शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मालिकांतून संस्कृतीचे अध:पतन

By admin | Updated: March 26, 2015 00:22 IST

सध्या हिंदी-मराठी वाहिन्यांवरील अनेक मालिकांच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला धक्का पोहोचविणाऱ्या अतिरंजित घटना दाखविल्या जात आहेत.

पुणे : सध्या हिंदी-मराठी वाहिन्यांवरील अनेक मालिकांच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला धक्का पोहोचविणाऱ्या अतिरंजित घटना दाखविल्या जात आहेत. परदेशातील लोकप्रिय टॉक शोची नक्कल करून रिअ‍ॅलिटी शो आणले जात आहेत. मालिका या बुद्धी भ्रष्ट करण्याचे माध्यम बनत आहेत. या करमणुकींना वेळीच मर्यादा घातल्या नाहीतर संस्कृतीचे अध:पतन होण्यास वेळ लागणार नसल्याचे परखड मत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित ‘सहचारिणी’ महिला विशेषांक आणि ‘रणरागिणी पुरस्कार’ वितरणाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुरेश घुले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास शिंदे, शिवराज घुले, शांताराम इंगवले, अमित कंधारे आणि स्मरणिकेच्या संपादिका वेणू शिंदे उपस्थित होत्या. या वेळी निकम यांच्या हस्ते डॉ. सुचिता फाळके, दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता जाधव, विद्या बागल, हलिमा कुरेशी, सुजाता तापकीर आदी विविध क्षेत्रांतील महिलांना ‘रणरागिणी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. निकम म्हणाले, ‘‘स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे कठोर कायदे झाले पाहिजेत, अशी मागणी होते. मात्र, याचा मुकाबला स्त्रियांनीच केला पाहिजे. यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. एकतर्फी प्रेम हा व्यवस्थेचा दोष की चित्रपट-मालिकांचा, असा प्रश्न शेवटी त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)४‘संस्कृती’ हा भारतीय कुटुंबव्यवस्थेचा पाया आहे. माणूस हा शिक्षणाने शिक्षित होतो; पण सुसंस्कृत नाही. त्यासाठी चांगल्या आचार-विचारांची गरज असते. स्त्री हे तर कुटुंबाचे बलस्थान मानले गेले आहे. चांगली पिढी घडविण्यासाठी तिची सदैव धडपड सुरू असते. मात्र, स्त्री जबाबदारीची जाणीव पुरूष संस्कृतीला नसल्याची खंत निकम यांनी व्यक्त केली.