शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

दर महिन्याला तीन कोटी लसींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:16 IST

पुणे : दररोज पंधरा ते वीस लाख नागरिकांना लस देण्याची राज्याची क्षमता आहे. त्यामुळे राज्याला दर महिन्याला सुमारे तीन ...

पुणे : दररोज पंधरा ते वीस लाख नागरिकांना लस देण्याची राज्याची क्षमता आहे. त्यामुळे राज्याला दर महिन्याला सुमारे तीन कोटी लस उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या केवळ सव्वाकोटी उपलब्ध होत आहेत. केंद्र शासनाकडून लस उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढल्यास अधिकाधिक नागरिकांना कमीत कमी पहिला डोस देणे शक्य होईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले.

सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय, सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधक केंद्रातील प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना आणि टेलिमेडिसिन सर्व्हिसेसच्या लोकार्पण समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां.ब.मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ.विद्या येरवडेकर, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, सिंबायोसिसचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, सिंबायोसिस रूग्णालयाचे सीईओ डॉ. विजय नटराजन आदी उपस्थित होते.

जागतिक विद्यापीठाच्या पहिल्या २०० विद्यापीठाच्या क्रमवारीत भारतातील एकाही विद्यापीठाचे नाव येत नाही.या क्रमवारीत सिंबायोसिसचा समावेश व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून टोपे म्हणाले, सिंबायोसिसचे दोन्ही उपक्रम अनुकरणीय असून इतर खासगी रुग्णालयांनी त्याचे अनुकरण केले पाहिजे. तसेच राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) ५ टक्के खर्च क्षेत्रावर होणे गरजेचे आहे. सध्या होणारा खर्च खूप कमी असून त्यात वाढ होण्याची आवश्यकता आहे.

मुजूमदार म्हणाले, सिंबायोसिस रुग्णांकडून कोणतेही शुल्क घेत नाही. सध्या शासन आरोग्यावर खर्च कमी करत आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात चांगले काम करणा-या मेडिकल कॉलेजला अनुदान देण्याचा विचार करावा.

राजीव येरवडेकर म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामुळे सिंबायोसिसला वेगळे वळण मिळाले आहे. कोरोनंतरच्या उपचारासाठी सुरू केलेल्या टेलिमेडिसिमुळे रूग्णांना घरी बसून उपचार घेता येईल.

विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. तर रजनी गुप्ते यांनी आभार मानले.