शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

धोमबलकवडीच्या कालव्याला राहणार बारमाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST

भोर: शेतीला पाणी मिळावे यासाठी धोमबलकवडी धरणाच्या पाण्यावर टिटेघर-कोर्ले उपसा जलसिंचन योजनेने पाणी पुरवले जाणार आहे. त्याचबरोबर हे पाणी ...

भोर: शेतीला पाणी मिळावे यासाठी धोमबलकवडी धरणाच्या पाण्यावर टिटेघर-कोर्ले उपसा जलसिंचन योजनेने पाणी पुरवले जाणार आहे. त्याचबरोबर हे पाणी कमी पडू नये यासाठी म्हाकोशी येथील बंधाऱ्यातून आणखी एक उपसा जलसिंचन योजना राबवली जाणार आहे. यामुळे धोमबलकवडी धरणाच्या कालव्याला बाराही महिने पाणी राहिली तसा प्रस्ताव शासनास सादर केला आहे त्यास लवकरच मान्यता मिळणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

आंबवडे खोऱ्यातील टिटेघर येथील दोन कोटी २० लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांचे हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी टिटेघर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष केळकर व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. कार्यक्रमास कृष्णाजी शिनगारे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जि. प.सदस्य विठठल आवाळे, आनंदराव आंबवले, राजेश काळे, धनंजय वाडकर, सुभाष कोंढाळकर, बाळासाहेब शिंदे, नितीन दामगुडे, पांडुरंग धोंडे, चंद्रकांत मळेकर, अँड.राजेंद्र खोपडे, शिवाजी नाटंबे, लक्ष्मण पारठे, राजेंद्र घोलप उपस्थित होते.

आमदार थोपटे म्हणाले, या भागातील शेतीचे व बंधाऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रस्ताव शासनास सादर केले आहेत. तसेच रायरेश्वर किल्ल्यावरील सुविधांसाठी १ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मजूर होता. माञ त्याचे काम सुरुच झाले नव्हते म्हणून हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असून हे काम आता मार्गी लागणार आहे. टिटेघर च्या शाळेला दुरुस्ती साठी १० लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या भागातील विकास कामांसाठी प्रस्ताव आणि निधी काँग्रेसने द्यायचा आणि त्याचे श्रेय सोशल मीडियाद्वारे दुसऱ्याने घ्यायचा असा प्रकार पहायला मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संतोष केळकर म्हणाले, आम्ही कायम पराजयाचा खेळ- खेळलो. ज्यांना निवडून दिले त्यांनीच आम्हाला लाथ मारली. यापुढे ही चूक करणार नसून आमदार संग्राम थोपटे यांचे पाठीशी ठाम उभे राहून काँग्रेसला ताकद देण्याचे काम करणार आहे.

०५ भोर

आंबवडे टिटेघर रस्ता उदाघाटन करताना आ संग्राम थोपटे