शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त अण्णाभाऊंच्या साहित्यिकाकडे दुर्लक्ष : लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 15:30 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या तडाखेबंद लेखणीने मातंग, शोषित आणि वंचित समाजाच्या व्यथा-वेदना साहित्यातून मांडल्या....  

ठळक मुद्देसारसबाग येथील पादचारी पुलावरुन गुलाबपुष्पवृष्टी करुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य क्रांतीदिंडीस प्रारंभ

पुणे:- अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची नाळ तळागाळातील माणसाच्या दु:खाशी जोडलेली होती. त्यांचे दु:ख, कष्ट, वेदना या सगळ्याबद्दल त्यांनी तळमळीने लेखन केले. लालबावटा पथकाद्वारे समाजाच्या प्रबोधनाचा विडा उचलला. तर शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीची बीजे रोवली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, साहित्याला परिवर्तनवादी वळण देणा-या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या साहित्यिकाकडे दुर्लक्ष झाले असल्याची खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.पुणे शहर जिल्हा मातंग समाजातर्फे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 98 व्या जयंती महोत्सवानिमित्त त्यांच्या साहित्याचा अंतर्भाव असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य क्रांतीदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट, सचिव सचिन जोगदंड, प्रकाश वैराळ, अशोक कोवळे, सुरेखा भालेराव, लता राजगुरू, विठ्ठल गायकवाड, परशुराम वाडेकर, संपत जाधव, केदार वैराट यांच्यासह अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे प्रचारक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.  सारसबाग येथील पादचारी पुलावरुन गुलाबपुष्पवृष्टी करुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य क्रांतीदिंडीस प्रारंभ झाला. सारसबाग येथील अण्णाभाऊ साठ्ये पुतळ्यापासून सारसबाग चौकातील महालक्ष्मी मंदिरामार्गे वळण घेऊन परत अण्णाभाऊ साठे  यांच्या पुतळ्याजवळ या साहित्य क्रांतीदिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, लेखक आणि कलाकारांनी वंचितांच्या उत्थानासाठी आपली लेखणी आणि कला समर्पित केली पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या तडाखेबंद लेखणीने मातंग, शोषित आणि वंचित समाजाच्या व्यथा-वेदना साहित्यातून मांडल्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केले. 

टॅग्स :Puneपुणे