शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

धोमबलकवडीच्या कालव्याला राहणार बारमाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST

भोर: शेतीला पाणी मिळावे यासाठी धोमबलकवडी धरणाच्या पाण्यावर टिटेघर-कोर्ले उपसा जलसिंचन योजनेने पाणी पुरवले जाणार आहे. त्याचबरोबर हे पाणी ...

भोर: शेतीला पाणी मिळावे यासाठी धोमबलकवडी धरणाच्या पाण्यावर टिटेघर-कोर्ले उपसा जलसिंचन योजनेने पाणी पुरवले जाणार आहे. त्याचबरोबर हे पाणी कमी पडू नये यासाठी म्हाकोशी येथील बंधाऱ्यातून आणखी एक उपसा जलसिंचन योजना राबवली जाणार आहे. यामुळे धोमबलकवडी धरणाच्या कालव्याला बाराही महिने पाणी राहिली तसा प्रस्ताव शासनास सादर केला आहे त्यास लवकरच मान्यता मिळणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

आंबवडे खोऱ्यातील टिटेघर येथील दोन कोटी २० लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांचे हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी टिटेघर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष केळकर व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. कार्यक्रमास कृष्णाजी शिनगारे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जि. प.सदस्य विठठल आवाळे, आनंदराव आंबवले, राजेश काळे, धनंजय वाडकर, सुभाष कोंढाळकर, बाळासाहेब शिंदे, नितीन दामगुडे, पांडुरंग धोंडे, चंद्रकांत मळेकर, अँड.राजेंद्र खोपडे, शिवाजी नाटंबे, लक्ष्मण पारठे, राजेंद्र घोलप उपस्थित होते.

आमदार थोपटे म्हणाले, या भागातील शेतीचे व बंधाऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रस्ताव शासनास सादर केले आहेत. तसेच रायरेश्वर किल्ल्यावरील सुविधांसाठी १ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मजूर होता. माञ त्याचे काम सुरुच झाले नव्हते म्हणून हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असून हे काम आता मार्गी लागणार आहे. टिटेघर च्या शाळेला दुरुस्ती साठी १० लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या भागातील विकास कामांसाठी प्रस्ताव आणि निधी काँग्रेसने द्यायचा आणि त्याचे श्रेय सोशल मीडियाद्वारे दुसऱ्याने घ्यायचा असा प्रकार पहायला मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संतोष केळकर म्हणाले, आम्ही कायम पराजयाचा खेळ- खेळलो. ज्यांना निवडून दिले त्यांनीच आम्हाला लाथ मारली. यापुढे ही चूक करणार नसून आमदार संग्राम थोपटे यांचे पाठीशी ठाम उभे राहून काँग्रेसला ताकद देण्याचे काम करणार आहे.

०५ भोर

आंबवडे टिटेघर रस्ता उदाघाटन करताना आ संग्राम थोपटे