शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शिंदे सरकारचा निर्णय होऊनही आणीबाणी विरोधकांचे मानधन अधांतरीच

By राजू इनामदार | Updated: October 15, 2022 15:58 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अद्याप ही फाईलच गेलेली नाही....

पुणे : आणीबाणी विरोधकांचे महाविकास आघाडी सरकारने बंद केलेले मानधन सुरू करण्याचा निर्णय नव्या सरकारने जाहीर केला खरा, मात्र तो अजूनही अंधातरीच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी होताच हे मानधन पुन्हा सुरू करत असल्याचे जाहीर केले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अद्याप ही फाईलच गेलेली नाही.

दरम्यान महाविकास आघाडीने मानधन बंद केलेल्या दोन वर्षांच्या कालावधीतील मानधनही थकित महणून देण्यात यावे अशी मागणी आणीबाणी विरोधकांचे राष्ट्रीय संघटन असलेल्या लोकतंत्र सेनानी संघाच्या महाराष्ट्र शाखेने केली आहे.१ महिन्यापेक्षा जास्त शिक्षा असेल तर दरमहा १० हजार रूपये, त्यापेक्षा कमी शिक्षा असेल तर ५ हजार रूपये व सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीला दरमहा याच्या निम्मी रक्कम दरमहा मिळणार आहे.

भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या दुसऱ्या सरकारच्या वेळेस भाजपने हे मानधन सुरू केले होते. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच ते बंद केले. लोकतंत्र सेनानी संघाने त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी न्यायालयाने बंदच्या निर्णयावर काही भाष्य केले नाही, मात्र बंदचा निर्णय होईपर्यंतचे थकलेले ६ महिन्यांचे मानधन त्वरीत अदा करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे ६ महिन्यांचे थकीत मानधन दिले गेले व त्यानंतर २ वर्षे हे मानधन बंदच होते.

भाजप शिंदे सरकार सत्तेवर येताच उपमुख्यमंत्ऱ्यांनी लगेचच हे मानधन सुरू करणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर यासाठी जी प्रशासकीय हालचाल व्हायला हवी तीच झालेली नाही. सरकारने यासाठी निधी मंजूर करायला हवा. त्याचे जिल्हानिहाय वितरण व्हायला हवे व मुख्य म्हणजे त्यासंबधीचा अध्यादेश जारी व्हायला हवा. तोच अजून झालेला नसल्याने प्रशासकीय कार्यवाहीत अडथळे येत असल्याचे समजते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGovernmentसरकार