शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

विषबाधेमुळे १०० मेंढ्यांचा मृत्यू

By admin | Updated: June 26, 2016 04:37 IST

वीर धरण परिसरात चारावयास नेलेल्या बकऱ्यांना विषबाधा होऊन जवळपास १०० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील तोंडल गावाच्या हद्दीमध्ये साई इंटरनॅशनल

परिंचे : वीर धरण परिसरात चारावयास नेलेल्या बकऱ्यांना विषबाधा होऊन जवळपास १०० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील तोंडल गावाच्या हद्दीमध्ये साई इंटरनॅशनल हॉटेलच्यासमोरील धरण परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेत जवळपास ४१० मेंढ्या अत्यवस्थ आहेत. यामुळे मेंढ्यांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे या परिसरात राज्याच्या अनेक भागांतून मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारावयास घेऊन येतात. दुर्घटनाग्रस्त मेंढ्या पुरंदर तालुक्यातील मेंढपाळांच्या आहेत. ७५० मेंढ्या घेऊन बेलसर येथील दगडू बबन मोटे व अण्णा बबन मोटे तसेच वाल्हे गावचे गुलाब नारायण मदन हे मेंढपाळ धरणालगत मेंढ्या चारत होते. मात्र, अचानक मेंढ्या मृत्युमुखी पडायला लागल्या. (वार्ताहर)काविळीची लक्षणेडॉक्टरांनी प्रथमदर्शनी केलेल्या तपासणीमध्ये मेंढ्यांना कावीळ व तापाची लक्षणे आढळून आली आहेत. ग्रामस्थांनीदेखील दूषित पाण्याने ही दुर्घटना घडली असावी, असे मत व्यक्त केले आहे. यामुळे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तोंडलचे पोलीसपाटील तसेच अनिल कदम, हनुमंत जाधव, उत्तमराव कदम व महेंद्र सुतार या पंचांनी सांगितले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून तहसील कार्यालयाकडे तो पाठवण्यात आला आहे.