शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सिंहगड आणखी सव्वा महिना बंद, दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 05:14 IST

सिंहगडावर दरड कोसळल्यानंतर दुरुस्तीचे काम कोण करणार, या वादात डागडुजीचे काम दीड महिन्याहून अधिक काळ बंद राहिले; मात्र जिल्हाधिका-यांनी स्वत: यात लक्ष घालून आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कामास मंजुरी दिली.

पुणे : सिंहगडावर दरड कोसळल्यानंतर दुरुस्तीचे काम कोण करणार, या वादात डागडुजीचे काम दीड महिन्याहून अधिक काळ बंद राहिले; मात्र जिल्हाधिका-यांनी स्वत: यात लक्ष घालून आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कामास मंजुरी दिली; परंतु काम पूर्ण होण्यास सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले. पावसाळ्याबरोबरच दिवाळी सुटीमध्येही सिंहगड बंद राहणार आहे.दरड कोसळल्याने वनविभागाने सिंहगडावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. गडावर सतत पडणारा पाऊस व धुके यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले. त्यातच जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दुरुस्तीचे काम होत नाही, तोपर्यंत गडावरील वाहतूक सुरू करू नये, असे आदेश दिले; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या डागडुजीचे काम तत्काळ सुरू केले नाही. परिणामी वनविभागाने एका खासगी कंपनीकडून रस्त्यावर जाळ्या बसविण्याबाबत पहाणी करून घेतली. दोघांच्या भांडणामध्ये रस्त्याचे काम लांबत असल्याने अखेर जिल्हाधिकाºयांनी स्वत:च्या अधिकारात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिली.उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे म्हणाले की, सिंहगडावरील वाहतूक बंद असल्यामुळे पर्यटकांना जाता येत नाही, याचे आम्हाला दुख: होत आहे. काम लवकर सुरू करावे, यासाठीवनविभागाने पुढाकार घेतला होता.वनविभागाकडून गडावर जाणाºया दुचाकीसाठी २० रुपये, तर चारचाकीसाठी ५० रुपये आकारले जातात. शनिवारी व रविवारी गडावर येणा-या पर्यटकांची संख्या अधिक असते. गडावरील एकूण वाहनतळाची क्षमता विचारत घेऊन गडावर वाहने पाठविली जातात. गडावर सुटीच्या दिवशी एक हजार ते दीड हजार दुचाकी व ५०० ते ३०० चारचाकी वाहने जातात; परंतु दुरुस्तीमुळे गडावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.दरड कोसळलेल्या भागात जाळी बसविण्याच्या कामास सुरुवात झाली. सुमारे १२५ मीटर भागात जाळी बसविण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी लागणार आहे; तसेच कोंढणपूर फाटा ते सिंहगडापर्यंतचा रस्ता काँक्रिटचा केला जाणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली असून, नोव्हेंबर महिन्यात कामास सुरुवात होणार आहे; परंतु गडावरील रस्ता वाहतुकीसाठी केव्हा सुरू करावा, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारीच घेणार आहेत.- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण)