शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरचा विशेष दर्जा काढणे हे मोदी सरकारचे आजवरचे सर्वात मोठे यश : डॉ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 13:41 IST

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतांच्या राजकारणामुळे आजवर सरकारने काश्मिरमधील केवळ दोन राजकीय कुटुबांचे लाड पुरविले...

ठळक मुद्दे '370 वे आणि 35 अ कलम राष्ट्रीय भूमिकेतून विचारमंथन' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

पुणे:- जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा काढण्याचा मोदी सरकाराचा निर्णय राष्ट्रप्रेम आणि प्रखर राष्ट्रभक्तीतून प्रेरीत आहे.  राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतांच्या राजकारणामुळे आजवर सरकारने काश्मिरमधील केवळ दोन राजकीय कुटुबांचे लाड पुरविले. तसेच ३७० कलम आणि 35 अ हे काश्मिरमधून काढणे हे मोदी सरकारचे आजवरचे सर्वात मोठे राजकीय यश आहे. मोदींच्या कणखर नेतृत्वाने हे पाऊल उचलून जनमानसाच्या मनातील खदखदत्या जखमेवर फुंकर घातली, असे मत माजी संमेलन अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे कलम  370 आणि 35 अ बाबत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर '370 वे आणि 35 अ कलम राष्ट्रीय भूमिकेतून विचारमंथन' या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सबनीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष गौसिया खान, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड, भाई कात्रे, अभय छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले, ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येताना जिनांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे काश्मिरचा प्रश्न भिजत राहिला. अखंडीत भारताचे स्वप्न या भिजत पडलेल्या प्रश्नामुळे विघटीत होत होते. एकाच देशात राहून दोन झेंडे, दोन संविधान ही रुढ झालेली पद्धत मोदींच्या निर्णयामुळे उखडली गेली. भारताकडून विशेष राज्य म्हणवून घेत विशेष सवलती पदरी पाडत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत घ्यायची, पंरतू भारताचे संविधान मान्य करायचे नाही असा दुट्टप्पीपणा स्थानिक राजकीय नेतृत्वाने पिढ्यांन पिढ्या चालविला होता. तत्कालीन राजाने भारतात विलिन होताना टाकलेल्या जटील अटींमुळे काश्मिर भारताचा अविभाज्य भाग असूनही त्याच्यावर पाकिस्तान दावा करत होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत काश्मिर हा प्रश्न धुमसत ठेवत पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व देखील आपली पोळी भाजून घेण्याचेच काम करीत होते. मुळात पाकव्याप्त काश्मिर हा देखील भारताचाच भाग असून पाकिस्तानच्या आडमुठ्या भुमिकेमुळे हा विषय चर्चैत राहत आहे. चीन, रशिया, अमेरीका यांच्यातील आपआपसातील महासत्तांच्या संर्घषामुळे आतंरराष्ट्रीय समुदयाने देखील हा प्रश्न झुलवत ठेवला. भारताशी युद्धाची भाषा करणा-या पाकिस्तान बरोबरत भारताचे एक आठवडा  युद्ध चालले तरी पाकिस्तानात रोजच्या भाकरीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाकिस्तान पूर्णत: पोखरला गेला असून ज्या दहशतवाद्यांना भारतविरोधी कारवायांसाठी तयार केले होते, तेच दहशतवादी त्यांची डोकेदुखी ठरली आहे. त्या दहशतवादी प्रतिमेमुळे पाकिस्तान त्याची विश्वासहर्ता गमावून बसला आहे. काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असताना स्थानिक पातळीवर भारत सरकारने घेतलेला निर्णय हा भारताचा अंतर्गत प्रश्न असताना देखील देशोदेशी टोहो फोडून पाकिस्तान सरकार त्यांच्यावर अन्याय झाला, असे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या या नाटकी कोल्हेकुईला मुस्लिम धाजीर्णे सरकार असलेल्या मुस्लिम राष्ट्रांनी देखील पाठिंबा दिला नाही. 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ?ॅड.प्रमोद आडकर आदी मान्यवरांनी देखील थोडक्यात त्यांचे विचार मांडले. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले....... 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरShripal Sabnisश्रीपाल सबनीसNarendra Modiनरेंद्र मोदी