शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

घसरलेले बाजारभाव ‘जैसे थे’

By admin | Updated: February 23, 2017 02:19 IST

मागील वर्षी दुष्काळ पडला होता; परंतु यंदा सर्वत्र जोमदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिके

कारेगाव : मागील वर्षी दुष्काळ पडला होता; परंतु यंदा सर्वत्र जोमदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिके जोमदार आली आहेत. परंतु, कमी बाजारभावामुळे उत्पादनखर्चही निघत नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. नोटाबंदीनंतर सर्वच पिकांचे घसरलेले बाजार अद्यापही ‘जैसे थे’ असल्याने शेतकरी धास्तावला आहे.शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. जे येतात तेसुद्धा जास्त मजुरी मागत असल्याने उत्पादनखर्च वाढत आहे. एखाद्या कंपनीत कामाला गेल्यास शेतात काम करण्यापेक्षा अधिक मजुरी मिळते. त्यामुळे मजूर कंपनीत जाणे पसंत करतात. त्यामुळे कोणत्याही पिकांचा उत्पादनखर्च वाढत आहे. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदापीक घेतले जाते; परंतु मागील कित्येक वर्षांच्या सरासरीपेक्षा बाजारभाव या वर्षी मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. परिणामी, काही शेतकरी चक्क कांदा जाळत आहेत, तर काही भागात उभ्या पिकात जनावरे सोडली जात आहेत. अनेकदा बाजारात आणून माल खपत नसल्याने शेतकरी तो फेकून देणे पसंत करतात. चार ते पाच महिन्यांत कांदा निघत असल्याने बहुतांश जिरायत भागातील शेतकरी हे पीक घेतात. त्यामुळे पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. सध्या कांदा काढणीस आला आहे. परंतु, बाजारभाव नसल्याने शेतकरी तसाच कांदा ठेवत आहेत. त्याचा एकूणच ग्रामीण अर्थव्यवथेवर परिणाम होत आहे. तरकारी पिकांच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. मेथी, कोथिंबीर २-४ रुपये गड्डी जात असल्याने शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागते. तर, कधी बाजारात व्यापारी माल घेत नसल्याने फेकून द्यावा लागत आहे. टोमॅटो व फ्लॉवरचे दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी चालू फडात जनावरे सोडली आहेत. तर, काही शेतकरी तसाच माल पडू देत आहेत. मागील वर्षी दुष्काळामुळे उत्पादन कमी, तर यंदा बाजारभाव कमी असल्याने उत्पादन होऊनही पैसे हातात पडत नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.पीककर्ज कसे फेडणार ?या वर्षी ऊस वगळता कोणत्याच पिकाला उत्पादनखर्च निघेल, असा बाजारभाव मिळाला नाही. उसाला चांगला बाजारभाव असूनही सरासरी उत्पादन कमी निघाल्याने पदरात मोजकेच पैसे पडले. त्यामुळे कोणत्याच पिकातून पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. हातात पुरेसे पैसे नसल्याने मुलामुलींची लग्ने कशी करायची, हा प्रश्न त्याला सतावत आहे. महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी तागादा लावला जात आहे. परंतु, हाती पैसे नसल्याने वीजबिल कसे भरायचे, असा पेच निर्माण झाला आहे.नोटाबंदीनंतर शेतमालाचे भाव वधारतील, असे वाटत होते; परंतु बहुतांश पिकांचे बाजारभाव घसरले आहेत. त्यामुळे यंदा कोणत्याही पिकातून उत्पादनखर्च निघेल एवढे पैसे हाती लागले नाहीत. त्यामुळे पीककर्ज नवे-जुने तरी कसे करायचे? तसेच, केवळ आश्वासनावरच जगायचे का? शासन काही करणार आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. - शिवाजी डुबे, शेतकरी