शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात अपील करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:09 IST

--------------------------- पुणे : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मानाचा मुजरा कार्यक्रमासाठी झालेला दहा लाख ७८ हजार रुपयांचा ...

---------------------------

पुणे : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मानाचा मुजरा कार्यक्रमासाठी झालेला दहा लाख ७८ हजार रुपयांचा वाढीव खर्च महामंडळाला परत करण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. मात्र, हा निर्णय देताना आमची बाजू मांडण्याची त्यांनी संधी दिली नाही. त्यामुळे या निर्णयाला आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत, अशी माहिती अभिनेते विजय पाटकर, अभिनेंत्री प्रिया बेर्डे यांनी आज दिली.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने २०१० ते २०१५ या कालावधीत घेतलेल्या ‘मानाचा मुजरा’ हा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये वाढीव खर्च झाला होता. त्याविरोधात महामंडळाच्या कार्यकारी सदस्यांनी धर्मादाय कार्यालयात तक्रार केली होती. त्याचा निर्णय देताना धर्मादाय आयुक्तांनी तत्कालीन कार्यकारिणीनेही खर्च केलेली वाढीव रक्कम महामंडळाला परत करावी, असा आदेश दिला आहे. या कार्यकारिणीमध्ये अलका कुबल, विजय पाटकर, प्रिया बेर्डे आदींचा समावेश होता. त्याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी आज विजय पाटकर, प्रिया बेर्डे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी मिलिंद अष्टेकर, धमाजी यमकर, रणजीत जाधव, ॲड. सत्यपाल लोणकर, इम्तीयाज बारगीर उपस्थित होते.

पाटकर म्हणाले की, ‘मानाचा मुजार’ या कार्यक्रमाता वाढीव खर्च झाला त्याचा हिशेब आम्ही कार्यकारिणीत सादर केला त्यालाही मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्याचे ऑडिटर कडूनही त्याचे ऑडिट झाले. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून येणाऱ्या कलाकारांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करताना हा वाढीव खर्च झाला होता, तो कोणाच्याही वैयक्तिक कारणासाठी खर्च झालेला नाही. मात्र, तरी देखील आकसापोटी ही तक्रार दाखल झाली आणि आयुक्तांनीही आम्हाला बाजू मांडायची संधी न देता थेट निर्णय दिला आहे. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात याबाबत दाद मागू.

--

चौकट

निवडणुकीमुळे राजेभोसलेंकडून आकसाचे राजकारण

चित्रपट महामंडळाची निवडणूक जवळ आली आहे, त्या निवडणुकीसाठी आम्ही पुन्हा एकदा जोमाने तयारी करत आहोत. त्याच्याच आकसापोटी विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडून हे राजकारण केले जात आहे. या खर्चाला मंजुरी मिळाली असताना व त्याचे ऑडिट झालेले असतानाही काही सद्स्यांना हाताशी धरून त्यांनी अशा तक्रारी करायला लावल्या आहेत. मात्र त्यातील तक्रारदारच आता त्यांच्यावर आरोप करत असल्याने त्यांच्या आकसाचे राजकारण उघड झाले असल्याचा आरोपही विजय पाटकर व प्रिया बेर्डे यांनी केला.

--