शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

काश्मीरचा विशेष दर्जा काढणे हे मोदी सरकारचे आजवरचे सर्वात मोठे यश : डॉ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 13:41 IST

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतांच्या राजकारणामुळे आजवर सरकारने काश्मिरमधील केवळ दोन राजकीय कुटुबांचे लाड पुरविले...

ठळक मुद्दे '370 वे आणि 35 अ कलम राष्ट्रीय भूमिकेतून विचारमंथन' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

पुणे:- जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा काढण्याचा मोदी सरकाराचा निर्णय राष्ट्रप्रेम आणि प्रखर राष्ट्रभक्तीतून प्रेरीत आहे.  राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतांच्या राजकारणामुळे आजवर सरकारने काश्मिरमधील केवळ दोन राजकीय कुटुबांचे लाड पुरविले. तसेच ३७० कलम आणि 35 अ हे काश्मिरमधून काढणे हे मोदी सरकारचे आजवरचे सर्वात मोठे राजकीय यश आहे. मोदींच्या कणखर नेतृत्वाने हे पाऊल उचलून जनमानसाच्या मनातील खदखदत्या जखमेवर फुंकर घातली, असे मत माजी संमेलन अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे कलम  370 आणि 35 अ बाबत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर '370 वे आणि 35 अ कलम राष्ट्रीय भूमिकेतून विचारमंथन' या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सबनीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष गौसिया खान, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड, भाई कात्रे, अभय छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले, ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येताना जिनांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे काश्मिरचा प्रश्न भिजत राहिला. अखंडीत भारताचे स्वप्न या भिजत पडलेल्या प्रश्नामुळे विघटीत होत होते. एकाच देशात राहून दोन झेंडे, दोन संविधान ही रुढ झालेली पद्धत मोदींच्या निर्णयामुळे उखडली गेली. भारताकडून विशेष राज्य म्हणवून घेत विशेष सवलती पदरी पाडत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत घ्यायची, पंरतू भारताचे संविधान मान्य करायचे नाही असा दुट्टप्पीपणा स्थानिक राजकीय नेतृत्वाने पिढ्यांन पिढ्या चालविला होता. तत्कालीन राजाने भारतात विलिन होताना टाकलेल्या जटील अटींमुळे काश्मिर भारताचा अविभाज्य भाग असूनही त्याच्यावर पाकिस्तान दावा करत होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत काश्मिर हा प्रश्न धुमसत ठेवत पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व देखील आपली पोळी भाजून घेण्याचेच काम करीत होते. मुळात पाकव्याप्त काश्मिर हा देखील भारताचाच भाग असून पाकिस्तानच्या आडमुठ्या भुमिकेमुळे हा विषय चर्चैत राहत आहे. चीन, रशिया, अमेरीका यांच्यातील आपआपसातील महासत्तांच्या संर्घषामुळे आतंरराष्ट्रीय समुदयाने देखील हा प्रश्न झुलवत ठेवला. भारताशी युद्धाची भाषा करणा-या पाकिस्तान बरोबरत भारताचे एक आठवडा  युद्ध चालले तरी पाकिस्तानात रोजच्या भाकरीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाकिस्तान पूर्णत: पोखरला गेला असून ज्या दहशतवाद्यांना भारतविरोधी कारवायांसाठी तयार केले होते, तेच दहशतवादी त्यांची डोकेदुखी ठरली आहे. त्या दहशतवादी प्रतिमेमुळे पाकिस्तान त्याची विश्वासहर्ता गमावून बसला आहे. काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असताना स्थानिक पातळीवर भारत सरकारने घेतलेला निर्णय हा भारताचा अंतर्गत प्रश्न असताना देखील देशोदेशी टोहो फोडून पाकिस्तान सरकार त्यांच्यावर अन्याय झाला, असे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या या नाटकी कोल्हेकुईला मुस्लिम धाजीर्णे सरकार असलेल्या मुस्लिम राष्ट्रांनी देखील पाठिंबा दिला नाही. 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ?ॅड.प्रमोद आडकर आदी मान्यवरांनी देखील थोडक्यात त्यांचे विचार मांडले. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले....... 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरShripal Sabnisश्रीपाल सबनीसNarendra Modiनरेंद्र मोदी