शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

वाळुंजवाडीला २८ वर्षापासून विकासापासून वंचित ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST

मंचर: आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी या महसुली गावाला मागील २८ वर्षांपासून शासनाच्या निधी मिळाला नाही. त्यामुळे विकासकामे झाली नाही. ...

मंचर: आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी या महसुली गावाला मागील २८ वर्षांपासून शासनाच्या निधी मिळाला नाही. त्यामुळे विकासकामे झाली नाही. विशेष म्हणजे या गावचा निधी वाळुंजनगर गावाला दिल्याचा आरोप वाळुंजवाडी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

पत्रकार परिषदेला माजी सरपंच रुक्मिणी खंडागळे , माजी उपसरपंच सोनाली वाळुंज, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, बाळासाहेब लोंढे, नवनाथ वाळुंज, भिमराव वाळुंज, जीवन निघोट, मनोहर लोंढे, सागर वाळुंज, कांतीलाल वाळुंज, प्रकाश वाळुंज आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

वाळुंजवाडी आणि वडगाव काशिंबेग या दोन गावांसाठी एक ग्रामपंचायत होती. वडगाव काशिंबेग गावची लोकसंख्या दोन हजार ७१७ व वाळुंजवाडी गावची लोकसंख्या एक हजार २६ अशी एकूण लोकसंख्या तीन हजार ७४३ होती. त्यानुसार सदर ग्रामपंचायत वडगाव काशिंबेगकडे दोन्ही गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत निधी शासनाकडून उपलब्ध होणे गरजेचे होते. परंतु आज अखेर केवळ वडगाव काशिंबेग गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत निधी आल्याने सदर तुटपुंज्या निधीमुळे गावचा विकास अनेक वर्ष रखडला असल्याची माहिती नवनाथ वाळुंज यांनी दिली.

वडगाव काशिंबेग पासून वाळुंजवाडीला १७ फेब्रुवारी २०२०ला विभक्त करण्यात आले. त्यानंतर नव्याने वाळुंजवाडी ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर तेथील तरुणांच्या व ग्रामस्थांच्या निधी मिळत नसल्याची गोष्ट निदर्शनास आली. गेली २८ वर्षे वाळुंजवाडी गावात लोकसंख्येच्या तुलनेत मिळणारा सर्व निधी दुसऱ्या गावच्या विकासासाठी स्वतंत्र स्थापन केलेल्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत नवनाथ वाळुंज यांनी गटविकास अधिकारी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असल्याचेही ग्रामस्थांनी म्हंटले.

सखोल चौकशी करणार

वाळुंजवाडी ग्रामस्थांनी आरोप केल्यानंतन आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वाळुंजवाडीला २८ वर्षापासून शासनाचा निधी न मिळणे अशक्य आहे. परंतु, तसे काही झाले असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल. त्याचबरेाबर यामागील कारणही शोधले जाईल.