शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

विकासकामे महागणार

By admin | Updated: April 30, 2015 00:29 IST

मुद्रांक शुल्क महापालिकेने वसूल करून राज्यशासनास जमा करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

पुणे : शहरातील विकास कामे करण्यासाठी संबधित ठेकेदारास काम देताना, करण्यात येणारा करारनामा नोंदणी करून त्यावरील मुद्रांक शुल्क महापालिकेने वसूल करून राज्यशासनास जमा करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाचा अप्रत्यक्ष फटका शहरातील विकासकामांना बसणार असून या मुद्रांकशुल्कामुळे कामांचा खर्च काही टक्क्यांनी वाढणार आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी सर्वसाधारण बारा हजार करारनामे करून तब्बल हजार ते बाराशे कोटी रुपयांची विकासकामे केली जातात. मुद्रांक शुल्काच्या नवीन बंधनामुळे हा प्रकल्पांचा खर्च वाढणार असून पालिकेलाच आपल्या तिजोरीतील कोट्यवधी रुपये सरकारकडे भरावे लागणार असल्याचे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे आधीच एलबीटी बंद होणार असल्याने महापालिकेच्या तिजोरीवर ताण येणार असताना; या निर्णयामुळे दुसरीकडे मात्र, शासनाची तिजोरी मालामाल होणार आहे. (प्रतिनिधी)काय आहे शासनाचा निर्णय शहरात विकासाची कामे करण्यासाठी पालिकेकडून टेंडर मागवून ही कामे केली जातात. त्यासाठी संबधित ठेकेदाराबरोबर करारनामा केला जातो. हा करारनामा करताना त्यावरील मुद्रांक शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा करणे गरजेचे आहे. वर्षांनुवर्षे पालिकेच्या मार्फत शंभर ते पाचशे रुपयांच्या स्टँपपेपरवर करारनामा करून ठेकेदाराला काम दिले जाते. या पुढील काळात ठेकेदाराबरोबर कामाचा करारनामा करताना हे काम किती रुपयांचे आहे, यावर मुद्रांक शुल्क वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून ठेकेदाराकडून मुद्रांक शुल्क वसूल करण्याचे बंधन शासनाने महापालिकेवर घातले आहे. त्यामुळे यापुढील कोणताही करारनामा करताना पालिकेला हे पैसे घेऊन शासनाकडे जमा करावे लागणार आहे.असा वाढेल प्रकल्पांचा खर्च प्रकल्पाचा करारनामा करतानाच मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्याने हे काम घेतानाच यापुढील काळात ठेकेदार मुद्रांक शुल्क गृहित धरूनच हे काम घेईल, परिणामी पूर्वी हे शुल्क भरावे लागत नसल्याने ठेकेदारांकडून कमी दरात प्रकल्पाच्या निविदा भरल्या जात होत्या. मात्र आता, पाचशे रुपये ते पंचवीस लाख रूपयांपर्यंत हा मुद्रांक शुल्क भरावा लागणार असल्याने हे पैसे ठेकेदाराच्या खिशातून नव्हे तर पालिकेच्या तिजोरीतून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.