शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

देहूगाव ग्रामपंचायतीनं विकासनिधी परत करावा, जिल्हाधिका-यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:45 IST

देहूगाव ग्रामपंचायतीने हद्दीतील बांधकाने नियमित करताना शासन निर्णयाचा विचार न करताच सुमारे ३०० मालमत्ताधारकांकडून घरपट्टीइतकाच जमा केलेला विकासनिधी तत्काळ परत करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर काळोखे यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

देहूगाव : देहूगाव ग्रामपंचायतीने हद्दीतील बांधकाने नियमित करताना शासन निर्णयाचा विचार न करताच सुमारे ३०० मालमत्ताधारकांकडून घरपट्टीइतकाच जमा केलेला विकासनिधी तत्काळ परत करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर काळोखे यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामपंचायतीने शासनाच्या नवीन धोरणानुसार हद्दीतील बांधकामे नियमित करताना घरपट्टी वसूल करतानाच काही विकासनिधी घेण्याचे ठरविले होते. तसा ठरावही मासिक सभेत त्यांनी घेतला होता. मात्र, याबाबत ८ जुलै २०१६ च्या शासन निर्णयात मालमत्ताधारकांकडून घरपट्टीची रक्कम घेण्यात यावी, असे नमूद केले आहे. या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने व पदाधिकाºयांनी घरपट्टी घ्यायला हवी होती. गत पंचवार्षिकमध्ये असा विकास निधी घेतला जात होता. मात्र, त्यांचा दर कमी होता. याच धर्तीवर विद्यमान पदाधिकाºयांनी मासिक सभेत ठराव घेऊन जवळपास ३०० लोकांच्या मालमत्ता नोंदी केल्या. त्या पोटी घरपट्टीइतकी रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावर आक्षेप घेतल्यानंतर तो २८ जुलै २०१७ च्या ठराव क्रमांक ४० विषय क्रमांक १० नुसार रद्द केला. याच संदर्भात दि. २२ आॅगस्ट २०१७ रोजीचा ठराव क्रमांक ६२ व दि. २७ आॅक्टोबर २०१६ चा ठराव क्रमांक ८३ हा रद्द करून विकासनिधी दोन रुपये प्रतिचौरस फूट घेण्यात यावा, असा ठराव पदाधिकाºयांनी मंजूर केला आहे. हे करताना पूर्वी ग्रामविकास निधी घेण्याबाबतच्या ठरावास ग्रामसभेत मंजुरी घेणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता नागरिकांकडून असा विकासनिधी घेतला गेला आहे. हा विकासनिधी तातडीने संबंधित मालमत्ताधारकांना परत करावा, अशी मागणी काळोखे यांनी संबंधितांकडे केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने काळोखे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना याबाबत निवेदन दिले असून सदर रक्कम परत करावी, अशी मागणी केली आहे.