शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

घसरलेले बाजारभाव ‘जैसे थे’

By admin | Updated: February 23, 2017 02:19 IST

मागील वर्षी दुष्काळ पडला होता; परंतु यंदा सर्वत्र जोमदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिके

कारेगाव : मागील वर्षी दुष्काळ पडला होता; परंतु यंदा सर्वत्र जोमदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिके जोमदार आली आहेत. परंतु, कमी बाजारभावामुळे उत्पादनखर्चही निघत नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. नोटाबंदीनंतर सर्वच पिकांचे घसरलेले बाजार अद्यापही ‘जैसे थे’ असल्याने शेतकरी धास्तावला आहे.शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. जे येतात तेसुद्धा जास्त मजुरी मागत असल्याने उत्पादनखर्च वाढत आहे. एखाद्या कंपनीत कामाला गेल्यास शेतात काम करण्यापेक्षा अधिक मजुरी मिळते. त्यामुळे मजूर कंपनीत जाणे पसंत करतात. त्यामुळे कोणत्याही पिकांचा उत्पादनखर्च वाढत आहे. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदापीक घेतले जाते; परंतु मागील कित्येक वर्षांच्या सरासरीपेक्षा बाजारभाव या वर्षी मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. परिणामी, काही शेतकरी चक्क कांदा जाळत आहेत, तर काही भागात उभ्या पिकात जनावरे सोडली जात आहेत. अनेकदा बाजारात आणून माल खपत नसल्याने शेतकरी तो फेकून देणे पसंत करतात. चार ते पाच महिन्यांत कांदा निघत असल्याने बहुतांश जिरायत भागातील शेतकरी हे पीक घेतात. त्यामुळे पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. सध्या कांदा काढणीस आला आहे. परंतु, बाजारभाव नसल्याने शेतकरी तसाच कांदा ठेवत आहेत. त्याचा एकूणच ग्रामीण अर्थव्यवथेवर परिणाम होत आहे. तरकारी पिकांच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. मेथी, कोथिंबीर २-४ रुपये गड्डी जात असल्याने शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागते. तर, कधी बाजारात व्यापारी माल घेत नसल्याने फेकून द्यावा लागत आहे. टोमॅटो व फ्लॉवरचे दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी चालू फडात जनावरे सोडली आहेत. तर, काही शेतकरी तसाच माल पडू देत आहेत. मागील वर्षी दुष्काळामुळे उत्पादन कमी, तर यंदा बाजारभाव कमी असल्याने उत्पादन होऊनही पैसे हातात पडत नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.पीककर्ज कसे फेडणार ?या वर्षी ऊस वगळता कोणत्याच पिकाला उत्पादनखर्च निघेल, असा बाजारभाव मिळाला नाही. उसाला चांगला बाजारभाव असूनही सरासरी उत्पादन कमी निघाल्याने पदरात मोजकेच पैसे पडले. त्यामुळे कोणत्याच पिकातून पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. हातात पुरेसे पैसे नसल्याने मुलामुलींची लग्ने कशी करायची, हा प्रश्न त्याला सतावत आहे. महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी तागादा लावला जात आहे. परंतु, हाती पैसे नसल्याने वीजबिल कसे भरायचे, असा पेच निर्माण झाला आहे.नोटाबंदीनंतर शेतमालाचे भाव वधारतील, असे वाटत होते; परंतु बहुतांश पिकांचे बाजारभाव घसरले आहेत. त्यामुळे यंदा कोणत्याही पिकातून उत्पादनखर्च निघेल एवढे पैसे हाती लागले नाहीत. त्यामुळे पीककर्ज नवे-जुने तरी कसे करायचे? तसेच, केवळ आश्वासनावरच जगायचे का? शासन काही करणार आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. - शिवाजी डुबे, शेतकरी