शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकांना घाबरून कोरोना पळाला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:10 IST

पाचही राज्यांत चाचण्या कमी, रुग्णही कमी : महाराष्ट्र रुग्णसंख्येत देशात अववल प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ...

पाचही राज्यांत चाचण्या कमी, रुग्णही कमी : महाराष्ट्र रुग्णसंख्येत देशात अववल

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे, पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात हजारो नागरिकांची विनामास्क गर्दी होत आहे. निवडणुकांना घाबरून ठराविक राज्यांमधील कोरोना घाबरून पळून गेला का, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारसभांना वेग आला आहे. यावेळी हजारोंची विनामास्क गर्दी होत आहे. ‘कोरोना अनुरूप वागणूक’ या राज्यांमध्ये सक्तीची नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत तिथे कोरोना रुग्ण वाढल्याची बातमी नाही. महाराष्ट्रात होणाऱ्या चाचण्या इतर राज्यांच्या तुलनेत कितीतरी पटींनी अधिक आहेत. त्या तुलनेत दररोजच्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या, मृत्यूदरही देशात सर्वाधिक आहे. इतर राज्यांमध्ये मास्कचा कमी वापर, सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराचा फज्जा अशी स्थिती असतानाही केवळ महाराष्ट्रातच कोरोना वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.

२५ मार्चच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एका दिवशी ३५९५२ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये ४६२, केरळमध्ये ४१, आसाममध्ये केवळ ४० रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्राचा मृत्युदर २.०९ टक्के, पश्चिम बंगालमध्ये १.७७ टक्के, तमिळनाडूमध्ये १.४५ टक्के तर आसाममधील मृत्युदर ०.५१ टक्के इतका नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रात दर २५ मार्च रोजी १,२०,०० चाचण्या झाल्या. बंगालमध्ये याच दिवशी ५६,७४०, तमिळनाडूमध्ये ८०,६३४, तर आसाममध्ये १५,७५६ इतक्या चाचण्या झाल्या.

महाराष्ट्र पहिल्यापासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. दुसऱ्या लाटेचाही सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. सर्व राज्यांमधील लोकसंख्या, हवामान, विषाणूच्या प्रसाराचा वेग, चाचण्यांची संख्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या सर्व निकषांचा बारकाईने अभ्यास होण्याची गरज वैद्यकतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

--------

राज्य चाचण्या एकूण रुग्ण मृत्यू

महाराष्ट्र १८७७६६०३ २५६४८८१ ५३६८४

बंगाल ९०१५०७१ ५८१८६५ १०३१२

तमिळनाडू १९०११११८ ८७१४४० १२६३०

आसाम ७१७००३० २१८०९९ ११०३