शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त अण्णाभाऊंच्या साहित्यिकाकडे दुर्लक्ष : लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 15:30 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या तडाखेबंद लेखणीने मातंग, शोषित आणि वंचित समाजाच्या व्यथा-वेदना साहित्यातून मांडल्या....  

ठळक मुद्देसारसबाग येथील पादचारी पुलावरुन गुलाबपुष्पवृष्टी करुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य क्रांतीदिंडीस प्रारंभ

पुणे:- अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची नाळ तळागाळातील माणसाच्या दु:खाशी जोडलेली होती. त्यांचे दु:ख, कष्ट, वेदना या सगळ्याबद्दल त्यांनी तळमळीने लेखन केले. लालबावटा पथकाद्वारे समाजाच्या प्रबोधनाचा विडा उचलला. तर शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीची बीजे रोवली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, साहित्याला परिवर्तनवादी वळण देणा-या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या साहित्यिकाकडे दुर्लक्ष झाले असल्याची खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.पुणे शहर जिल्हा मातंग समाजातर्फे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 98 व्या जयंती महोत्सवानिमित्त त्यांच्या साहित्याचा अंतर्भाव असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य क्रांतीदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट, सचिव सचिन जोगदंड, प्रकाश वैराळ, अशोक कोवळे, सुरेखा भालेराव, लता राजगुरू, विठ्ठल गायकवाड, परशुराम वाडेकर, संपत जाधव, केदार वैराट यांच्यासह अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे प्रचारक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.  सारसबाग येथील पादचारी पुलावरुन गुलाबपुष्पवृष्टी करुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य क्रांतीदिंडीस प्रारंभ झाला. सारसबाग येथील अण्णाभाऊ साठ्ये पुतळ्यापासून सारसबाग चौकातील महालक्ष्मी मंदिरामार्गे वळण घेऊन परत अण्णाभाऊ साठे  यांच्या पुतळ्याजवळ या साहित्य क्रांतीदिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, लेखक आणि कलाकारांनी वंचितांच्या उत्थानासाठी आपली लेखणी आणि कला समर्पित केली पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या तडाखेबंद लेखणीने मातंग, शोषित आणि वंचित समाजाच्या व्यथा-वेदना साहित्यातून मांडल्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केले. 

टॅग्स :Puneपुणे