शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शिरूरमध्ये डेंगीमुळे महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 05:50 IST

येथील सुनीता मुकुंद फटांगरे (वय ४२) या महिलेचा डेंगीने पुणे येथे मृत्यू झाला. शहरात डेंगीची साथ पसरली असून तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार शहरात ५० डेंगीसदृश तर ५ रुग्ण डेंगी पॉझिटीव्ह आढळले आहेत

शिरूर : येथील सुनीता मुकुंद फटांगरे (वय ४२) या महिलेचा डेंगीने पुणे येथे मृत्यू झाला. शहरात डेंगीची साथ पसरली असून तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार शहरात ५० डेंगीसदृश तर ५ रुग्ण डेंगी पॉझिटीव्ह आढळले आहेत. या महिलेच्या मृत्यूमुळे नगर परिषद प्रशासन व तालुका आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून उद्यापासून साथ आटोक्यात आणण्यासाठी धडक उपाययोजना सुरू करण्याच्या तयारीत आहेत.फटांगरे या चारदिवसांपूर्वी येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांची डेंगीची प्राथमिक तपासणी केली असता त्यांना डेंगीसदृश लक्षणे आढळली. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, सोमवारी त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे आढळून आल्यावर त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी पहाटे ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. केईएम रुग्णालयाने फटांगरे यांची डेंगीची (आयजीजी, आयजीएच) ही तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. गेली पंधवड्यापासून शहरात डेंगीसदृश आजाराची साथ पसरली आहे. नगरपरिषदेने सुरुवातीला याकडे हवे तेवढे गांभिर्याने पाहिले नाही. गावांचा वाढता विस्तार पाहता नगरपरिषदेची कर्मचारी संख्या अपूरी पडत आहे. मलेरिया, हिवताप विभागाचे काम करणाºया तालुका आरोग्य विभागाने त्याची जबाबदारी असताना फक्त दोनच (एमपीडब्ल्यू) माणसे नगरपरिषदेला दिली. शहरातील आरोग्याचे काम आमचे नाही, असेच तालुका आरोग्य अधिकारी सांगू लागले. शहरात पसरलेल्या या परिस्थितीशी सामना करण्यासाठी या विभागाने त्यांची तालुक्यातील इतर कर्मचारी देणे अपेक्षित असताना याकडे गांभिर्याने पाहिले नाही. आपली जबाबदारी ढकलत हे काम नगरपषिदेचेच असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. साथ आटोक्यात आणायची असेल तर शहरात एकाच वेळी सर्व भागात धुरळणी व फवारणी करणे गरजेचे असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. नगरपरिषद आरोग्याला प्राधान्य देत असून तालुका आरोग्य विभागाच्या सहकार्याने साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांनी सांगितले. १५ दिवसांपासून नगरपरिषदेने धुरळणी, फवारणी मोहीम सुरू केली असल्याचे मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी सांगितले.