शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शाश्वत विकासासाठी बांबू जनजागृतीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 01:46 IST

महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी व राहुरी कृषी विद्यापीठातर्फे पुढाकार

पुणे : बांबू हे नगदी पीक आहे. कोणतीही काळजी न घेता हे पीक वर्षानुवर्षे उत्पन्न देणारे आहे. तरीदेखील त्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष आहे. हे पीक अधिक प्रमाणात घ्यावे, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुली, महाराष्टÑ वृक्ष संवर्धन व बांबू असोसिएशन आॅफ इंडिया महाराष्टÑतर्फे यंदा जनजागृती करण्यात येत आहे. शाश्वत विकासासाठी बांबू ही संकल्पना घेऊन यंदा जागतिक बांबू दिनानिमित्त (दि. १८) हा पुढाकार घेण्यात आल्याची माहिती महाराष्टÑ वृक्ष संवर्धन समितीचे सुनील भिडे यांनी दिली.बांबू लागवडीखालील क्षेत्रफळाचा विचार करता भारत जगात सगळ्यात पुढे आहे. अगदी चीनच्यासुद्धा, परंतु बांबूचा वापर करून त्यापासून वस्तू निर्मिती व त्याची निर्यात यामध्ये जगात आपला सोळावा क्रमांक लागतो. अगदी म्यानमार, व्हिएतनाम सारखे छोटे देशही आपल्या पुढे आहेत. भारतात सुमारे १३० पेक्षा अधिक स्थानिक प्रजाती सद्य:स्थितीत ज्ञात आहेत. त्याविषयी पुरेसे संशोधन झालेले नाही. शोध घेतला तर अजून स्थानिक प्रजाती निश्चित उजेडात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, बांबूचे नियोजनबद्ध उत्पादन व उत्पादनानंतर बांबूपासून विविध वस्तूंची निर्मिती व निर्यात याविषयी शेतकºयांमध्ये जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये शासकीय योजनांची माहितीदेखील शेतकºयांना देण्यात येणार आहे.शेतीच्या बांधावर व शेतीमध्येसुद्धा उपलब्ध जागे बांबूची लागवड करता येते. बदलत्या हवामानात खंबीरपणे तोंड देत खूप वर्षे रोख उत्पन्न मिळते. तसेच जमिनीत ओलावा साठवून ठेवायला मदत होते. शेतजमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची भरही यामुळे घालता येते, असे बहुपयोगी बांबूबाबत जनजागृतीचा उपक्रम उद्यापासून (दि. १८) होत आहे, असे भिडे यांनी सांगितले.आज बांबूची शास्त्रीय ओळख करून देणारमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १८) शिरनामे सभागृह, महात्मा फुले कृषी महाविद्यालय परिसरात सायंकाळी ४ वाजता याबाबत कार्यक्रम होणार आहे. नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप रावत प्रमुख पाहुणे असतीला.

टॅग्स :Bambu Gardenबांबू गार्डन