पुणे:- अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची नाळ तळागाळातील माणसाच्या दु:खाशी जोडलेली होती. त्यांचे दु:ख, कष्ट, वेदना या सगळ्याबद्दल त्यांनी तळमळीने लेखन केले. लालबावटा पथकाद्वारे समाजाच्या प्रबोधनाचा विडा उचलला. तर शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीची बीजे रोवली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, साहित्याला परिवर्तनवादी वळण देणा-या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या साहित्यिकाकडे दुर्लक्ष झाले असल्याची खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त अण्णाभाऊंच्या साहित्यिकाकडे दुर्लक्ष : लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 15:30 IST
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या तडाखेबंद लेखणीने मातंग, शोषित आणि वंचित समाजाच्या व्यथा-वेदना साहित्यातून मांडल्या....
आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त अण्णाभाऊंच्या साहित्यिकाकडे दुर्लक्ष : लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत
ठळक मुद्देसारसबाग येथील पादचारी पुलावरुन गुलाबपुष्पवृष्टी करुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य क्रांतीदिंडीस प्रारंभ