शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वणवण थांबली; चारा प्रश्न गंभीरच!

By admin | Updated: September 25, 2015 01:23 IST

जूनची सरासरी ओलांडून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यात सुरू झालेली पाणीटंचाईची झळ आता परतीच्या पावसाने कमी केली आहे.

पुणे : जूनची सरासरी ओलांडून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यात सुरू झालेली पाणीटंचाईची झळ आता परतीच्या पावसाने कमी केली आहे. श्रावणातही ४९ टँकरने जिल्ह्यात सुरू असलेला पाणीपुरवठा आता २० टँकरवर आला आहे. मात्र बारामतीच्या जिरायती भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.५ जूननंतर जिल्ह्यात मान्सून सक्र्रिय होऊन तो सरासरीच्या १६0.0६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात मेअखेर सुरू असलेले ३२ टँकर झपाट्याने कमी होऊन ते १८ वर आले होते. मात्र, जुलै महिन्यात ५७.0५, आॅगस्ट महिन्यात ३४.६३ इतकाच पाऊस झाल्याने जिल्ह्यात पुन्हा ‘पाणी पाणी रे’ करण्याची वेळ आली. त्यामुळे पुन्हा जिल्हा प्रशासनाने टँकर वाढवून ते ४९ केले आहेत. मात्र, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा पाऊस सुरू झाला. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत जिल्हात १८0.४७ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो टक्केवारीत सरासरीच्या १२३. ५७ इतका आहे. जूनपासून आतापर्यंत ६४२.१७ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, तो टक्केवारीत सरासरीच्या ७५.९३ इतका आहे. अजून २५ टक्के पाऊस कमी झाला आहे. पाणीसाठ्यांतील तूट मात्र चिंताजनकच आहे. (प्रतिनिधी)माळेगाव : पाठ फिरवलेल्या पावसाने जाता-जाता दमदार हजेरी लावली. परंतु, समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्तच आहेत. शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, मोठ्या जनावरांचे काय करावे? असा प्रश्न बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांसमोर आवासून उभा आहे. दरम्यान, चारा छावण्या उभ्या करण्याकरिता सरकारी आदेशानुसार जनावरांच्या सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु शेतकरीवर्गामधून ‘चारा छावण्या नको,डेपो द्या’ अशी मागणी जोर धरू लागली आहे. चारा छावणी झाल्यास लोकांना आपली जनावरे छावणीमध्ये घेऊन जावी लागतात. यामुळे त्याठिकाणी घरातील एक व्यक्ती अडकून पडते. एकीकडे जनावरांचा जीव वाचविण्यासाठी धडपड, तर दुसरीकडे स्वत:चे पोट भरण्यासाठीची वणवण. त्यातच छावणीवर थांबणाऱ्या व्यक्तीसाठी खाण्या-पिण्याची सोय करावी लागते.दूध काढणे व विक्रीची समस्या, जनावरांना साथीच्या रोगांचा होणारा प्रादुर्भाव व इतर येणाऱ्या अडचणी यांमुळे शेतकऱ्यांमधून चारा डेपोची मागणी होत आहे.२०१२ साली चारा डेपो उघडण्यात आले होते. परंतु अडचणी आल्याने तीन महिन्यांमध्येच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. बारामती तालुक्यातील ६४ ते ६७ गावे दुष्काळसदृश आहेत. पूर्वीसुद्धा ६४ गावांकरिता छावण्या उभारण्यात करण्यात आल्या होत्या. या वर्षीही ज्या गावांची आणेवारी ५० टक्केच्या आत असेल तेथे चारा डेपो किंवा छावण्या उभ्या राहतील. याकरिता जनावरांचा सर्व्हे केला जात आहे. माळेगाव बुद्रुक व माळेगाव खुर्द हा भाग बागायती असल्याने सध्या चाऱ्याची समस्या दिसत नाही. परंतु पाऊस न झाल्यास चाऱ्याची कमतरता निर्माण होईल, असे माळेगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गाडे यांचे मत आहे. (वार्ताहर)