शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया ‘एमपीएससी’कडून राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST

अमोल अवचिते लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गातील एकूण ८९९ पदाची ...

अमोल अवचिते

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गातील एकूण ८९९ पदाची सरळ सेवेने भरती होणार आहेत. स्वतंत्र निवड मंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पद्धतीने पदे भरणे चुकीचे असून या महत्त्वपूर्ण पदाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि विधान परिषदेचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

एमपीएससी ही राज्यातील वर्ग १ व वर्ग २ या पदांची भरती प्रक्रिया राबविणारी घटनात्मक संस्था आहे. असे असूनसुद्धा अत्यावश्यक सेवा असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग १ च्या पदाची भरती प्रक्रिया स्वतंत्र निवड मंडळाकडून करणे हे असंविधानिक आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वर्ग १ या पदाची देखील भरती होणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाल्याचे दिसते. त्यामुळेच या दोन्ही पदांची भरती एमपीएससीकडून करण्याची मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ पदभरती आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीचा आरोग्य विभागाच्या परीक्षांचा घोळ ताजा असतानाच वर्ग १ या महत्त्वाच्या पदासाठी पुन्हा स्वतंत्र निवड मंडळ नेमून सरकारला घोळात घोळ घालायचा आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील परीक्षेचा निकाल रोखण्यात आला. पुन्हा असाच प्रकार घडला तर विद्यार्थ्यांनाच त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे एमपीएससीकडून या पदाची भरती करावी. २१ मार्चची राज्य सेवा पूर्व परीक्षा पारदर्शकपणे घेऊन एमपीएससीने क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे जलद भरती प्रक्रिया राबवून परीक्षा घेता येऊ शकते असे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोट

“एमपीएससी ही घटनात्मक संस्था असताना स्वतंत्र निवड मंडळाकडून वर्ग १ च्या पदांची भरती करण्यात येऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात तत्काळ भरती करायची आहे. एमपीएससीमार्फत जलद प्रक्रिया राबवून पदे भरता येतील. अत्यावश्यक सेवा म्हणून याचा दुरुपयोग होऊ नये. वर्ग ४ च्या भरती प्रक्रियेतील घोळ सर्वांनाच माहिती आहे. वर्ग १ या पदाची जबाबदारी मोठी आहे. एमपीएससीकडून भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडेल.”

- अॅड. निरंजन डावखरे, आमदार, विधान परिषद.

कोट

“काही वर्षांपूर्वी आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती करण्यास एमपीएससीला वेळ लागला होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने पद भरती एमपीएससीकडून काढून घेतली होती. तसा अधिकार सरकारला आहे. मात्र एमपीएससी ही स्वतंत्र संस्था असताना नवीन मंडळ नेमण्याची आवश्यकता नाही. एमपीएससीची परीक्षा घेण्याची नियमावली आहे. कोरोनामुळे सरकारला आरोग्य विभागात तात्काळ भरती करायची आहे. परंतु दीर्घ काळासाठी एमपीएससी या स्वतंत्र वैधानिक संस्थेकडूनच भरती प्रक्रिया राबविली गेली पाहिजे.”

-मधुकर कोकाटे, माजी अध्यक्ष, एमपीएससी.