शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
7
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
8
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
9
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
10
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
11
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
12
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
13
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
14
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
15
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
16
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
17
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
18
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
19
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
20
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

दिवे घाट बनलाय ‘कचरा घाट’, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:33 IST

दिवे घाटात कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप बंद झालेले नाहीत. यापूर्वी अनेकदा तक्रार करूनही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे दिवे घाट हा कचरा घाट बनला आहे. त्यामुळे या घाटाचे सौंदर्य नष्ट होत आहे.

जयवंत गंधाले/लोकमत न्यूज नेटवर्कफुरसुुंगी : दिवे घाटात कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप बंद झालेले नाहीत. यापूर्वी अनेकदा तक्रार करूनही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे दिवे घाट हा कचरा घाट बनला आहे. त्यामुळे या घाटाचे सौंदर्य नष्ट होत आहे.दिवे घाटात पूर्वीपासून अनेक ठिकाणी कचरा आहे. हा कचरा न उचलता आणखीन टाकण्यात येत आहे. त्यातच आता एक्स्पायरी झालेली औषधे, सुया, इंजेक्शन सिरींज, गोळ्या, सलाईन बाटल्या, पावडर, पट्ट्या, सिरप लिक्विडच्या बाटल्या व वैद्यकीयसाठी लागणारे सर्वच एक्स्पायर झालेले व वापरलेले साहित्य मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहे. तसेच ते पेटवून दिले जात आहे. असे साहित्य अर्धवट जळाल्याने घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खराब वास व धूर निर्माण होत आहे. त्यामुळे येथील वन्यजीव वनस्पती व जीवसंपत्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे येणाºया पर्यटक व प्रवाशांचे या कचºयामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. जवळच मस्तानी तलाव असून, हा कचरा पाऊस पडल्यावर पाण्यात जात आहे. त्यामुळे तेथील तलावदेखील दूषित होत आहे. या तलावातील पाणी शेतीला देण्यात येते. त्यामुळे शेतात प्रदूषित पाणी गेल्याने पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.निवेदन देऊनही कारवाई नाहीयाबाबत अन्न औषध विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परंतु त्यांच्याकडून काहीच कारवाई करण्यात येत नाही. यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शादाब मुलाणी, ज्ञानेश्वर कामठे, अमित गुरव, आकाश खैरे, रूपेश बोबडे, मयूरेश जाधव, धीरज गायकवाड यांनी केली आहे.महामार्गावर कचराच कचरालोकमत न्यूज नेटवर्कआंबेगाव बुद्रुक : पुणे शहरालगतच्या अकरा गावांचा पुणे महापालिकेमध्ये नुकताच समावेश करण्यात आला. परंतु या नवीन गावात असणाºया समस्या कशाप्रकारे सोडवता येतील, या बाबत महापालिकेत चर्चा सुरु आहे. नुकतीच पुणे महापालिकेचे सहायक आयुक्तांनी या गावांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. परंतु, अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.कात्रज-देहू बाह्यवळण महामार्गावर जागोजागी कचºयाचे ढिगारे साठलेले आहेत. या कचºयामध्ये बाटल्या, कुजकी फळे, बारदाणे, जुने कपडे इत्यादींचा समावेश आहे. हा कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो.नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुरामुळे वाहनचालकांना वाहने चालवणेही अवघड बनत आहे.त्यामुळे कचरा पेटवू नये, अशी मागणी होत आहे.नागरिकांनी आपल्या घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता कचराकुंडीत टाकला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता राखणे आपली जबाबदरी आहे असे समजून त्या जागेची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे.- अरुण राजवाडे, अध्यक्ष,भाजपा खडकवासला मतदारसंघ

टॅग्स :Puneपुणे