शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

काश्मीरचा विशेष दर्जा काढणे हे मोदी सरकारचे आजवरचे सर्वात मोठे यश : डॉ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 13:41 IST

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतांच्या राजकारणामुळे आजवर सरकारने काश्मिरमधील केवळ दोन राजकीय कुटुबांचे लाड पुरविले...

ठळक मुद्दे '370 वे आणि 35 अ कलम राष्ट्रीय भूमिकेतून विचारमंथन' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

पुणे:- जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा काढण्याचा मोदी सरकाराचा निर्णय राष्ट्रप्रेम आणि प्रखर राष्ट्रभक्तीतून प्रेरीत आहे.  राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतांच्या राजकारणामुळे आजवर सरकारने काश्मिरमधील केवळ दोन राजकीय कुटुबांचे लाड पुरविले. तसेच ३७० कलम आणि 35 अ हे काश्मिरमधून काढणे हे मोदी सरकारचे आजवरचे सर्वात मोठे राजकीय यश आहे. मोदींच्या कणखर नेतृत्वाने हे पाऊल उचलून जनमानसाच्या मनातील खदखदत्या जखमेवर फुंकर घातली, असे मत माजी संमेलन अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे कलम  370 आणि 35 अ बाबत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर '370 वे आणि 35 अ कलम राष्ट्रीय भूमिकेतून विचारमंथन' या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सबनीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष गौसिया खान, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड, भाई कात्रे, अभय छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले, ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येताना जिनांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे काश्मिरचा प्रश्न भिजत राहिला. अखंडीत भारताचे स्वप्न या भिजत पडलेल्या प्रश्नामुळे विघटीत होत होते. एकाच देशात राहून दोन झेंडे, दोन संविधान ही रुढ झालेली पद्धत मोदींच्या निर्णयामुळे उखडली गेली. भारताकडून विशेष राज्य म्हणवून घेत विशेष सवलती पदरी पाडत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत घ्यायची, पंरतू भारताचे संविधान मान्य करायचे नाही असा दुट्टप्पीपणा स्थानिक राजकीय नेतृत्वाने पिढ्यांन पिढ्या चालविला होता. तत्कालीन राजाने भारतात विलिन होताना टाकलेल्या जटील अटींमुळे काश्मिर भारताचा अविभाज्य भाग असूनही त्याच्यावर पाकिस्तान दावा करत होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत काश्मिर हा प्रश्न धुमसत ठेवत पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व देखील आपली पोळी भाजून घेण्याचेच काम करीत होते. मुळात पाकव्याप्त काश्मिर हा देखील भारताचाच भाग असून पाकिस्तानच्या आडमुठ्या भुमिकेमुळे हा विषय चर्चैत राहत आहे. चीन, रशिया, अमेरीका यांच्यातील आपआपसातील महासत्तांच्या संर्घषामुळे आतंरराष्ट्रीय समुदयाने देखील हा प्रश्न झुलवत ठेवला. भारताशी युद्धाची भाषा करणा-या पाकिस्तान बरोबरत भारताचे एक आठवडा  युद्ध चालले तरी पाकिस्तानात रोजच्या भाकरीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाकिस्तान पूर्णत: पोखरला गेला असून ज्या दहशतवाद्यांना भारतविरोधी कारवायांसाठी तयार केले होते, तेच दहशतवादी त्यांची डोकेदुखी ठरली आहे. त्या दहशतवादी प्रतिमेमुळे पाकिस्तान त्याची विश्वासहर्ता गमावून बसला आहे. काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असताना स्थानिक पातळीवर भारत सरकारने घेतलेला निर्णय हा भारताचा अंतर्गत प्रश्न असताना देखील देशोदेशी टोहो फोडून पाकिस्तान सरकार त्यांच्यावर अन्याय झाला, असे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या या नाटकी कोल्हेकुईला मुस्लिम धाजीर्णे सरकार असलेल्या मुस्लिम राष्ट्रांनी देखील पाठिंबा दिला नाही. 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ?ॅड.प्रमोद आडकर आदी मान्यवरांनी देखील थोडक्यात त्यांचे विचार मांडले. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले....... 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरShripal Sabnisश्रीपाल सबनीसNarendra Modiनरेंद्र मोदी