शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

कोरेगाव भीमा दंगलीची देवेंद्र फडणवीसांना माहिती नव्हती, प्रकाश आंबेडकरांचा दावा

By नितीन चौधरी | Updated: August 30, 2023 18:39 IST

फडणवीस यांना दंगलीची माहिती मिळाली असती तर त्यांनी पुण्यात येऊन दंगलीचा आढावा घेतला असता...

पुणे : तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीची माहिती पोचवली गेलीच नाही. त्यांना याबाबत माहितीच देण्यात आली नाही, अशी माझी माहिती आहे. फडणवीस यांना दंगलीची माहिती मिळाली असती तर त्यांनी पुण्यात येऊन दंगलीचा आढावा घेतला असता, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीसंदर्भात आयोगापुढे त्यांची बुधवारी (दि. ३०) साक्ष नोंदविण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष जे. एन. पटेल आणि सदस्य सुमित मलीक यांच्या दोन सदस्यीय आयोगाने ही साक्ष सकाळी साडेअकरा ते दुपारी पावणेतीन वाजेदरम्यान नोंदवली. नोंदवली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आंबेडकर यांच्या वतीने अॅड. किरण कदम यांनी काम पाहिले. तर आंबेडकर यांची मिलिंद एकबोटे यांच्यातर्फे अॅड. एस. के. जैन तसेच माळवदकर, जमादार कुटुंबियातर्फे रोहन माळवदकर यांनी उलटतपासणी केली. येत्या १६ सप्टेंबरला त्यांची पुन्हा साक्ष होणार आहे.

हे अपयश कोणाचे?

आंबेडकर म्हणाले, “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक जानेवारीला कोरेगाव भीमापासून ४० किलोमीटर अंतरावर नगर जिल्ह्यात होते. ११.३० ते ११.४० या दरम्यान त्यांचे हेलिकॉप्टर ‘टेक ऑफ’ झाले आहे. ही दंगल सकाळी झाल्याने त्यांना कळले असते तर पुण्यात येऊन त्यांनी दंगलीची माहिती घेतली असती. मात्र, त्यांना दंगलीची माहितीच मिळाली नाही, अशी माझी स्वतःची माहिती आहे. त्यामुळे हे प्रशासकीय की राजकीय अपयश आहे याचा तपास आयोगाने करावा अशी मागणी आयोगाकडे केली आहे.”

पोलिस अधिक्षक कोठे होते?पोलिस अधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे आयोगासमोरील साक्षीदरम्यान आली आहेत. पण त्यात तेथील ग्रामपंचायतींने दंगलीसंदर्भातील ठराव दिले होते. ही दंगल घडविण्यात आलेली आहे. व्हाट्स अॅपवर आलेले चॅट, एकमेकांमबद्दल बदललेली माहिती ही सर्व कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. आयोगाकडे सादर केलेल्या कागदांवरून कोल्हापूर परिक्षेत्राच्या गुप्तचर विभागाकडे या दंगलीबाबत नेमकी काय माहिती होती याची माहिती आयोगाने विचारावी. तसेच पुण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक हे त्या वेळी कोठे होते आणि त्यांची भूमिका काय होती हे तपासण्यात यावे. माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांच्या काही विभागांनी या दंगलीबाबत दोन दिवस आधी माहिती गोळा केली होते. त्यांच्याकडून ही माहिती वरिष्ठ पातळीवर जाऊ दिली नाही. गृह सचिव, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत किती वाजता ही माहिती दिली हे तपासणे गरजेचे आहे, अशी आयोगाला विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

रश्मी शुक्ला यांना यावेच लागेल

आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचीही बुधवारीच साक्ष नोंदविण्यात येणार होती. मात्र, त्या अनुपस्थित राहिल्या याबाबत ते म्हणाले, “शुक्ला यांना आयोग कधीही समन्स काढू शकते. त्यांना समन्स टाळता येणार नाही. त्या आयोगासमोर का येत नाहीत ते प्रतिज्ञापत्र आल्याशिवाय कळणार नाही.”

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस