शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

दौंड तालुका टंचाईसदृश

By admin | Updated: August 20, 2014 22:38 IST

राज्यातील 123 टंचाईसदृश तालुक्यांमध्ये पुणो जिल्ह्यातील दौंड तालुक्याचा समावेश आहे.

दौंड : राज्यातील 123 टंचाईसदृश तालुक्यांमध्ये पुणो जिल्ह्यातील दौंड तालुक्याचा समावेश आहे. तालुक्यात सरासरी 4क्क् मिलिमीटर पर्जन्यमान असताना गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत या वर्षी केवळ 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नदीकाठची गावे सोडली, तर जिरायती भागात भर पावसाळ्यातही पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
 
12 गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
देऊळगावराजे : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील 12 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खडकी येथे पुणो-सोलापूर महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन शांततेत झाले. 
तालुक्यात चालू वर्षी पावसाने दिलेली ओढ व त्यामुळे जनावरांच्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील पूर्व भागातील 12 गावांतील ग्रामस्थांसह महिलांनी तहसीलदार उत्तम दिघे, पाटबंधारे विभागाचे श्रीकांत बावडेकर यांना पाण्याची व्यवस्था होण्याबाबत निवेदने दिलेली होती. मात्र शासन स्तरावरुन व राजकीय स्तरावरुन संबंधितांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष हे आंदोलन करण्यात आले.
प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करुन कळवितो. मात्र त्यांना याबाबत काहीही न कळविल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. आंदोलकानी या वेळी संयम राखत आंदोलन शांततेच्या मार्गाने पूर्ण केले. या वेळी ग्रामस्थांना गोरख गाढवे, संजय काळभोर, डी. के. काळे, राजराजे शिंदे यांनी मार्गदर्शन केले. 
नायब तहसीलदार बजरंग चौघुले व पाटबंधारे विभागाचे श्रीकांत बावडेकर यांना ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत. या वेळी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच संरक्षणासाठी आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन न दिल्याने उपस्थित आंदोलकांची भ्रमनिराशा झाली. (वार्ताहर)
 
दौंड टंचाईग्रस्त जाहीर झाल्याने अंदाजे 37 कोटी 7क् लाख रुपयांची सवलत वीज, शिक्षण आणि शेतसारा यामार्फत मिळणार असल्याचे सूत्रंनी सांगितले.
तालुक्यात सरासरी 4क्क् मिलिमीटर पर्जन्यमान आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत या वर्षी केवळ 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतक:यांसह कामगार, व्यापारी आणि समाजातील इतर घटक हतबल झाले आहेत. एकंदरीतच, तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाणी तसेच चा:याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुळा-मुठा आणि भीमा या नद्यांना पाणी सोडल्यामुळे या नदीकाठच्या गावांतील शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर, तालुक्याच्या जिरायत पट्टय़ातील खोर, वासुंदे, कुसेगाव, पडवी, जिरेगाव, हिंगणीगाडा, रोटी या परिसरातील पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. (वार्ताहर)
 
तालुक्यातील सुमारे 1 लाख शेतक:यांना अंदाजे 1 लाख रुपये शेतसारा माफ होईल. कृषीपंपांच्या वीजबिलापोटी 5क् टक्के सवलत मिळणार आहे. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत बिगरशेतसारा कर शेतक:यांना भरावे लागणार आहे.
- उत्तमराव दिघे, 
तहसीलदार
 
4तालुक्यातील पहिलीपासून ते उच्च शिक्षित मुलांची संख्या अंदाजे 41 हजार असून खासगी अनुदानित आणि शासकीय अनुदानित विद्याथ्र्याना परिक्षा फी आणि प्रवेश फी असे अंदाजे 15 लाख रुपये माफ होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संगीता शिंदे यांनी सांगितले. 
 
दौंड : गुरुवारी (दि. 21) सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेर्पयत तांत्रिक कामाकरिता दौंड उपकेंद्रातील 132/22 के.व्ही. येथून बाहेर पडणा:या 22 के.व्ही रेल्वे व दौंड फिडरवरून विद्युतपुरवठा होणा:या सर्व भागांचा विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने देण्यात आली.