शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

भूसंपादनाची प्रकिया थांबविण्याची मागणी, मिनी वाटप प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा केला आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:21 IST

भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सुरू करण्यात आलेली भूसंपादन, मिनी वाटप प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असून शासनाने शेतजमिनी अधिग्रहित केल्या आहेत.

पाटेठाण  - भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सुरू करण्यात आलेली भूसंपादन, मिनी वाटप प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असून शासनाने शेतजमिनी अधिग्रहित केल्या आहेत. परंतु, या भागाला कालव्याने पाणी मिळाले नाही. जमिनी गेल्या अन् पाणीही गेले, अशी अवस्था झाली आहे. परिणामी, धरणग्रस्तांना जमिनीचा ताबा देणार नसून भूसंपादनाची प्रक्रिया त्वरित थांबण्यात यावी; अन्यथा गावांगावामध्ये काळी दिवाळी साजरी करून चक्री उपोषण करण्याचा इशारा शेतकरी कृती समिती, माहिती सेवा समितीसह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.पाटेठाण (ता. दौंड) येथे नुकतीच काही शेतकरी कृती समितीची बैठक झाली. या वेळी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. कालव्याद्वारे खेड, हवेली व दौंड तालुक्यातील नागरिकांना पाणी दिले जाईल, अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात येऊन भामा-आसखेड धरण प्रामुख्याने शेतीच्या सिचनाच्या पाण्यासाठी बांधण्यात आले. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरातील शेतजमिनी शासनाने आरक्षित केल्या असून सन २०१३मध्ये राहू व लोणीकंद ही दोन गावे वगळता ‘आम्हाला पाणी नको, आमच्या जमिनी पुन्हा परत द्या,’ अशी लेखी पत्रे ग्रामपंचायतींनी दिली.यामुळे बंद पाईपलाईनद्वारे पुण्याला पाणी देण्याचा निर्णय शासनाला सोयीस्कर झाला. अद्याप या भागात कालवा झालेला नाही व पुणे शहराला पाणी दिल्यामुळे धरणात पाण्याची कमतरता निर्माण झाली. जमिनी तर गेल्या; मात्र पाणी मिळाले नाही. सध्या भामा-आसखेड धरणग्रस्तांना जमिनीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून खेड तालुक्यात त्याची सुरुवात झाली आहे. दौंड तालुक्यातील पाटेठाण व दहिटणे भागातदेखील महिन्यात धरणग्रस्तांना जमिनीचा ताबा देणार असल्याचा आदेश असून कार्यवाही देखील सुरू झाली आहे. परंतु भूसंपादनाची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत आहे. ती रद्द करावी; अन्यथा बुधवार (दि. ७) पासून परिसरात काळी दिवाळी तसेच च्रकी उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे.या वेळी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी ओबीसी आघाडीच्या तालुकाध्यक्षा ज्योती झुरुंगे, भामा-आसखेड कृती समितीचे सचिव विलास डुबे, पुरुषोत्तम हंबीर, गोविंद यादव उपस्थित होते.शेतक-यांवर सरकारकडून होतोय अन्यायदौंड तालुक्यातील शेतकºयांवर सरकार अन्याय करत आहे.आधी आराखड्याप्रमाणे कालव्याने पाणी मिळाले नसून त्यामुळे शेतकय्रांच्या सातबाय्रावरील पुनर्वसनाचे शेरे कमी करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा. - संदीप लगड, संस्थापक माहिती सेवा समिती

टॅग्स :Puneपुणे