शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही दिन नावापुरताच!

By admin | Updated: December 13, 2015 23:49 IST

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून आयोजित केला जाणारा

पिंपरी : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून आयोजित केला जाणारा ‘लोकशाही दिन’ नावापुरताच उरला असल्याची स्थिती पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाहायला मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत केवळ सहा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यास नागरिकांची उदासीनता म्हणायची, की प्रशासनाची अनास्था, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकशाही दिनाचे आयोजन करण्यासंबंधीचे आदेश शासनाने डिसेंबर २००८ला दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या स्थायी समिती सभागृहात अथवा आयुक्त कक्षाजवळील सभागृहात केले जाते. पूर्वी हा कार्यक्रम नेहरुनगर रस्त्यावरील कामगार भवनात आयोजित केला जात होता. लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस अगोदर संबंधित व्यक्तीने महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात प्रत्यक्ष येऊन दोन प्रतींत अर्ज सादर करणे आवश्यक असते. अर्ज प्राप्त झाल्यानंतर या अर्जाचा ‘ई-मेल’ तक्रारीशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना पाठविला जातो. यासह लोकशाही दिनाला हजर राहण्याची सूचना दिली जाते. अर्जदार नागरिकालाही कळविले जाते. आयुक्तांसह विविध विभागाचे अधिकारी लोकशाही दिन उपक्रमाला उपस्थित असतात. विशेषत: संबधित नागरिकांची तक्रार ज्या विभागाशी संबंधित असेल, ते अधिकारी लोकशाही दिनास हजर असतात. तक्रारींवर चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाते. मात्र, महापालिकेतील लोकशाही दिनास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत केवळ ६ तक्रार अर्ज प्राप्त झाले. या आठ महिन्यांतील सहा महिने तर अक्षरश: एकही अर्ज आला नाही. त्यामुळे लोकशाही दिनाचे आयोजनही करण्यात आले नाही. दरम्यान, ठरवून दिलेल्या वेळेत एक जरी अर्ज प्राप्त झाला, तरी लोकशाही दिनाचे आयोजन करावे लागते. मात्र, लोकशाही दिनासाठी १५ दिवस अगोदर अर्ज द्या, त्यानंतर प्रत्यक्ष हजर राहा, यापेक्षा महापालिकेच्या ‘सारथी हेल्पलाईन’वर काही नागरिक तक्रारी करू लागले. यासह आता दोन महिन्यांपासून क्षेत्रीय सभेचेही आयोजन होऊ लागले आहे. त्यामुळे अनेक नागरिक येथेही तक्रारी मांडतात. (प्रतिनिधी)तक्रारी येण्याचे प्रमाण शून्यअधिकाऱ्यांकडून तक्रारींची कितपत दखल घेतली जाते? यामुळेही लोकशाही दिनी येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होण्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे. श्रीकर परदेशी आयुक्त असताना महिन्याला २० ते २२ तक्रारी प्राप्त होत होत्या अन् त्यावर तातडीने कार्यवाही होत असे. त्यामुळे नागरिकांनाही विश्वास होता. मात्र, आता लोकशाही दिन उपक्रमात तक्रारी येण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. त्यामुळे एक तर शहरवासीयांना कोणत्याच समस्या भेडसावत नाहीत, की तक्रार देऊनही दखल घेतली जात नसल्याचा अनुभव येत आहे. यापैकी एखादे कारण तक्रारी शून्यावर येण्यास कारणीभूत असावे का? याबाबत महापालिका प्रशासनाने शोध घेणे गरजेचे आहे. नागरिक व सामाजिक संस्था विविध समस्यांसंदर्भात आयुक्तांना निवेदने देतात. लोकशाही दिन, सारथी यांऐवजी थेट आयुक्तांनाच निवेदन देणे पसंत करतात. यामुळे निवेदनांचा भडीमार होत असतो. निवेदन देण्याचा काहींनी उद्योग सुरू केला आहे.$$्न्निशांतता समित्यांमध्येच समस्यांचा निपटारापिंपरी : पोलीस ठाण्यांमध्ये स्थापन केलेल्या शांतता समित्यांमध्ये तंटामुक्तीचे काम केले जाते; तसेच नागरिकांच्या समस्यांचा निपटारा होतो. त्यामुळे पोलिसांच्या वतीने प्रत्येक महिन्यात घेण्यात येणाऱ्या समस्या निवारण दिन उपक्रमास अल्प प्रतिसाद मिळू लागला आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पोलिसांच्या वतीने समस्या निवारण दिन उपक्रम घेण्यात येतो. अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम घेण्यात येतो. महिला दक्षता समितीचे पदाधिकारी, सदस्यसुद्धा या उपक्रमास आवर्जून हजेरी लावतात. महिनाभरात दाखल होणाऱ्या तक्रारींवर सुनावणी घेऊन प्रकरणांचा निपटारा केला जातो. हा उपक्रम नियमितपणे होत असला, तरी अलीकडच्या काळात समस्या निवारण दिनास उपस्थित राहणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. महापालिकेच्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर घेण्यात येणाऱ्या पोलिसांच्या या समस्या निवारण दिनाकडे नागरिक पाठ फिरवू लागले आहेत.