शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

राष्ट्रीय परवान्यावरील वाहनांच्या नूतनीकरणाची ३० सप्टेंबरपर्यंतच मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:14 IST

बारामती: राष्ट्रीय परवान्यावरील वाहनांच्या नूतनीकरणाची मुदत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ...

बारामती: राष्ट्रीय परवान्यावरील वाहनांच्या नूतनीकरणाची मुदत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ‘आरटीओ’ कार्यालय सुटीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी २०२० पासून अनुज्ञाप्ती, परवाना व योग्यता प्रमाणपत्र मुदत संपुष्टात आली असल्यास. लॉकडाऊनमुळे नूतनीकरण होऊ शकले नसल्यास त्यास ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामध्ये ॲथोरायझेशनचा उल्लेख नसल्याने क्षेत्रीय स्तरावर व सीमा तपासणी नाक्यावर अंमलबजावणी करताना अडचणी येत आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ८७ मध्ये प्राधिकार पत्राबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. उक्त नियमाच्या ८७(२)(३) नुसार राष्ट्रीय परवान्यावर चालणाऱ्या वाहनांकरिता एका वर्षाच्या प्राधिकार पत्राचे शुल्क १६५००/- भरणे आवश्यक आहे आणि ते एक वर्षाकरिता वैध असते. केंद्र शासनाने २४ मार्च २०२० पासून लागू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वैधता संपुष्टात आलेल्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र / परवाना / वाहन नोंदणी कागदपत्रांची ,चालक अनुज्ञाप्तीची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्याबाबतचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्राधिकार पत्राबाबत मुदत वाढ देण्यात आलेली नाही.

काेरोनाचे पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टप्प्याटप्पाने १ फेब्रवारी २०२० पासून मुदत संपुष्टात आलेल्या अनुज्ञाप्ती, तसेच परवाना तसेच योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण जे कोविड-१९ चे परिस्थितीमुळे नूतनीकरण करता येऊ शकलेले नाही त्यास प्रथम ३०जून, ३० सप्टेंबर ,३१ डिसेंबर २०२० व यापुढे ३१मार्च, ३० जून तसेच आता ३० जूनपर्यंत संबंधित कागदपत्रे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि, त्यामध्ये ॲथोरायझेशनचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच -ॲथोरायझेशन फी ही बॅंकेतून ऑनलाईन भरणा करता येऊ शकते, या पार्श्वभूमीवर भरण्यासाठी शासनाने कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही,असे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित कामकाज ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये शासकीय सुटीच्या दिवशी देखील संबंधित कामकाज आरटीओ कार्यालय पूर्ण करणार आहे. त्यासाठी प्रतिदिन १५० जणांना अपॉईंटमेंट्स देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी सांगितले.