शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

मालिकांतून संस्कृतीचे अध:पतन

By admin | Updated: March 26, 2015 00:22 IST

सध्या हिंदी-मराठी वाहिन्यांवरील अनेक मालिकांच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला धक्का पोहोचविणाऱ्या अतिरंजित घटना दाखविल्या जात आहेत.

पुणे : सध्या हिंदी-मराठी वाहिन्यांवरील अनेक मालिकांच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला धक्का पोहोचविणाऱ्या अतिरंजित घटना दाखविल्या जात आहेत. परदेशातील लोकप्रिय टॉक शोची नक्कल करून रिअ‍ॅलिटी शो आणले जात आहेत. मालिका या बुद्धी भ्रष्ट करण्याचे माध्यम बनत आहेत. या करमणुकींना वेळीच मर्यादा घातल्या नाहीतर संस्कृतीचे अध:पतन होण्यास वेळ लागणार नसल्याचे परखड मत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित ‘सहचारिणी’ महिला विशेषांक आणि ‘रणरागिणी पुरस्कार’ वितरणाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुरेश घुले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास शिंदे, शिवराज घुले, शांताराम इंगवले, अमित कंधारे आणि स्मरणिकेच्या संपादिका वेणू शिंदे उपस्थित होत्या. या वेळी निकम यांच्या हस्ते डॉ. सुचिता फाळके, दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता जाधव, विद्या बागल, हलिमा कुरेशी, सुजाता तापकीर आदी विविध क्षेत्रांतील महिलांना ‘रणरागिणी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. निकम म्हणाले, ‘‘स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे कठोर कायदे झाले पाहिजेत, अशी मागणी होते. मात्र, याचा मुकाबला स्त्रियांनीच केला पाहिजे. यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. एकतर्फी प्रेम हा व्यवस्थेचा दोष की चित्रपट-मालिकांचा, असा प्रश्न शेवटी त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)४‘संस्कृती’ हा भारतीय कुटुंबव्यवस्थेचा पाया आहे. माणूस हा शिक्षणाने शिक्षित होतो; पण सुसंस्कृत नाही. त्यासाठी चांगल्या आचार-विचारांची गरज असते. स्त्री हे तर कुटुंबाचे बलस्थान मानले गेले आहे. चांगली पिढी घडविण्यासाठी तिची सदैव धडपड सुरू असते. मात्र, स्त्री जबाबदारीची जाणीव पुरूष संस्कृतीला नसल्याची खंत निकम यांनी व्यक्त केली.