शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

दिवे घाट बनलाय ‘कचरा घाट’, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:33 IST

दिवे घाटात कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप बंद झालेले नाहीत. यापूर्वी अनेकदा तक्रार करूनही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे दिवे घाट हा कचरा घाट बनला आहे. त्यामुळे या घाटाचे सौंदर्य नष्ट होत आहे.

जयवंत गंधाले/लोकमत न्यूज नेटवर्कफुरसुुंगी : दिवे घाटात कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप बंद झालेले नाहीत. यापूर्वी अनेकदा तक्रार करूनही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे दिवे घाट हा कचरा घाट बनला आहे. त्यामुळे या घाटाचे सौंदर्य नष्ट होत आहे.दिवे घाटात पूर्वीपासून अनेक ठिकाणी कचरा आहे. हा कचरा न उचलता आणखीन टाकण्यात येत आहे. त्यातच आता एक्स्पायरी झालेली औषधे, सुया, इंजेक्शन सिरींज, गोळ्या, सलाईन बाटल्या, पावडर, पट्ट्या, सिरप लिक्विडच्या बाटल्या व वैद्यकीयसाठी लागणारे सर्वच एक्स्पायर झालेले व वापरलेले साहित्य मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहे. तसेच ते पेटवून दिले जात आहे. असे साहित्य अर्धवट जळाल्याने घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खराब वास व धूर निर्माण होत आहे. त्यामुळे येथील वन्यजीव वनस्पती व जीवसंपत्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे येणाºया पर्यटक व प्रवाशांचे या कचºयामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. जवळच मस्तानी तलाव असून, हा कचरा पाऊस पडल्यावर पाण्यात जात आहे. त्यामुळे तेथील तलावदेखील दूषित होत आहे. या तलावातील पाणी शेतीला देण्यात येते. त्यामुळे शेतात प्रदूषित पाणी गेल्याने पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.निवेदन देऊनही कारवाई नाहीयाबाबत अन्न औषध विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परंतु त्यांच्याकडून काहीच कारवाई करण्यात येत नाही. यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शादाब मुलाणी, ज्ञानेश्वर कामठे, अमित गुरव, आकाश खैरे, रूपेश बोबडे, मयूरेश जाधव, धीरज गायकवाड यांनी केली आहे.महामार्गावर कचराच कचरालोकमत न्यूज नेटवर्कआंबेगाव बुद्रुक : पुणे शहरालगतच्या अकरा गावांचा पुणे महापालिकेमध्ये नुकताच समावेश करण्यात आला. परंतु या नवीन गावात असणाºया समस्या कशाप्रकारे सोडवता येतील, या बाबत महापालिकेत चर्चा सुरु आहे. नुकतीच पुणे महापालिकेचे सहायक आयुक्तांनी या गावांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. परंतु, अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.कात्रज-देहू बाह्यवळण महामार्गावर जागोजागी कचºयाचे ढिगारे साठलेले आहेत. या कचºयामध्ये बाटल्या, कुजकी फळे, बारदाणे, जुने कपडे इत्यादींचा समावेश आहे. हा कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो.नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुरामुळे वाहनचालकांना वाहने चालवणेही अवघड बनत आहे.त्यामुळे कचरा पेटवू नये, अशी मागणी होत आहे.नागरिकांनी आपल्या घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता कचराकुंडीत टाकला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता राखणे आपली जबाबदरी आहे असे समजून त्या जागेची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे.- अरुण राजवाडे, अध्यक्ष,भाजपा खडकवासला मतदारसंघ

टॅग्स :Puneपुणे