शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परदेशात बिगर बासमती तांदळाला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:32 IST

भारतातील बिगर बासमती तांदळाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असून यंदा देशातून तब्बल ८६ लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. तसेच बासमती तांदळाची गेल्या वर्षाइतकीच निर्यात झाली असून बिगर बासमती व बासमती मिळून यंदा १२६ लाख टन तांदळाची विक्रमी निर्यात झाली. त्यात इराण व इराक या दोन देशात सर्वाधिक तांदळाची निर्यात झाली.

पुणे : भारतातील बिगर बासमती तांदळाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असून यंदा देशातून तब्बल ८६ लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. तसेच बासमती तांदळाची गेल्या वर्षाइतकीच निर्यात झाली असून बिगर बासमती व बासमती मिळून यंदा १२६ लाख टन तांदळाची विक्रमी निर्यात झाली. त्यात इराण व इराक या दोन देशात सर्वाधिक तांदळाची निर्यात झाली.बासमती व्यतिरिक्त इतर तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या देशांत तांदळाचे उत्पादन घटले. तसेच निर्यातीवरील निर्बंधामुळे बिगर बासमती तांदळाला चांगली मागणी आहे. भारतातून सुमारे ७० देशांमध्ये तांदळाची निर्यात केली जाते. त्यात अमेरिका, आॅस्टेलिया, आफ्रिका, युरोप, रशिया, सौदी अरेबिया, इराण, इराक या देशांचा समावेश आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा निर्यातीमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली असून त्यातून २३ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन देशाच्या तिजोरीत जमा झाले आहे.थायलंड आणि बांगलादेशसह इतर देशांच्या तुलनेत भारतातील तांदळाचे दर कमी होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेपाळ या देशात भारतातील बिगर बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात आली. भारत व आशिया खंडातून परदेशात स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या वाढली आहे. या नागरिकांकडून बिगर बासमती तांदळाला पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. यंदा पाऊस चांगला झाला तर देशातील तांदळाच्या उत्पादनात १ हजार लाख टनापर्यंत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, असेही शहा म्हणाले.दरम्यान, केंद्र शासनाने २०१० ते २०११ या कालावधीत भारतातून निर्यात होणाºया बिगर बासमती तांदळावर बंदी घातली होती. बंदी उठविल्यानंतर बासमती व्यतिरिक्त पहिल्याच वर्षी सुमारे ४० लाख टन इतर तांदळाची निर्यात करण्यात आली. २०१६-१७ मध्ये हा आकडा ८० लाख टनावर गेला होता.एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ४० लाख टन बासमती तर ८६ लाख टन बिगर बासमती तांदूळ परदेशात पाठविण्यात आला आहे. भारतात सर्वाधिक उत्पादित होणाºया आंबेमोहोर, कोलम, इंद्रायणी आदी तांदळाला यंदाही परदेशातील ग्राहकांची पसंती राहिली. गेल्या काही वर्षात पारंपरिक बासमती तांदळाचे उत्पादन घटले असून सुधारित बासमती तांदूळ काही ग्राहकांना न रुचल्याने राज्यासह परदेशात बिगर बासमती तांदळाला मागणी वाढली आहे.- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष,फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी