शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भादलवाडी तलावात पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:14 IST

डाळज, भादलवाडी, कुंभारगाव, पिलेवाडी या गावातील हजारपेक्षा जास्त एकाहून अधिक क्षेत्र या तलावाच्या सिंचनाखाली येत असल्याने हा तलाव सिंचनाच्या ...

डाळज, भादलवाडी, कुंभारगाव, पिलेवाडी या गावातील हजारपेक्षा जास्त एकाहून अधिक क्षेत्र या तलावाच्या सिंचनाखाली येत असल्याने हा तलाव सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तसेच या तलावात अनेक विदेशी पक्षी फ्लेमिंगो तसेच विविध प्रकारच्या पक्षी आपल्या विणीसाठी या तलावात घरटी करतात ते पाहण्यासाठी अनेक पर्यटकही येत असतात. परंतु पाणी नसल्याने यंदा पक्षी येतात की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या तलावाच्या जवळच्या असणाऱ्या गावांची तहान या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असते. या तलावांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर अडवले जाते, त्यानंतर खडकवासला कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा आधार या तलावाला असतो. परंतु या भागात पाऊस कमी प्रमाणात झाला असून खडकवासला कालव्यातून अजून एकही पाण्याचे आवर्तन झाले नाही. त्यातच शेतकऱ्यांनी चारा पिकसह ऊस, फळबागा आदी पिकांचे उत्पादन केले असून येणाऱ्या काळामध्ये पिके धोक्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात पाटबंधारे विभागाची संपर्क साधला असता ते म्हणाले, तरंगवाडी तलाव भरल्यानंतर भादलवाडी तलावामध्ये पाणी सोडण्यात येईल. परंतु पूर्वी वर्षातून ठराविक कालावधीनंतर मिळणारे आवर्तन अलीकडे बेभरवशाचे झाल्याने या तलावातील परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.