शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोरेगाव भीमा दंगलीची देवेंद्र फडणवीसांना माहिती नव्हती, प्रकाश आंबेडकरांचा दावा

By नितीन चौधरी | Updated: August 30, 2023 18:39 IST

फडणवीस यांना दंगलीची माहिती मिळाली असती तर त्यांनी पुण्यात येऊन दंगलीचा आढावा घेतला असता...

पुणे : तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीची माहिती पोचवली गेलीच नाही. त्यांना याबाबत माहितीच देण्यात आली नाही, अशी माझी माहिती आहे. फडणवीस यांना दंगलीची माहिती मिळाली असती तर त्यांनी पुण्यात येऊन दंगलीचा आढावा घेतला असता, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीसंदर्भात आयोगापुढे त्यांची बुधवारी (दि. ३०) साक्ष नोंदविण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष जे. एन. पटेल आणि सदस्य सुमित मलीक यांच्या दोन सदस्यीय आयोगाने ही साक्ष सकाळी साडेअकरा ते दुपारी पावणेतीन वाजेदरम्यान नोंदवली. नोंदवली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आंबेडकर यांच्या वतीने अॅड. किरण कदम यांनी काम पाहिले. तर आंबेडकर यांची मिलिंद एकबोटे यांच्यातर्फे अॅड. एस. के. जैन तसेच माळवदकर, जमादार कुटुंबियातर्फे रोहन माळवदकर यांनी उलटतपासणी केली. येत्या १६ सप्टेंबरला त्यांची पुन्हा साक्ष होणार आहे.

हे अपयश कोणाचे?

आंबेडकर म्हणाले, “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक जानेवारीला कोरेगाव भीमापासून ४० किलोमीटर अंतरावर नगर जिल्ह्यात होते. ११.३० ते ११.४० या दरम्यान त्यांचे हेलिकॉप्टर ‘टेक ऑफ’ झाले आहे. ही दंगल सकाळी झाल्याने त्यांना कळले असते तर पुण्यात येऊन त्यांनी दंगलीची माहिती घेतली असती. मात्र, त्यांना दंगलीची माहितीच मिळाली नाही, अशी माझी स्वतःची माहिती आहे. त्यामुळे हे प्रशासकीय की राजकीय अपयश आहे याचा तपास आयोगाने करावा अशी मागणी आयोगाकडे केली आहे.”

पोलिस अधिक्षक कोठे होते?पोलिस अधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे आयोगासमोरील साक्षीदरम्यान आली आहेत. पण त्यात तेथील ग्रामपंचायतींने दंगलीसंदर्भातील ठराव दिले होते. ही दंगल घडविण्यात आलेली आहे. व्हाट्स अॅपवर आलेले चॅट, एकमेकांमबद्दल बदललेली माहिती ही सर्व कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. आयोगाकडे सादर केलेल्या कागदांवरून कोल्हापूर परिक्षेत्राच्या गुप्तचर विभागाकडे या दंगलीबाबत नेमकी काय माहिती होती याची माहिती आयोगाने विचारावी. तसेच पुण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक हे त्या वेळी कोठे होते आणि त्यांची भूमिका काय होती हे तपासण्यात यावे. माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांच्या काही विभागांनी या दंगलीबाबत दोन दिवस आधी माहिती गोळा केली होते. त्यांच्याकडून ही माहिती वरिष्ठ पातळीवर जाऊ दिली नाही. गृह सचिव, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत किती वाजता ही माहिती दिली हे तपासणे गरजेचे आहे, अशी आयोगाला विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

रश्मी शुक्ला यांना यावेच लागेल

आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचीही बुधवारीच साक्ष नोंदविण्यात येणार होती. मात्र, त्या अनुपस्थित राहिल्या याबाबत ते म्हणाले, “शुक्ला यांना आयोग कधीही समन्स काढू शकते. त्यांना समन्स टाळता येणार नाही. त्या आयोगासमोर का येत नाहीत ते प्रतिज्ञापत्र आल्याशिवाय कळणार नाही.”

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस