शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरचा विशेष दर्जा काढणे हे मोदी सरकारचे आजवरचे सर्वात मोठे यश : डॉ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 13:41 IST

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतांच्या राजकारणामुळे आजवर सरकारने काश्मिरमधील केवळ दोन राजकीय कुटुबांचे लाड पुरविले...

ठळक मुद्दे '370 वे आणि 35 अ कलम राष्ट्रीय भूमिकेतून विचारमंथन' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

पुणे:- जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा काढण्याचा मोदी सरकाराचा निर्णय राष्ट्रप्रेम आणि प्रखर राष्ट्रभक्तीतून प्रेरीत आहे.  राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि मतांच्या राजकारणामुळे आजवर सरकारने काश्मिरमधील केवळ दोन राजकीय कुटुबांचे लाड पुरविले. तसेच ३७० कलम आणि 35 अ हे काश्मिरमधून काढणे हे मोदी सरकारचे आजवरचे सर्वात मोठे राजकीय यश आहे. मोदींच्या कणखर नेतृत्वाने हे पाऊल उचलून जनमानसाच्या मनातील खदखदत्या जखमेवर फुंकर घातली, असे मत माजी संमेलन अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे कलम  370 आणि 35 अ बाबत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर '370 वे आणि 35 अ कलम राष्ट्रीय भूमिकेतून विचारमंथन' या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सबनीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष गौसिया खान, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड, भाई कात्रे, अभय छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले, ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येताना जिनांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे काश्मिरचा प्रश्न भिजत राहिला. अखंडीत भारताचे स्वप्न या भिजत पडलेल्या प्रश्नामुळे विघटीत होत होते. एकाच देशात राहून दोन झेंडे, दोन संविधान ही रुढ झालेली पद्धत मोदींच्या निर्णयामुळे उखडली गेली. भारताकडून विशेष राज्य म्हणवून घेत विशेष सवलती पदरी पाडत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत घ्यायची, पंरतू भारताचे संविधान मान्य करायचे नाही असा दुट्टप्पीपणा स्थानिक राजकीय नेतृत्वाने पिढ्यांन पिढ्या चालविला होता. तत्कालीन राजाने भारतात विलिन होताना टाकलेल्या जटील अटींमुळे काश्मिर भारताचा अविभाज्य भाग असूनही त्याच्यावर पाकिस्तान दावा करत होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत काश्मिर हा प्रश्न धुमसत ठेवत पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व देखील आपली पोळी भाजून घेण्याचेच काम करीत होते. मुळात पाकव्याप्त काश्मिर हा देखील भारताचाच भाग असून पाकिस्तानच्या आडमुठ्या भुमिकेमुळे हा विषय चर्चैत राहत आहे. चीन, रशिया, अमेरीका यांच्यातील आपआपसातील महासत्तांच्या संर्घषामुळे आतंरराष्ट्रीय समुदयाने देखील हा प्रश्न झुलवत ठेवला. भारताशी युद्धाची भाषा करणा-या पाकिस्तान बरोबरत भारताचे एक आठवडा  युद्ध चालले तरी पाकिस्तानात रोजच्या भाकरीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाकिस्तान पूर्णत: पोखरला गेला असून ज्या दहशतवाद्यांना भारतविरोधी कारवायांसाठी तयार केले होते, तेच दहशतवादी त्यांची डोकेदुखी ठरली आहे. त्या दहशतवादी प्रतिमेमुळे पाकिस्तान त्याची विश्वासहर्ता गमावून बसला आहे. काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असताना स्थानिक पातळीवर भारत सरकारने घेतलेला निर्णय हा भारताचा अंतर्गत प्रश्न असताना देखील देशोदेशी टोहो फोडून पाकिस्तान सरकार त्यांच्यावर अन्याय झाला, असे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या या नाटकी कोल्हेकुईला मुस्लिम धाजीर्णे सरकार असलेल्या मुस्लिम राष्ट्रांनी देखील पाठिंबा दिला नाही. 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ?ॅड.प्रमोद आडकर आदी मान्यवरांनी देखील थोडक्यात त्यांचे विचार मांडले. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले....... 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरShripal Sabnisश्रीपाल सबनीसNarendra Modiनरेंद्र मोदी