शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशा पथकांना ‘सामाजिक बांधिलकी’चा नाद

By admin | Updated: July 8, 2017 02:37 IST

सार्वजनिक गणेशोत्सवात जल्लोषात ढोलपथके आपल्या वादनाने आसमंत दुमदुमून सोडतात. या पथकांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सार्वजनिक गणेशोत्सवात जल्लोषात ढोलपथके आपल्या वादनाने आसमंत दुमदुमून सोडतात. या पथकांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे पथकांमध्ये सामावलेली संघटनेची मोठी ताकद आहे. या पथकांच्या एका छताखाली ही सर्व तरुणाई आपल्या छंदात रममाण होते. पण या काही महिन्यांच्या सराव कालखंडानंतर वा उत्सवानंतर ही सर्व मंडळी कधी एकत्र येतात का? असा सहज प्रश्न मनाला भिडतो आणि पावले जेव्हा याचे उत्तर शोधण्यासाठी या पथकांकडे वळतात आणि त्यातून समोर येते ढोलताशा पथकांच्या सामाजिक बांधिलकीच्या मोहिमेतले अभूतपूर्व योगदान. दिवसेंदिवस समाजातील माणुसकी संपत चालल्याचे प्रसंग समोर घडत असताना आणि प्रत्येकामधील वाढत्या आत्मकेंद्री स्वभावाच्या पार्श्वभूमीवर हे ढोलपथकांच्याद्वारे उभे राहिलेले सामाजिक कार्याचे चित्र समाजाला आदर्शदायी व सुखावह आहे. या ढोलपथकाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न व मनुष्यबळ यांचा संयोग घडवत ही ढोलपथके अनेक सामाजिक उपक्रम खेडेगावात, वाड्यावस्त्यांवर, तसेच शहरातील झोपडपट्टी, दुर्लक्षित भागात सक्रियतेने करताना दिसतात. काही मित्रांनी फेसबुकवर त्यांच्या ढोलपथकांनी केलेले रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आदी उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या ढोलपथकांवर सरावाच्या दरम्यान जी काही अन्यायकारक कारवाई केली जाते, त्याला हे कार्य चपखल उत्तर आहे. ही तरुणाई एरवी पेन वा छोटीशी आपली गोष्टही कुणाला देणार नाही. कुठे दिसो वा नसो; पण या पथकांच्या उपक्रमात हे हमखास सहभागी होताना दिसतात. वेल्ह्याच्या पुढे एका खेडेगावातील पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आमच्या रमणबाग व इतर काही पथके मिळून विहीर खोदण्याचे कार्य दोन वर्षांपासून सुरू केले आहे. दुष्काळाच्या वेळी पथकांतर्फे डाळींसह विविध प्रकारचे धान्य त़्या भागात पोहोचविण्याचे काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला. वृक्षारोपणाने ही मोठी चळवळ राबविली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खूप आनंद या सामाजिक कार्यातून मिळतो.- महेश लिमये, रमणबाग ढोल पथकस्वरुपवर्धिनीद्वारे वर्षभर गरजू विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम राबविला जातो. विविध प्रसंगी स्त्रीभ्रूणहत्या, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दहशतवाद आदी सामाजिक प्रश्नांवरील पथनाट्येही सादर केली जातात. रक्तदान शिबिरेही आयोजित केली जातात.- ज्ञानेश पुरंदरे, स्वरुपवर्धिनी पथक