यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष--

त्यांच्या भाडोत्री कार्यकर्त्यांनी राहुल गांधी, मनमोहनसिंग यांच्या सल्ल्याची टिंगल केली. पण आता त्याप्रमाणेच काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. राहुल गांधी, मनमोहनसिंग दिल्लीत विरोधात असूनही केंद्र सरकारला कोरोनासंदर्भात चांगले सल्ले देत आहेत आणि महाराष्ट्रात विरोधी पक्ष मध्यरात्री दमणवरून रेमडेसिविर आणण्यात गुंतले आहेत, अशी टीका पटोले यांनी महाराष्ट्र भाजपवर केली.

--देशमुखांवर कारवाई म्हणजे दिशाभूल--

अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत आहे ती करण्याची ही वेळ नाही. आता कोरोनाविरोधात लढायला हवे. पण तेथील चुका लक्षात येऊ नयेत, यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात आहे, असा आरोप पटोले यांनी केला. राज्यांतर्गत प्रवासाला बंदी, कोरोना लसींचे वितरण ही सगळी केंद्र सरकारची जबाबदारी आहे. लसींचे सगळे अधिकार त्यांनी स्वतःकडे ठेवले आहेत.

फोटो - नाना पटोले

आेळी - विभागीय आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. सोबत काँग्रेसचे पदाधिकारी.