शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

‘अभिजात’वरून श्रेयाचा वाद, महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 04:02 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेतला असताना, साहित्य महामंडळाला मात्र आंदोलनाचे वावडे असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. ‘अभिजात’च्या दर्जाचे श्रेय विशिष्ट व्यक्ती अथवा संस्थेच्या पारड्यात पडू नये, यासाठी श्रेयवादाचे राजकारण रंगत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेतला असताना, साहित्य महामंडळाला मात्र आंदोलनाचे वावडे असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. ‘अभिजात’च्या दर्जाचे श्रेय विशिष्ट व्यक्ती अथवा संस्थेच्या पारड्यात पडू नये, यासाठी श्रेयवादाचे राजकारण रंगत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आंदोलनाची दिशा राजकीय गटबाजीची, तसेच पुणेकेंद्री राहणार नाही आणि आंदोलन सर्वसमावेशक असेल, अशा भूमिकेतून महामंडळाने मसापला टोला लगावला आहे.‘अभिजात’च्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मसापने दिल्लीत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. पण, दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या. हा विषय मार्गी लागावा, यासाठी साहित्य परिषदेने लोकचळवळ सुरू केली. पंतप्रधान कार्यालयाला एक लाखाहून अधिक पत्र पाठवत सातत्याने पत्रव्यवहार केला. अभिजात दर्जासाठी आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे.मराठीला अभिजातचा दर्जा मिळणे हा मराठी अस्मितेचा विषय आहे. २७ फेब्रुवारीपूर्वी अभिजातचा निर्णय जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल,’ अशी भूमिका मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडली. ‘अभिजातसाठी साहित्य, भाषा, संस्कृतीसंबंधी कार्य करणाºया संस्था, आघाड्या, त्यांचे कार्यकर्ते यांच्याशी सतत संपर्कात राहून कृती समितीची स्थापना व्हायला हवी. आंदोलन ही सर्वसमावेशक पद्धतीने करण्याची बाब आहे आणि ते केवळ ‘अभिजात’साठी व केवळ अभिजनांचे होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. आंदोलन दलित, ग्रामीण भाषिक संवेदनांचेही ते प्रतिनिधित्व करणारे असेल, मराठीचे ‘अभिजात’व्यतिरिक्त ही अनेक जीवघेणे प्रश्न हाताळणारे ते असेल, असे यानिमित्ताने बघितले जाण्याची गरज आहे,’ असे मत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.कृती सर्वसमावेशक हवीअभिजात दर्जाबरोबरच महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागणीही लावून धरणे गरजेचे आहे. मराठी भाषिक धुरिणांनी व नव्या नेतृत्वांकडून लक्ष दिले जाणे अतिशय आवश्यक आहे. या मागणीचे रूपांतर जनआंदोलनात करण्याची वेळ आलेली आहे. याबाबतची कृती सामूहिक आणि सर्वसमावेशक असावी, अशी अपेक्षा श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, ‘डोंबिवली साहित्य संमेलनात ठराव केल्यापासूनच मुख्यमंत्र्यांनी याबाबत किमान एक दिवस तरी जंतरमंतरवर धरणे दिल्यास सर्वव्यापी लढ्याला बळ मिळेल, हे म्हणणे लावून धरले आहे.’अन्यथा आपल्याला परवानगीसुद्धा न मिळता, केवळ प्रार्थना करूनच दिल्लीतून वारंवार परतावे लागेल.

टॅग्स :marathiमराठीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र