शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले, बाजारपेठ कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 08:05 IST

नोटाबंदीला आज वर्ष होत आहे; मात्र या नोटाबंदीचा फायदा किती व तोटा किती? याचा अभ्यास केला गेला तर या निर्णयाचा प्रत्येक नागरिकावर परिणाम निश्चितच झाला आहे.

- विशाल दरगुडे 

चंदननगर : नोटाबंदीला आज वर्ष होत आहे; मात्र या नोटाबंदीचा फायदा किती व तोटा किती? याचा अभ्यास केला गेला तर या निर्णयाचा प्रत्येक नागरिकावर परिणाम निश्चितच झाला आहे. वडगाव शेरी, चंदननगर परिसरात तुडुंब गजबजणाऱ्या बाजारपेठा आज वर्षानंतरही ओसच पडल्या आहेत. त्यांच्यात जराही बदल झालेला नाही. व्यवसाय कोसळला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने सराफी, कापड, व्यापारी, भाजीविक्रेते यांच्यासह अनेक लहान व्यवसायांवर नोटाबंदीचा प्रभाव प्रचंड पडल्यामुळे वर्षभरापासून व्यवसाय मंदीत असून आजही मंदी कायम आहे.

सगळे व्यवहार ऑनलाइन केल्यामुळे बाजारपेठात जाणाऱ्यांची संख्या खूपच घटली असून, नागरिक कपड्यांपासून ते अगदी औषधांपर्यंत अनेक वस्तूंची खरेदी ऑनलाइन करू लागल्याचा परिणाम बाजारपेठांवर होऊ लागला आहे. नोटाबंदीमुळे व्यवसायावर पन्नास टक्के परिणाम झाला असून, व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे फार कठीण झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी जीएसटी करप्रणाली लागू झाल्यापासून छोटे व्यापारी व्यवसाय बंद करून, नोकरी शोधत आहेत.

चंदननगर - वडगाव शेरी व्यापारी पेठेत कोट्यवधींची उलाढाल होत होती; मात्र गेल्या वर्षी नोटाबंदीनंतर नागरिकांकडे पैसे उरले नाहीत. बँकेत पैसे असूनही ते काढता येत नाहीत. त्यावर बंधने आहेत. त्यामुळे कोणताही रोखीने व्यवहार होत नसल्यामुळे सर्वच व्यवसाय आज वर्षानंतरही ठप्प आहेत. जीएसटीमुळे तर पूर्णपणे अर्थकारण कोसळले असून, छोट्या व्यावसायिकांना कागदपत्रे जमा करण्यात मोठा गोंधळ होत आहे. किरकोळ व्यापारीही संभ्रमात पडला आहे.

परिसरात जमीन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत होती; मात्र नोटाबंदीनंतर नागरिकांकडे व्यवहार करण्याएवढे पैसे नसल्यामुळे कोणताही मोठा जमीन खरेदीचा व्यवहार होत नसल्यामुळे वकिलांचा व्यवसायही ऐंशी टक्केही होत नाही.एकंदरीत सर्वांचेच अर्थकारण ठप्प झाले आहे. नोटाबंदीचा फायदा नाही, तर तोटाच झाला असल्याचे नागरिकांमधून सांगितले जाते.

टॅग्स :Note BanनोटाबंदीMarketबाजार