शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दिवे घाट बनलाय ‘कचरा घाट’, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:33 IST

दिवे घाटात कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप बंद झालेले नाहीत. यापूर्वी अनेकदा तक्रार करूनही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे दिवे घाट हा कचरा घाट बनला आहे. त्यामुळे या घाटाचे सौंदर्य नष्ट होत आहे.

जयवंत गंधाले/लोकमत न्यूज नेटवर्कफुरसुुंगी : दिवे घाटात कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप बंद झालेले नाहीत. यापूर्वी अनेकदा तक्रार करूनही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे दिवे घाट हा कचरा घाट बनला आहे. त्यामुळे या घाटाचे सौंदर्य नष्ट होत आहे.दिवे घाटात पूर्वीपासून अनेक ठिकाणी कचरा आहे. हा कचरा न उचलता आणखीन टाकण्यात येत आहे. त्यातच आता एक्स्पायरी झालेली औषधे, सुया, इंजेक्शन सिरींज, गोळ्या, सलाईन बाटल्या, पावडर, पट्ट्या, सिरप लिक्विडच्या बाटल्या व वैद्यकीयसाठी लागणारे सर्वच एक्स्पायर झालेले व वापरलेले साहित्य मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहे. तसेच ते पेटवून दिले जात आहे. असे साहित्य अर्धवट जळाल्याने घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खराब वास व धूर निर्माण होत आहे. त्यामुळे येथील वन्यजीव वनस्पती व जीवसंपत्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे येणाºया पर्यटक व प्रवाशांचे या कचºयामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. जवळच मस्तानी तलाव असून, हा कचरा पाऊस पडल्यावर पाण्यात जात आहे. त्यामुळे तेथील तलावदेखील दूषित होत आहे. या तलावातील पाणी शेतीला देण्यात येते. त्यामुळे शेतात प्रदूषित पाणी गेल्याने पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.निवेदन देऊनही कारवाई नाहीयाबाबत अन्न औषध विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परंतु त्यांच्याकडून काहीच कारवाई करण्यात येत नाही. यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शादाब मुलाणी, ज्ञानेश्वर कामठे, अमित गुरव, आकाश खैरे, रूपेश बोबडे, मयूरेश जाधव, धीरज गायकवाड यांनी केली आहे.महामार्गावर कचराच कचरालोकमत न्यूज नेटवर्कआंबेगाव बुद्रुक : पुणे शहरालगतच्या अकरा गावांचा पुणे महापालिकेमध्ये नुकताच समावेश करण्यात आला. परंतु या नवीन गावात असणाºया समस्या कशाप्रकारे सोडवता येतील, या बाबत महापालिकेत चर्चा सुरु आहे. नुकतीच पुणे महापालिकेचे सहायक आयुक्तांनी या गावांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. परंतु, अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.कात्रज-देहू बाह्यवळण महामार्गावर जागोजागी कचºयाचे ढिगारे साठलेले आहेत. या कचºयामध्ये बाटल्या, कुजकी फळे, बारदाणे, जुने कपडे इत्यादींचा समावेश आहे. हा कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो.नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुरामुळे वाहनचालकांना वाहने चालवणेही अवघड बनत आहे.त्यामुळे कचरा पेटवू नये, अशी मागणी होत आहे.नागरिकांनी आपल्या घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता कचराकुंडीत टाकला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता राखणे आपली जबाबदरी आहे असे समजून त्या जागेची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे.- अरुण राजवाडे, अध्यक्ष,भाजपा खडकवासला मतदारसंघ

टॅग्स :Puneपुणे