शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

डेंगी पेशंटला उपचाराविना हाकलले

By admin | Updated: October 4, 2016 01:29 IST

येथील प्राथमिक अरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे अपघातातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाल्हे येथे मोठ्या प्रमाणावर डेंगीचे रुग्णांना उपचार न

वाल्हे : येथील प्राथमिक अरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे अपघातातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाल्हे येथे मोठ्या प्रमाणावर डेंगीचे रुग्णांना उपचार न देताच येथील कर्मचारी व अरोग्यसेविकांनी हाकलून दिले. समाजसेवकांनी रुग्णांसह जाऊन असे होऊ नये, असे सांगण्यास गेलेल्या ग्रामस्थांनाच दादागिरी केली. तर, खासगी दवाखान्यातील रुग्णांची डेंगीची नोंद घेण्यास नकार दिल्याने कामचुकार वाल्हे प्राथमिक अरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत कराळे यांचे निलंबन करण्याचा ठराव संमत करण्यात आला.समस्यांनी ग्रासलेल्या ग्रामस्थांनी वाल्हेच्या ग्रामसभेस हजेरी लावून कामचुकार अधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांसह पदाधिकारी वर्गाला चुकांचा पाढा वाचून अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारला. ग्रामसभेच्या अध्यक्षा सरपंच कल्पना गोळे या होत्या. या वेळी ग्रामसेवक एस. बी. गाताडे, उपसरपंच पोपट पवार, ग्रामपंचायत सदस्य किरण कुमठेकर, सुशांत पवार यांच्यासह माजी उपसरपंच समदास भुजबळ, शांताराम पवार, पुरंदर भाजपा तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, माजी सभापती व संजय गांधी निराधार योजनेचे अथ्यक्ष गिरीश पवार, शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. फत्तेसिंग पवार, सतीश पवार, वाल्हे पोलीस ठाण्याचे हवालदार श्रीरंग निगडे, प्रवीण कुमठेकर, सचिन देशपांडे, अमोल भुजबळ, धनंजय भुजबळ, वन विभाग व अरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होत. या वेळी महसूल, कृषी व शिक्षण या विभागांतील कोणताच अधिकारी उपस्थित नव्हता, तर बहुसंख्य ग्रामस्थ व युवकांनी या सभेला हजेरी लावली.वाल्हे प्राथमिक अरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार हा येथील ग्रामस्थांच्या जिवावर बेतत असून अनेक गरीब रुग्णांना सेवा दिली जात नाही. त्यामुळे खासगी दवाखान्यात जावे लागत असून मोठा खर्च करावा लागतो. तर, येथील कर्मचारी व अधिकारी हे बेजबाबदारपणे कार्यरत असून, त्याला येथील वैद्यकीय अधिकारीच जबाबदार आहेत. यापूर्वीही वारंवार असे प्रकार झाले असून त्यांना निलंबित करण्यात यावे, असा ठराव करण्यात आला. शासकीय योजना व शेतकरी यांच्या विषयांचे वाचन झाले असता विहीर योजनेतील ६० गुंठे अशी जाचक अट रद्द करून ती लहान शेतकऱ्यांना मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना धनंजय भुजबळ यांनी केल्या. तर, शासकीय योजनेत वाल्हेच्या ग्रामपंचायतीमध्येच काळाबाजर होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. येथील स्थानिक कर्मचारी बदल करीत असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार भोंगळ होत असल्याचे उघड झाले. अनेकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दादागिरी व आरोग्यसेविकांची मनमानी हा विषय गोंधळ घालून गेला. या वेळी दादागिरी करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबनच करण्याचा ठराव करण्यात आला. तर, दारूधंदे बंद का होत नाहीत, यावर ग्रामपंचायतीला धारेवर धरण्यात आले. पोलिसांनी यात हस्तक्षेप करून आम्ही कार्यवाही करीत असल्याचे सांगितले. मात्र, कारवाई नको-बंद करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)