शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

उताऱ्यात कोल्हापूर, गाळपात पुणे विभाग आघाडीवर

By admin | Updated: December 28, 2014 23:27 IST

सहकारी साखर कारखान्यांचा दबदबा : राज्यात पावणेतीनशे लाख टनांचे गाळप

राजाराम लोंढे - कोल्हापूर -राज्यातील १६९ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी आतापर्यंत पावणेतीनशे लाख टन उसाचे गाळप केले आहे. यामध्ये कोल्हापूर विभागाने साखर उतारा ११.६२ टक्के राखत, तर १ कोटी १२ लाख टन उसाचे गाळप करीत पुणे विभागाने अव्वल स्थान पटकाविले आहे. राज्याचा एकूण साखर उतारा १०.६८ टक्के असला, तरी यामध्ये सहकारी साखर कारखान्यांनी आपला दबदबा कायम राखण्यात यश मिळविले आहे. राज्यात कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर या सात विभागांत उसाचे गाळप केले जाते. यंदा ९७ सहकारी, तर ७२ खासगी साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ३ सहकारी, तर तब्बल १२ खासगी कारखाने वाढले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कारखान्यांचा हंगाम सुरू झाला होता. यंदा नोव्हेंबरपासूनच गाळप सुरू झाले. त्यात साखर कारखान्यांची संख्याही वाढल्याने गाळप जास्त होण्यास मदत झाली आहे. ९७ सहकारी साखर कारखान्यांनी आतापर्यंत १ कोटी ७५ लाख ६५ हजार टनांचे गाळप करीत सरासरी साखर उतारा ११.५४ टक्के राखला आहे. याउलट खासगी कारखान्यांनी १ कोटी ६४ हजार टन गाळप केले असून ९.२० टक्के उतारा आहे. त्यामुळे उताऱ्यात सहकारी कारखान्यांनी आपला दबदबा कायम राखण्यात यश मिळवले आहे. गाळपात १ कोटी १२ लाख २० हजार टन गाळप करीत पुणे विभागाने राज्यात आघाडी घेतली असली तरी यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे ५८ लाख ९४ हजार टनांचे गाळप झालेले आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. कोल्हापूरने ३९ लाख ७७ हजार टन गाळप केले. पुणे जिल्ह्यात खासगी कारखाने पुढेराज्यात बहुतांश जिल्ह्यांत खासगीपेक्षा सहकारी कारखाने उताऱ्यात पुढे आहेत. केवळ पुणे जिल्ह्यात खासगी कारखान्यांचा उतारा १०.८२ टक्के, तर सहकारीचा १०.२६ टक्के आहे.यंदा आठ कोटींचे उद्दिष्ट!राज्यात यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यात उसाचे उत्पादनही चांगले मिळत असल्याने किमान आठ कोटी टनांचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी ६ कोटी ९० लाख टन उसाचे उत्पादन झाले होते. तुलनात्मक गाळप हंगामविभागकारखानेगाळपउतारा टक्काकोल्हापूर३६६९ लाख ९० हजार११.६२पुणे५७१ कोटी १२ लाख २० हजार११.१४अहमदनगर२३३८ लाख ४० हजार१०.०९औरंगाबाद२१२३ लाख ६२ हजार८.८४नांदेड२६३७ लाख ८३ हजार९.७६अमरावती०२१ लाख ७५ हजार९.०८नागपूर०४१ लाख १६ हजार८.०६