शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे मॉकड्रिल अन् गुंडांचे शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: June 2, 2017 02:16 IST

वर्षातून एक दोन वेळा पोलिसांचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक) होत असते. गर्दी आणि वर्दळीचे ठिकाण निवडून पोलीस मॉकड्रिल करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : वर्षातून एक दोन वेळा पोलिसांचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक) होत असते. गर्दी आणि वर्दळीचे ठिकाण निवडून पोलीस मॉकड्रिल करतात. मॉक ड्रिलच्या माध्यमातून कायदा, सुव्यवस्था यंत्रणा दक्ष असल्याचे पोलीस दाखवतात. तर नागरिकांवर दहशत राहावी, यासाठी गुंड टोळक्याने फिरून शक्तिप्रदर्शन घडवू लागल्याचे चित्र शहरात पहावयास मिळू लागले आहे. मोरवाडीतील एका मॉलजवळ शनिवारी पोलिसांनी मॉकड्रिल केले. अतिरेक्यांना पकडण्याचे त्यांचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक) सुरू असताना पिंपरीत गुंडांचे टोळके फेरफटका मारत होते. उंच, तगडे सहकारी घेऊन ते परिसरातून फेरफटका मारून शक्तिप्रदर्शन करीत होते. एकाचवेळी संपूर्ण रस्ता अडवून चालत जाणाऱ्या या टोळक्याकडे या मार्गाने ये-जा करणारे पाहात होते. सुरुवातीला काहीतरी गडबड झाली असावी, भांडणाच्या इराद्याने हे टोळके आले असावे, असे नागरिकांना वाटले. परंतु, भांडणाचा काही प्रकार नव्हता. टोळके असेच फेरफटका मारत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर गुंडही आता स्वत:चे प्रमोशन करू लागले आहेत. कोणातरी डॉनचे छायाचित्र बाजूला आपली छबी झळकावून ते गुंडगिरीचे प्रदर्शन करू लागले आहेत. गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असलेला त्यांचा मित्रपरिवार त्यांना लार्इ््क देऊ लागला आहे. त्यावर कमेंटसही तशाच पडत आहेत. कोणी स्वत:ला वाघ तर कोणी सिंह संबोधू लागला आहे. तरुण मुले अशा ग्रुपवर अधिक सक्रिय झाली असून डॉन,भाई,दादा यांना ते आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर प्रमोशन करणारे काही गुंड नागरी वस्तीच्या परिसरात अनेकदा दहशत पसरविण्याची कृत्य करू लागले आहेत.वाहनांची तोडफोड, जाळपोळीचे प्रात्यक्षिकमॉकड्रिलच्या माध्यमातून पोलीस सतर्क असल्याचे दाखवून देत असताना, गुंडांची टोळकी मात्र दुचाकी चारचाकी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ याची खरी प्रात्यक्षिके दाखवू लागले आहेत. शहरात घडलेल्या विविध ठिकाणच्या दहशतीच्या घटनांमध्ये आतापर्यंत दोनशेहून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. मॉकड्रिल करणारे पोलीस बाहेरून येणाऱ्या खऱ्या दहशतवाद्यांनाही पकडतील, परंतु बाहेरच्या दहशतवाद्यांपेक्षा नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या स्थानिक गुंडांवर पोलिसांचा वचक कधी तयार होईल? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.