शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

डेंगू हटाव मोहिमेवर फिरले पावसाचे पाणी

By admin | Updated: October 8, 2014 05:21 IST

शहरातील डेंगूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या डेंगू हटाव मोहिमेवर पावसाचे संकट ओढावले आहे

पुणे : शहरातील डेंगूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या डेंगू हटाव मोहिमेवर पावसाचे संकट ओढावले आहे. या मोहिमेअंतर्गत ज्या ज्या ठिकाणी पालिकेकडून साचलेले पाणी काढण्यात आले होते; तसेच औषध फवारणी केली होती, त्या ठिकाणी पुन्हा पावसाचे पाणी साठत असल्याने शहरात डेंगूची साथ पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शहरात डेंगूच्या साथीने थैमान घातले आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत शहरात तब्बल २६३१ डेंगूची लागण झालेले रुग्ण आढळून आले असून, अत्तापर्यंत सहा जण या आजाराने दगावलेले आहेत. त्यात एका महापालिकेच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून मागील महिन्यात १५ दिवसांची डेंगू हटाव मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधणे, पाणी साठलेली ठिकाणे शोधून ती नष्ट करणे, त्या ठिकाणी औषध फवारणी करणे, त्यास जबाबदार असलेल्यांना नोटिसा बजावने, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे, खटले दाखल करणे या कामांसाठी तब्बल हजार ते दीड हजार कर्मचाऱ्यांची फौज शहरात कार्यरत आहे. ही मोहीम सुरू करण्यापूर्वी शहरात दररोज सरासरी ४० ते ४५ रुग्ण आढळून येत होते. मोहीम सुरू केल्यानंतर हा आकडा सरासरी १५ ते २० पर्यंत खाली आलेला आहे.