शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

ठाम भूमिका असलेला अर्थसंकल्प

By admin | Updated: March 8, 2015 00:59 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेमध्ये नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठाम भूमिका मांडलेली दिसते. या अर्थसंकल्पाचे दूरगामी परिणाम काय होतील हे आगामी काळच ठरवेल,

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेमध्ये नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठाम भूमिका मांडलेली दिसते. या अर्थसंकल्पाचे दूरगामी परिणाम काय होतील हे आगामी काळच ठरवेल, असे प्रतिपादन ‘नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट’री (एनएसडीएल)चे उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांनी आज येथे केले. दि कॉसमॉस को-आॅपरेटिव्ह बँक आणि गरवारे कॉलेज आॅफ कॉमर्स यांच्या तर्फे टिळक यांचे ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०१५-१६’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष मधुकर अत्रे, ‘नॅफकॅब’चे अध्यक्ष आणि कॉसमॉस बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर, व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे, गरवारे कॉलेज आॅफ कॉमर्सचे प्राचार्य एन. एस. उमराणी, कॉसमॉस बँक संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य उमराणी यांनी प्रास्ताविकात या व्याख्यानाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. विक्रांत पोंक्षे यांनी टिळक यांचा परिचय करून दिला. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी टिळक यांचा सत्कार केला. उपप्राचार्य आनंद लेले यांनी आभार मानले. मिनोती दामले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)‘अच्छे दिन’ मिळवावे लागतीलया अर्थसंकल्पाचे वर्णन पाच ‘पी’ मध्ये करता येईल. यामध्ये पेट्रोल, पोस्ट, पेन्शन, प्रायसिंग, पोझिशन आणि पेशन्स यांचा समावेश करायला हवा. अर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प ‘कॉर्पोरेट’धार्जिणा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. मात्र, तशी परिस्थिती दिसत नाही. आगामी काळाचा विचार करून, एक ठाम विचार या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. याचे नेमके परिणाम काय होतील- हे आगामी काळच ठरवेल. जेटली यांनी अर्थसंकल्पाद्वारे ‘फूल भी खिलाएँ और गुल भी खिलाएँ’ असे म्हणावे लागेल. मोदीसरकार ‘अच्छे दिन..’चा वादा करीत असले, तरी हे ‘अच्छे दिन’ बायपोस्ट आपल्यापर्यंत येणार नाहीत, तर ‘अच्छे दिन’ आपल्याला मिळवावे लागतील, असे टिळक म्हणाले.