शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ऊरुळी कांचन ते स्वारगेट आणि ऊरुळी कांचन ते निगडी अशा थेट बसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:16 IST

पुणेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप व संचालक शंकरराव पवार यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. उरुळी ...

पुणेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप व संचालक शंकरराव पवार यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

उरुळी कांचन हे पुणे शहराजवळील सर्वांगीन विकसित होत असलेले हवेली तालुक्याच्या पूर्वेकडील उपनगर आहे, तसेच हे गाव आसपासच्या सुमारे २५ गावे आणि वाड्या-वस्त्यांची मुख्य बाजारपेठ आहे, त्याचबरोबर ही गावे ३ तालुक्यांच्या सीमेवर वसलेले असल्यामुळे ३ तालुक्यांमधील अनेक गावांचे मुख्य संपर्काचे ठिकाण झाले आहे, तर जवळच नांदूर - सहजपूर येथे एक औद्योगिक वसाहत आहे. या वसाहती मधील कामगार, अधिकारी वर्ग नियमित पुणे येथून ये-जा करीत असतो, याच बरोबर अनेक शैक्षणिक संकुले या परिसरामध्ये आहेत, अनेक व्यावसायिक आस्थापना ( बँका ,खाजगी कंपन्यांची कार्यालये, हॉस्पिटल्स, फर्निचरची दुकाने, कापडाची मोठी बाजार पेठ इत्यादी ) मोठ्या प्रमाणांमध्ये कार्यरत आहे. या सर्वांचा नियमितपणे पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरी, निगडी, मार्केट यार्ड, हिंजवडी आय टी पार्क आणि पुणे आणि परिसरासाठी येणे जाणे चालू असते.

ऊरुळी कांचन येथे एसटी महामंडळाचा डेपो अथवा बसस्टँड असे काहीच नाही, त्यामुळे येथे पुण्याहून आणि मुंबईवरून सोलापूर, लातूर, बार्शी, गुलबर्गा, विजापूर, उस्मानाबाद वा मराठवाडा आणि कर्नाटककडे जाणाऱ्या आणि परत मुंबई-पुणेकडे परतणाऱ्या एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवासीवर्गाची प्रचंड अडचण होते.त्यामुळे वरील २ मार्गावर दर ३० मिनिटांच्या अंतराने प्रवासीबस सुरू करण्यात यावी अशी सातत्याने ग्रामस्थ, कामगार, कॉलेज ची मुले, शेतकरी वर्ग आदी मागणी प्रवासी संघ उरुळी कांचन आणि सरपंच ग्रामपंचायत ऊरुळी कांचन यांच्याकडे करीत असतात. प्रवासी संघ ही सातत्याने यांचा पाठपुरावा करीत आहे. परंतु अद्याप पर्यंत सदरचे २ मार्ग सुरू झालेले नाहीत.खरे तर ऊरुळी कांचन ते स्वारगेट व ऊरुळी कांचन ते निगडी असे मार्ग पूर्वी सुरू होते आणि ते पी.एम.पी.एम.एल, ला अत्यंत चांगला नफाही देत होते असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.